गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

||वानप्रस्थ ||




ज्ञानी जनांचे ऎकावे वचन एक ,
संसारी राहून पेलाव्यात ,जवाबदार या अनेक ,
जसे खमंग ,पौष्टिक रुचकर भोजन बनवी सुरेख ,
अंगी ना चिकटे काही ,काय ही निर्लेप भांड्याची मेख ,
          अलिप्त असावे कुटुंबात राहून ,
आंब्याच्या बाठी सारखे कशाला घ्यावे बरबटून ,
चिक्कुत राहून बी नाही घेत काही चिकटवून ,
देऊ घेऊ आनंद वानप्रस्थात राहून .

।।नियोजन ।।




भुकेच्या आधी स्वयंपाकाची ,अंधाराच्या आधी दिवा-बत्ती ची तयारी करतात ,
उतार वयासाठी आर्थिक नियोजन ही हल्ली बरेच लोक करतात ,
पण जवाबदारीतून मोकळे झालो या आनंदात ,काहीलोक मोकळ्या वेळेचे नियोजनच विसरतात ,
मग रिकामपणी नकोनकोते विचार सतावतात ,अन तनामनाला दुखणी घेरतात ,
अश्यावेळी छंद जोपासावे ,निर्लेप मनाने उपयोगी पडावे ,म्हणजे उतरती चे दिवस चांगले जातात .

Wanaprasth sutra



                         ।। वानप्रस्थ ।।   
सध्या ६०ते ७०वयोगटातील माझ्या पिढीला वानप्रस्थात प्रवेश करून बरेच दिवस लोटले . पण नुसते वर्षाचे टप्पे गाठून उपयोग नाही . त्या त्या टप्प्यातील जवाबदाऱ्या चोख पार पाडल्या शिवाय पुढच्या आश्रमात मन रमणे अवघडच . हल्लीतर ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमातप्रवेशालाच उशीर होत चाललाय . (शाब्दिक अर्थाने नव्हे ,तर पारंपरिक व्यवस्थे प्रमाणे )त्यामुळे पुढचे टप्पेच अनिश्चित झाले आहेत . जन्म आणि मृत्यू यामधील काल म्हणजे जीवन असते ,पण तो काल किती वर्षांचा असेल ,कुणीच सांगू शकत नाही . हल्ली धकाधकीच्या काळात तर अजून अवघड . ब्रह्मचर्यातील शिक्षण म्हणजे नुसत्या पदव्या घेणे नव्हे . कोणतीही शाखा असूद्या नीतिमूल्यांचे शिक्षण ,कोणत्याही परिस्थितीत विवेकबुद्धीने निर्णय घेण्याचे शिक्षण ,दुसऱ्यांची सुखे न हिसकावता सुखी -समाधानी जगायचे आणि जगू द्यायचे शिक्षण ,आपल्या जवळील ज्ञान ,बुद्धी ,पैसा,वेळ इत्यादि थोडेतरी इतरांसाठी खर्च करण्याचे शिक्षण इत्यादि गोष्टी आखून दिलेल्या टप्प्यात शिकता येऊ शकतात . पण सध्याच्या विभक्त कुटुम्ब पद्धती मुळे ज्याचा भार त्यानेच पेलायचा असतो . डिग्री शिवाय नोकरी नाही अन नोकरी शिवाय छोकरी नाही . त्यामुळे पन्नाशी आली तरी या काळात सांसारिक जावाबदार्यांचा डोंगरच समोर उभा असतो . त्यामुळे परंपरेला व्यवहाराची जोड द्यावीच लागते ,हाही शिक्षणातीलच महत्वाचा संदेश


                हल्ली चौथ्या सन्यास आश्रमा बरोबर काहींना एका नवीन आश्रमाला सामोरे जावे लागते ,तो म्हणजे 'वृद्धाश्रम '. काळाचा महिमाही स्वीकारावाच लागतो . असो. 
           नव वर्षा निमित्त वानप्रस्थात ठरवलेल्या काही गोष्टींची उजळणी . पाठ पक्का होण्यासाठी अधून-मधून उजळणी केलेली बरी . या महिन्याची प्रस्तुती ---१-वानप्रस्थ २-नियोजन ३-जीवनप्रवास ४-सुख दुःख ,नातीगोती इ . ----

