बुधवार, २० मार्च, २०१९

उपनयन संस्कार

             उपनयन संस्कार
साजिरा -गोजिरा बटू उपनयनासी उभा ठाकला            
साजिरा -गोजिरा बटू उपनयनासी उभा ठाकला ,
गुरुगृही पाठविताना मातेच्या नयनी गंगा -यमुना आनंदे भेटल्या ,
संस्कारित होऊनि पुत्र (बटूचे नांव ) पुरुषोत्तम होईल ,म्हणूनि पित्याने आपल्या भावना चेपल्या ,
करा घेऊनी भगिनी उभी ,म्हणे सदा असेन पाठीशी भावा ,करीत रहा सदाचार ,
ब्रह्मचर्य असे पुढील तीन आश्रमांचा भक्कम पाया अन आधार ,
मामा देई आशिर्वाद शिकोनि ,सुफल संक्रमण होवो गृहस्थाश्रमी ,करा पुरुषार्थपूर्ण संसार ,
भिक्षावळ म्हणजे सत्कर्मासाठी भिक्षा देणे -घेणे एक अर्थपूर्ण उपचार ,
मौंजीबंध एक महत्वाचा संस्कार, संस्कृतीने कितीतरी हळुवार भावना आहेत जपल्या ,
तात -मात ,कुटुंब -समाज-राष्ट्राचे  ऋण उतरविण्यासी ,गुरुगृही निघाला छकुला ,
 साशीर्वाद भिक्षा घालण्यासी जमले,   आजी -आबा-आप्त -मित्र ,माता -भगिनी ,कुर्यात बटोरमंगलम च्या गजरी ,
देवा गजानना परमेश्वरा ,कायम असूदे तुझा आशीर्वादाचा हात आमच्या सर्वांच्या शिरी .



मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

योगायोग

                              योगायोग 
काही वर्षांपूर्वी एका लग्नाच्या निमित्ताने अमरावतीला जायचा योग आला . परतीच्या प्रवासाआधी एक दिवस मोकळा होता . माझी रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरगढ़ला जायची खूप इच्छा होती ,चौकशी करता समजले अमरावतीहून माहूरगढ़ला एस . टी . ने सकाळी निघून संध्याकाळी परत येणे सहज शक्य आहे . त्याप्रमाणे बसने सकाळी माहूरगढला जायला निघाले . काही तासाने बस एका स्टॅण्डवर दहा मिनिटासाठी थांबली म्हणून मी हातातील छोटी बॅग घेऊन स्वच्छतागृहात जाण्यासाठी खाली उतरले ,परत येते तो माझी बस मला सुटलेली दिसली . हाका मारल्या ,थांबवण्यासाठी हात केला पण बस काही थांबली नाही . मी चिंतेत पडले ,आता काय करायचे ,परत अमरावतीला जायचे का माहूरच्या पुढील बस ची चौकशी करायची ?नशिबाने बस मध्ये माझे काही सामान राहिले नव्हते . एकच दिवसाचा प्रवास असल्याने हातातील पर्समध्येच पैसे ,मोबाईल, फोन डायरी ,रेणुकादेवीला तांबूल प्रिय म्हणून ओल्या कपड्यात गुंडाळून आणलेली घरच्या बागेतील मघईची पाने इत्यादी साहित्य होते . बस बस ओररडल्याने बाजूला दोन -चार माणसे जमली होती ,त्यातील एक साधू वेशातील माणूस पुढे आला आणि म्हणाला बस चुकली त्यात देवाचा काही संकेत असेल असे समजा आणि इतक्या दूरवर आलात तर माहूरला जाऊन या . अर्ध्या तासाने माहूरसाठी एक जलद बस आहे ,पुन्हा तिकीट काढावे लागेल पण रेणुकादेवी सोबत दत्तशिखर ,अत्री -अनसुया शिखरचेही दर्शन घ्या . सोबत त्याने माहूर बसस्टँड ते शिखरावर कसे जायचे ,शेयर रिक्षावाले  किती पैसे घेतात ,अश्या सर्व सूचना अवघ्या चार -पाच मिनिटात दिल्या . मी चौकशी खिडकी वर पुढील बस ची खात्री करून घेतली आणि खंडित झालेल्या माहूरगढच्या प्रवासाची पुन्हा सुरुवात केली . पुढील संपूर्ण प्रवास निर्विघ्न, आनंद देणारा ,समाधानकारक झाला. बस स्टॅण्डवर भेटलेली साधुवेशातील ,वृत्तीनेही साधु असलेली व्यक्ती आजही माझ्या स्मृतीपटलावर आहे . तेथे त्या साधूचे भेटणे एक योगायोगच ,त्या मार्गदर्शकाला माझा शतशः प्रणाम . 
                                  आसावरी जोशी ,कर्वेनगर ,पुणे ४११०५२ 