।। जीवन प्रवासातील टप्पे ।।

जन्म -मरणा मधील अनिश्चित काळाचे नावच असे जीवन,
बालपण -तरुणपण -म्हातारपण ,असे होत जाते प्रमोशन,
प्रवास म्हंटले कि आलीच धावपळ ,अन अनेक टेन्शन्स,
काळजी कमी करता येते,वेळेवर करुन प्रवासाचे नियोजन ,
बालपणी सगळे आपली घेतात काळजी ,देऊन फुल अटेन्शन ,
पुढच्या -मागच्या पिढीला सांभाळायची ,कसरत म्हणजे तरुणपण ,
निरोगी चिंता रहित उतरणी लाभली ,तर सुखावह सरते म्हातारपण ,
मग मागे वळून बघताना समजते ,अरेच्या हेचते आहे नंदनवन 

।। लपंडाव ।।

कधि विरह ,कधि अभाव तर कधि असमाधानी वृत्तिने जीव होतो बेजार ,
विरह म्हणजे दुःख  ,दुःख म्हणजे काळोखा अंधार ,
कधि दृश्य  ,कधि अदृश्य गोठलेली आसवे  गार ,
कधि अखंड वाहणारी काजळाची धार ,
तर कधि बोचून -बोचून बोथट होते काळजाची धार ,
दुःख म्हणजे वस्त्राची टोचणारी ,भरजरी किनार ,
तलम-रेशमी पोत ,जरतारी मुळेच तर उठून दिसणार ,
आधी सुख उपभोगले म्हणून दुःख कळले ,लपंडाव खेळणारे तेतर जोडीदार,
कधि एक तर कधि दुसरा राज्य घेणार ,तरच खरा खेळ रंगणार ,तरच ------

।। श्री गुरुदेवदत्त प्रसन्न ।।

।।दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ।।
तूच माऊली तूच गुरु,तूच देव,वास तुझा चराचरा,
पाषाणाच्या हृदयातून वाहे,निर्मल ,शीतल गोड झरा,
पंचमहाभूते महान कर्मयोगी ,निसर्ग सांगतो जीवन गाणे सुगम करा,
नाही थकती ,नाही चुकती ,निरिच्छ नियमित ,पूर्वेला तो नित्य उगवती,
रविप्रभा सदाही,दाहिदिशाचा तम उजळिती,
अग्नि जवळी साठवण्याची ,मुळीच नाही मानव वृत्ती ,
अचला धरणीमाता जणू ,झाली मूर्तिमंत ,दया -क्षमा -शांति ,
पवित्र प्रवाही शीतल जल ,सहज सकलामधि समरसति ,
अथांग सागर सीमा जपतो,येवो कितीही ओहटी -भरती ,
इतरांच्या आनंदासाठी ,सुवासिक सुंदर फूल उमलती ,
कोटि जिवांना तोषिवण्यासी ,वृक्ष फळांचा भार पेलति ,
अनंत आकाश पोकळ -निर्मळ ,सामावूनही ग्रह -तारे अन मेघ किती,
वायूची व्याप्ती सकल जगी ,परि ना कोठे गुंतुन पडती,
तुज ओळखण्याची बुद्धि दे मज ,पडे तोकडी शूद्र मती . 

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

।।सुगरण ।।

चटणी ,कोशिंबीर ,भाजी ,आमटी अन उसळी,
सारखीच सामग्री वापरुन सुद्धा ,प्रत्येकाच्या हातची चव असते वेगळी,
लिंबू -मिरची -कैरी लोणचे ,पाहूनच तोंडाला सुटते पाणी,
कवडी सारखे दही ,ताजे ताक तर ,भूतलीचे अमृत जाणी,
भात असावा मऊ मोकळा ,भाकर -पोळी गोल मऊ,
पापुद्रे सुटलेली ,शिळी सुध्दा आनंदाने आम्ही खाऊ,
सणासुदीला पुरी असावी तळलेली ,कढई पासुन ताटापर्यंत कायम टम्म फुगलेली,
पुरणपोळी मऊ लुसलुशित ,कडेपर्यंत भरलेली ,इडली पानात वाढताना आनंदाने डुललेली,
केक -मैसूरपाक -अनारसा ,सुंदर मांडा जाळीदार ,तिखटामध्ये डोसा -उत्तप्पा -ढोकळा असे जोडीदार,
जिलबी ,गुलाबजाम ,रसगुल्याचे तन -मन रसदार ,करंजी ,चिरोटा शंकरपाळे तोंडात घेताच विरघळणार,
उकडीचा मोदक पातळ पारी ,मऊ सुबक ,रुबाबदार ,श्रीखंडाचे काय सांगता मिटक्या मारत बोट चाटणार,
पापड -पापडी,भजीवडे ,जड कसे ?तेलावरते तरंगणार ,
भरल्या पोटी पुढे ठेवले ,तरी भूक चाळवणार ,
लाडू -वाडीला तारेचापाक कसा काय जमणार ?पिकनिक पार्टीत भेळच बिनविरोध जिंकणार ,
समप्रमाणात रवा-साखर -दूध -तुपाने ,करायचा असतो प्रसादाचा शिरा,
घालून मेवा ,केळे ,केशर ,भक्ति -रसाने भरापुरा,
कला-शास्त्र अन प्रेमाच्या 'त्रिवेणीचा'पाककलेत वाहे झरा ,
प्राशन करणाऱ्याला मिळतो ,पूर्णब्रह्माचा आनंद खरा . 

।।नैवेद्याचे ताट ।।

डावी कडे लिंबू ,चटणी ,कोशिंबिर ,अन पापड भज्यांची तळणी,
मीठ त्यात वाढायचे नसते,कारण बरे असते खाणे थोडे अळणी,
उजवीकडे भाजी - आमटी -सार कढी,उसळी सारखी तोंडीलावणी,
मधल्या भागी पोटभरीला भात -पोळी ,आहाराची समतोल अन सुंदर मांडणी,
आंबट -खारट -तिखट -तुरट कडूलाही मानुन गोड ,सजतो पदार्थ घालुन फोडणी,
ताटाबाहेर डाविकडे पाण्याचे पात्र,अन्न पचाया हवी हवा अन पाण्याची जोड,
उजवीकडे ताटाबाहेर ,पक्वान्नाची वाटी ,शेवट असावा नेहमी गोड,
हरिचा ध्यास ,उदबत्तीचा वास ,पाट -रांगोळी,वातावरणही तोडिसतोड,
मुखशुद्धीचा विडा सांगतो,चार तास तरी मना आता खाण्याचा तू मोह सोड . 

|| गृहलक्ष्मी -||

पाहुणचार जणू  द्रोपदिची  थाळी ,पुरवठा जणू अन्नपूर्णेची पळी ,
येऊद्या पाहुणे वेळी -अवेळी ,स्वागत असते हसून जणू चाफेकळी ,
आनंदाचा गोडवा ,स्नेहाची स्निग्धता झोकून देते स्वतःला स्वयंम पाकाच्या वेळी ,
पोटामार्गे जाते वाट मनाच्या तळी ,
खाणाऱ्या चे समाधान एकच हेतू ,मग जिन्नस बिघडायची येतनाही पाळी ,
लोक म्हणतात ,हातालाच आहे चव ,असूदेत साधी भाजी -पोळी .

।। पाकक्रिया ।।

स्वयंपाक शास्त्र की कला ,यावर मोठी चर्चा होऊ शकते,
कला -शास्त्र शिकता येते ,पण कला थोडीतरी अंगी असावीच लागते,
पंचतारांकित हॉटेल मध्ये,साहित्य ,कृति ,स्वागत ,सजावट यांचे उत्तम मिश्रण असते,
पण ---पण आपल्या माणसाच्या हातचे खाताना ,वेगळीच काही 'लज्जत 'येते ,
कारण त्यात बाजारात नमिळणाऱ्या ,स्नेहाचे (तेलाचे )मोहन असते ,
आपली ती व्यक्ती ,तराजू शिवाय षटरसांचे संतुलन साधते ,
तिचे जणू पदार्थातल्या मिठासारखेच असते ,
आहे तोवर कळत नसते,नसलेतर मात्र सुग्रास अन्नही बेचव भासते . 