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

पक्षी उडाला आकाशी

        पक्षी उडाला आकाशी
आयुष्याच्या वाटेवर कोण केंव्हा कुठे कसा भेटेल ,माहित नसते आपणासी ,
अचानक एक चिमुकला पक्षी येऊन बसला माझ्या चिंतामणी च्या दाराशी ,
काय झाले होते कुणास ठाऊक ,इच्छा असून त्राण नव्हता चिमुकल्याचा पंखांपाशी ,
वारा घातला ,दाणा -पाणी दिले ,उमेद दिसली त्याच्या अन आमच्या उराशी ,
कुणी म्हणे पोपट ,कुणी काय ,गुगल गुरु म्हणाले नाही नाही हातर आहे कॉपरस्मिथ -छोटा बसंत-तांबट पक्षी ,
वाईटालाही लागते निमित्त ,चांगल्यालाही लागते निमित्त ,पण पिल्लू मात्र प्रामाणिक होते त्याच्या जगण्या साठीच्या अथक  प्रयत्नांशी ,
नशीबही होते बलवत्तर ,अध्यात्मिक अर्थाने नव्हे ,पण शब्दशः काहीच तासात पक्षी उडाला (उडूलागला ) आकाशी ,
जल -थल—नभचर जीव असुदे कुणीही ,प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ,प्रेमच असते ,एका जिवाचे दुसऱ्या जिवाशी ,
पावलोपावली येतात अनुभव ,आपसुकच नतमस्तक होते ,परमपित्याच्या चरणापाशी .

मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

****ati lagu


नवीन वर्षाच्या निमित्ताने एका जुन्या नेमाचीच उजळणी करुयात . जमेल तेवढ्यांच्या सुख -दुःखात संवेदनशील राहून सहभागी होवू या . फक्त सोशल मीडिया द्वारे आभासी नव्हे तर ,निःस्वार्थपणे  कधी एकमेकांना भेटून तर कधी फोनवर बोलून संपर्कात राहूया ,मदत करूयात . त्याच बरोबर कुणाला गृहित धरून गैरफायदा ही घ्यायचा नाही अन घेऊ द्यायचा नाही ही काळजी पण घ्यायला हवी . मदती वरून काही ओळी सुचल्या त्या मांडत आहे . 

***अटी लागू ,
हल्ली माणसे आपली दुःखे शेअर करीत नाहीत ,आणि मदत मागत नाहीत ,अशी असते तक्रार ,
एक कारण -पैसा झाला मुबलक ,तो फेकला की दिमतीला माणसे मिळतात हजार ,
मग मदतीची भीक घेऊ कशाला ?कशाला हवेत कुणाचे उपकार ?
पण मग पाषाणातील झरे अन बाटली बंद पाणी यात फरक काय तो उरणार ?
दुसरी बाजू मदत करणाऱ्यांची ,त्याचाही दुष्काळ भासू लागलाय फार ,
अनकंडिशनल लव्ह ,हेल्प ,जाऊन बसलय ,कुठे तरी तडीपार !!!
कुणी नावासाठी तर कुणी कर वाचवण्या साठी ,कर -सेवा करणार ,
कुणी *अटी लागू असे दिसणार नाही इतक्या बारिक अक्षरात लिहून ,साध्या -भोळ्यांना लुटणार ,
बेमालूम पणे ,आवळा देऊन कोहळा उकळणाऱ्यांचाही असतो एक प्रकार ,
कमी उरलेत ,दुसऱ्यांच्या अडचणीत ,धावून जाणारे दयाळू -दानशूर -उदार ,
तरी शेवटी जग चालले आहे ,चांगल्यांच्याच बळावर ,मग ते असोत दोन -चार ,
गोड लागले म्हणून मुळापासून खाल्ले तर ,पुन्हा ऊस कसा उगवणार ?
दान देताना एका हाताचे ,दुसऱ्या हाताला कळु नये ,हा केवढा मोठा विचार !
मदत मागावी गरजे पेक्षा कमी ,मदत करावी क्षमते पेक्षा जास्त ,असे असावेत  सुंदर संस्कार !!!
     
घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच व्हावे
दोन्ही हाताने घेताना व्याजाचे गणित पक्के असावे ,
दातृत्वाच्या कडीने वाढत -वाढत साखळी व्हावे ,
समाजात देणारे जास्त ,घेणारे नाममात्र उरावे .
                                                     Asawari joshi

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

संक्रांतीचे वाण

              संक्रांतीचे वाण 
आला सण संक्रांतीचा ,केली वाणाची तयारी ,
मुखशुद्धी ,पूजा ,औक्षण ,शुभ शकुन अन गणरायाचे प्रतीक म्हणून ,मान मिरवी सुपारी ,
सोबत एक  सदिच्छा सुख - शांती -समृद्धी साठी ,नववास्तूत प्रवेशाची ,घ्यावी आपण भरारी 
आपल्या मदतीस हजर मी अर्चना परांजपे ,पुरी होवो इच्छा सोनेरी ,
आमच्या सेवेचा लाभ घ्यावा निःसंकोच ,नमस्कार ,धन्यवाद  आमची टीम राहील आपली  आभारी .