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

Mahanaivedya che tat

निवेदन -देवापुढील  ठेवलेले महानैवेद्याचे ताट म्हणजे संपूर्ण -संतुलित आहाराचा एक उत्तम नमुनाच जणू . स्वयंपाक म्हणजे शास्त्र आणि कलेचे मिश्रण . त्यात षटरस प्रमाणबध्द असावे लागतात . पौष्टीकते बरोबर पदार्थाचा स्वाद -रंगरूप -मांडणी यामुळे उदराग्नी प्रज्वलित होण्यास मदत होते . पदार्थ बघूनच तोंडाला पाणी सुटलेतर तो पचायला मदतच होते . अर्थात खाण्याचे योग्य प्रमाण प्रत्येक खाणाऱ्याने अपापलेच ठरवायचे असते . भोजन ही फक्त पोट भरण्या साठीची क्रिया नसून एक यज्ञ -कर्मच आहे हे जाणले म्हणजे झाले . खाद्य -संस्कृतीतील षटरसाबरोबर ,साहित्यातील रस -राजाचा स्थायीभाव 'प्रेम 'पदार्थात मिसळता आलातर खाणाऱ्याला आत्मानंद मिळणारच आणि त्यामुळे पाककर्त्यालाही .
                मी साधारण दर शनिवारी ,माझ्या कुंपण नसलेल्या कवनोद्यानातील (मुक्तछंद )काही फुले माझ्या अक्षरमालेत गुंफण्याचा प्रयत्न करते . यामहिन्यात प्रस्तुत करीत आहे १-नैवेद्याचे ताट २-पाकक्रिया ३-हातालाच चव ४-सुगरण आणि काही -----

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

Kutumb prstawana


हल्ली कुटुम्ब छोटी छोटी ,तर घरे असतात मोठी,
पूर्वी कुटुम्ब असत मोठी,तर घरे असत त्यामानाने छोटी . 
त्यावरून सहज आठवल्या काही गोष्टी,
त्याच आल्या आपल्या भेटी . 

|| घरकुल ---हल्ली ||

नव्या म्हणी रुजू लागल्या ,जुन्याच्या जागेवर ,
लोन पहावे फेडून ,लग्न दाखवावे टिकवून कसे ,जीवनभर ,
सुंदर -स्पेशस  ,
आलिशान ,घर कसे सुबक ,
रंग रूप इंटिरियर सारे कसे ,आकर्षक ,
प्रत्येकाला वेगळी खोली ,नको कुणाची आवक -जावक ,
अगदी गेस्ट रूम ,servant रूम सारे कसे माफक ,
सर्वांकडे सेपरेट सेल ,बोलणे होते फोनवर ,
मग मनाच्या तारा जुळणार कश्या ?वाय -फाय घरभर ,
प्रत्येकाचा वेगळा मेनू ,टी . व्ही . बघत जेवण होई रूम वर ,
दगड -माती पैश्याने मात केली माणसावर ,
आत्म्या विणा शरीर जणू ,दुकानाच्या दारावर . 

ज्याला त्याला स्पेस मिळाली ,पण पाय अजून जमिनीवर,

स्पेसचे महत्व जाणूनच,जाऊ शकतात चंद्रावर अन मंगळावर ---

|| घरकुल -----पूर्वीचे ||

घर पहावे बांधून ,लग्न बघावे करून अवघड होती कामगिरी ,
स्वयंपाक घर ,देवघर माजघर ,एखादी खोली माडीवरी
गरजू आणि होतकरु एखादा तरी माधुकरी ,
आला-गेला
आगन्तुकाचे स्वागत करी ओसरी ,
आज्जी -आबा ,आई -बाबा ,काका -मामा जपली जात मैत्री ,
चुलत -मावस -मामे आत्ते भावंडे तर कितीतरी ,
साधे सात्विक वेळेवर जेवण सांज -सकाळ पंगती वरी ,
घरात शिजेल ते सर्वांनी खायचे ,वरण -भात ,भाजी अन भाकरी ,
सणावारी आवडीचे ,वडे -भजी ,श्रीखंड -पुरी ,


दाटीवाटीने झोपुन सुद्धा झोप होत शांत पुरी ,
एकमेकांची बुकं -कपडे ,वापरत असत शाळकरी ,
मुले बघता बघता मोठी होत ,कोणी व्यापारी -शेतकरी तर कोणी करत नोकरी ,
सण वार ,लग्न कार्य ,दुखल -खुपलं ,सर्वांची असे जवाबदारी ,
पैसा कमी असून समृद्धि कशी ?कारण दडपण नसे मनावरी ,
मानले तर सुख ,नाहीतर रडगाणे अन कुरबुरी 


शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

।। कुटुम्ब ।।

कालमानाने बदलतच राहणार ,कुटुंबाचा अर्थ अन आकार,
thanks giving,नाताळ,होळी,दिवाळी ,असो कोणतेही सणवार,
माणसाला कुटुंबाचा,कुटुम्बाला समाजाचा हवाच असतो आधार,
सुसंस्कृत,संगठित समाजावरूनच कायम,सुराज्याचा मान मिळणार,
     सुराज्याचा मान मिळणार --------


।। संयुक्त कुटुम्ब ।।

लांब -आखूड केसांना सामावून घेते गुंफलेली वेणी,
एका धाग्याने बांधते माळ,छोटे - मोठे,रंगी -बेरंगी,ओघळलेले मणी,
छटा पांढरी चवही न्यारी न्यारी ,विविध गुणांच्या खाणी,
दुधापासुन दही -ताक -साय -खवा -तूप अन लोणी ,
कढवताना तुपाची कणी ,खरपुस बेरीला पण असतेच ना मागणी,
ताकाला हवाच आंबटपणा ,मस्त लागते आंबटसर चवीचे साखर -लोणी,
एकमेकांचे चांगले घेऊन ,मिळून मिसळून सदा असावे जसे दूध अन पाणी,
ज्याला -त्याला मान असावा ,हवी कशाला उणी - दुणी ,
संकट समयी चिंता येथे सतवत नाही ,अन आनंदासी उधाण येते ,येथे सुगीच्या सणी
कुटुंबाचाच स्वर्ग करावा ,खरा पाहिला स्वर्ग कुणी ,खरा पाहिला --------------?



शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

||लग्न -विधी||

साखरपुडा म्हणजे रुपया -नारळ ,खण -कापड -अंगठी देऊन ,तोंड गोड करून ,लग्न जमलेहो सांगण्याचा शिष्टाचार ,
लग्नाच्या आधी अक्षत देवदेवक केळवण अश्या अनेक विधींचे सोपस्कार ,
कार्य व्यवस्थित पार पडावे यासाठी ,देवांचे आशिर्वाद अन सर्वांच्या सहकार्याची  असते गरज फार ,
वाग्निश्चय ,सीमांतपूजन ,वरमाला ,कन्यादान ,लाजाहोम ,सप्तपदी म्हणजे खरा लग्नाचा बार ,
कानपिळी म्हणजे बहिणीच्या सुखासाठी ,भावाला मेहुण्याचा कान पिळण्याचा अधिकार ,
गृह प्रवेश ,लक्ष्मि पूजन ,झाल म्हणजे ,या घरात नववधू च्या सुखासाठी आम्ही सासरचे राहू जवाबदार ,
लग्न -विधी ने देव ब्राह्मण आप्तांच्या साक्षीने वधू -वर होतात जन्मोजन्मीचे जोडीदार . 


लग्नविधी -थोडी गम्मत
सासूने मांडीवर बसवून आरश्यातून ,सून -मुलाला बघायचे म्हणजे सुनमुख ,
अंतर ठेवून जवळिक ठेवण्यात ,आहे खरे सुख ,
मुलगा दुरावला ,याचे करत बसायचे नसते दुःख ,
गुरुजीपण मजेशीर ,म्हणाले थोडक्यात आहे गोडी ,
मांडीवर घेतले तर बसायचे प्रेमाने ,त्याची करायची नाही शिडी .

||मुलगी आणि सून ||

आपली लग्नाची मुलगी गहूवर्णी -मध्यम बांध्याची ,दुसऱ्याची ती जाडी अन सावळी ,
दुसऱ्याची ती बुजरी ,अबोल ,बावळी ,आपली ती साधी सालस ,भोळी ,
लेक तेवढी स्पष्टवक्ती ,सून तेवढी अति फटकळ मिळाली ,
आपली मात्र काटकसरी ,दुसरीला मात्र कंजूस म्हणून लेबल कपाळी ,

मुलगा गेला सुनेच्या मुठीत ,जावई किती भला ,लेकिचा शब्द पडू देतनाही खाली . 

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

।। कलामांना सलाम ।।


१५ऑक्टोबर जागतिक विद्यार्थीदिन घोषित केला आहे त्या निमित्त कलामांना सलाम.

ज्ञान-विज्ञान साधेपणाची पिसे लेऊन अग्नि-पंखांनी घेतली भरारी,
राष्ट्रपती असून राजकारणी नसणे हा आदर्श-पाठ तर खूपच भारी,
आशावादी स्वप्नांचा संदेश तरुण पिढीला देत राहिल उभारी,
स्वप्ने पहात झोपण्यापेक्षा, स्वप्ने असावीत झोप उडवणारी,
आषाढीला झाली सफळ-सम्पूर्ण धर्मातीत,पंथातीत पंढरीची वारी,
कलामांना सलाम नमस्ते, नमन-वंदन, hatsoff कितीतरी भाव येती उरी.

।। Netizens ।।

सर्वांच्या भेटी झाल्या की खूप छान वाटते,पण कधीतरी दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. अश्यावेळी जगात कोठेही असलो तरी social sites मुळे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, हेही नसे थोडे. त्या विषयी चार ओळी पेश  करते  नाव आहे Netizens.

पूर्वीचे firstclass आणि अगदी ६०% मिळवलेले matric आणि graduate,
without कॉम्पुटर, समजले जातात illetrerate,
पूर्वी अनेक कामांना लावावी लागे तासनतास line,
आता घर बसल्या ,कामे होतात online,
पूर्वी दोन्ही हाताने लिहिणारे एकमेव गांधीजी,
आता texting च्या जमान्यात सगळेच झाले गांधीजी,आणि अजून काय काय ३G ४G.
social sites चा सर्वांना केवढा वाटतो आधार,
पण नेट शिवाय सब कुछ बेकार,
याचा अतिरेक ही एक प्रकारचा जणू आजार,
मग मनसोपचर आणि परिसंवादांचा भडीमार,
मग मलाही सुचल्या गामातीशीर ओळी चार,
जन्माला आल्या नव्या म्हणी आणि नवनवे वाग्प्रचार,
म्हणे, प्रत्यक्षात विचारात नाही कुत्र त्याला facebook वर हज्जारो मित्र,
आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून, 





जगण्यासाठी आवश्यक अन्न-वस्त्र-निवारा, आणि त्यात wi -fi हवाच हवा,
पण मना-मनांना जोडणारा हरवलाय दुवा,
वाचून असल्या comments, मस्तच होते entertainment,
netizens साठी available किती तरी sites,
पण नात्यात नाही ओलावा नुसते पडीक day & night,
पण मला असे वाटते, negativity शोधण्याची ही तर height,
काबुल आहे, कोणत्याही गोष्टीचे addiction असतेच वाईट,
पण बिचाऱ्या net चा काय दोष ??? neticates पाळावेत आणि वापर असावा right, 

shock बसतो म्हणून, आपण सोडाला कां lawayacha light?
कामे सांभाळून, अधून मधून site कारावी open.

आता आजचेच बघा ना सगळया programme मध्ये आहे कसे perfection . 
सारे काही सोपे झाले कारण होते net conection . 



|| E-education ||

घरात सगळे engineer,माझे शिक्षण economics आणि literature (चला कुठेतरी e आहे),
घरातल्यांनी केला प्रयत्न शिकवण्याचा computer,जमलेच नाही गरज नव्हती जोवर,
मुले गेली परदेशी दूरवर, चैन पडेना घरभर, मुले म्हणाली घाबरतेस का? प्रयत्न तर कर,
चालत रहा सूचना आणि symbol च्या तारेवर,मोडला तरी चालेल, बदलायाचाच आहे comptuer,
भिती थोडी कमी झाली, भर दिला शिकण्यावर, काळजी करत बसण्या पेक्षा भेट होईल email वर,
मुलांकडे गेल्यावार laptop बसला मांडीवर, आधी keyboard मग mouse, मग बिळातला उंदीर,
नाचूलागाला तालावर, जरा अंगवळणी पडतय तर touchpad ने मात केली mouse वर,
आता दात पडायच्या वयात, खायचा कसा apple चा गर,
पुस्तकांचे पसारे, वजन, notes काही नको, मग माया जडली जादुई पाटीवर,
मनात येईल ते वाचावे ,२४/७ google वर ,
म्हंटले, आपले इंग्लिश कच्चे आहे, autocorrection चा करू वापर,
कसलेकाय फसले उपाय, कळेचना हा शाप का म्हणायचा वर,
म्हणे स्वतःचे डोके वापरतनाही अगदी obedeint आणि follower,
पण फारच आहे sensitive, इकडे -तिकडे चालत नाही, आवर असावा बोटांवर,
बघता-बघता हाच झाला, guide-friend-philosopher,
भाषा धर्म देशांच्याही सीमा नाहीत, हा तर आहे वसुधैव कुटुम्बकम चा founder member,
अनेक प्रवाहांना सामावून घेणारा, हा तर एक अथांग सागर,
modern technology चा धर्मच तो तर, बदलत राहणे भरभर,



करतोच ना आपण दात, डोळे, knee replace, आतून बाहेरून बदलत रहावे
चालण्यासाठी जगाबरोबर,
आनंदाची गुरुकिल्ली सदा असावी स्वतः बरोबर.

R

|।बोबडी बडबड -येरे येरे पावसा ।।

येरे येरे पावसा ,तुला देतो पैसा ,
पाऊस आला मोठा ,पैसा झाला खोटा ,
वचन मोडून झाला तोटा ,पाण्याचा आटू लागला साठा ,
माणसाने निसर्गावर केली स्वारी ,पण निसर्ग नियम आपल्याहून भारी ,
    पाऊस झाला खूपच लहरी ,
कधी येती सरीवर सरी ,तर कधी देतो हातावर तुरी ,
नळाला पाणी येईना दारी ,मग ठरवले घेऊया आता खबरदारी ,
पावसाला केली विनवणी ,कृपा कर आमच्यावरी ,
येगयेग सरी ,आमची धरणे भरी ,
सर येईल धावून ,धरणे ठेवू साठवून ,
जमिनीत जिरवून ,पाणी वापरू जपून जपून .

।।बोबडी बडबड -चांदोमामा ।।

चांदोमामा चांदोमामा भागलास का ?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
लीम्बोणीचे झाड करवंदी ,मामाचा वाडा चिरेबंदी ,
मामा मामा येउन जा ,तूप-रोटी खाऊन जा ,
तुपात पडली माशी ,चांदोमामा राहिला उपाशी ,
    मग बाळ म्हणाले मामाला ----
मामा मामा ,राहू नकोस रे उपाशी !!!!
पोळी देईन मी दुधाशी ,साखर घालीन इवलिशी ,
   मग मामाने बाळाचे म्हणणे ऐकले !!!!
दुधाशी खाल्ली पोळी ,झोपुन गेला उन्हाच्या वेळी ,झोपून गेला -----

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

|| बोबडी बडबड - काऊ चिऊ ||

एक होती चिऊ, एक होता काऊ
चिऊ चे घर होते मेणाचे, काऊ चे होते शेणाचे

एकदा काय झाले, खूप मोठे वादळ आले
चिऊ चे घर राहिले टिकून, काऊ चे गेले वाहून

चिऊ होती बिच्चारी, तरी सुद्धा विचारी
कावळा होता हुशार, पण चिकाटी नव्हती फार

काऊ ला घडली अद्दल,पाण्यात गेली त्याची मुद्दल
वारा सुटला गारेगार, काऊ ने ठोठावले चिऊताई चे दार

चिऊताई चिऊताई येऊ का घरात, आत ये दादा, उभा का दारात?
चिऊ ने दिला संकटात आसरा, म्हणून काय कायमचे हात -पाय पसरा?

काऊ ने घेतला संकटातून धडा, अन बांधला मोठा भक्कम वाडा
काऊला कळू लागली  इतरांची पिडा, मदतीचा त्याने उचलला विडा

आता काऊला म्हणीतून सुद्धा, मिळू लागला मान केवढा !!!

|| ताई चे जेवण ||

वरण-भात वर तूप मीठ लिंबू, ताई खाते आवडीने
आग्रह केला आईने, पोळी-भाजी खाल्ली ताईने
थोडासा खाल्ला दही - भात, स्वच्छ धुतले दोन्ही हात
जेवण जेवली पोटभर, ओईया करून दिली ढेकर
आई म्हणाली ब्रश फिरव दातांवर,खुळखुळ करून चूळ भर
हात पुसले रुमालाला, गोष्ट हवीच वाचायला
वाचता वाचताच ताईचे, घोरणे आले ऐकायला
लौकर झोपलो नाहीतर, उशीर होतो शाळेत जायला.

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

|| अर्पणपत्र ||

माझ्या पहिल्या ब्लॉगपोस्टसाठी हे अर्पणपत्र.

अंधकाराला छेदून आलोकित करणारा,
अवघड वाट अनिरुद्ध करून देणारा,
सहज -शुद्ध भावनांची अर्चनाच खरी पूजा मानणारा,
माझा अनन्य चारुत सुंदर सुवासिक मळा फुलविणारा,
त्याला संरक्षणाचे कडे देणारा,
माझ्या ॐ कार स्वरुपी अविनाशी परमेश्वरा,
मज कवनोद्यानातील अक्षरमाला सविनय अर्पिते, ती स्वीकारा.
--------------------------------------------------------------------
थोडी पूर्वजांकडून मिळालेली शिदोरी,
थोडी तात -मातेच्या उदरी,
थोडे आयुष्यात जगताना पडले पदरी,
इतरांना जगताना पाहिले या नेत्री,
शिक्षणासाठी जागवल्या रात्री,
परीजनांचे प्रेम अन मैत्री,
देवाजीने दिली खात्री,
आहे मी पाठिशी, मनातील उमटुदे ताम्रपात्री,
थेंबे -थेंबे साठले या पंचतत्वाच्या घागरी,
बांधली जुडी दुर्वांची, करोनी पूजा षोडशोपचारी,
अर्पिते परमेश्वरा चरणावरी,
वाहते ईश्वरा तुझिया शिरी. 


- आसावरी जोशी.

|| दीपावली चे दिवस सहा ||

गोधुलि समई दीप लावूनि, दुधदुभत्याने समृद्ध, गोवत्साचे पूजन असे वसुबारस,
परिवाराचे चिर-आरोग्यच खरे धन, समजुन करतो पूजा ती असते धनतेरस,
अभ्यंग फराळा ने चतुर्दशी साजरी, नरकासुर वधोनि कृष्णाचे देवत्व जाहले सरस,
संध्या समई अवसेला, गणेश-लक्ष्मी, सोने -नाणे, चोपडी पूजन करती माजी-आजी-वारस,
पाडव्याच्या साडेतीन मुहूर्ती, औक्षण, अन शुभ कामाचे रोप लावूनि फळ पावे रसाळ -गोमटे-सकस,
भाऊ -बहिणीचे प्रेमळ नाते जपतो भाऊ बिजेचा दिवस,
अश्विन-कार्तिक, कृष्ण-शुक्ल, अंधार-प्रकाश, कितीतरी नाती  जपणारा सण दीपावली चौरस,
देऊ शुभेच्छा अरस-परस, घेऊ शुभेच्छा अरस-परस.

|| दिवाळीची मौज -मजा ||

आली रे,आली रे, दिव्या-दिव्याची माळ घेऊन आली दिवाळी,
साफ-सफाई, किल्ले -तोरण, दारी अंगणी सडा-रांगोळी,
लाडू करंज्या, चिवडा-चकली, गोड-खारी शंकरपाळी,
शेव-चिरोटे, अनारसे अन वेटोळी वेटोळी कडबोळी,
फराळाची देवाण घेवाण, सजवुन सुंदर थाळी,
फुलबाजी माळ चक्र अनार, फटाके वाजति सांज-सकाळी,
एक दिवस काकी-आई तर एक दिवस आत्याबाई काका अन बाबाला ओवाळी,
मावशी-मामा, आज्जी-आबा, नुसति मज्जा येई आजोळी,
अभ्यंग-उटणे, भरजरी कपडे, दाग-दागिन्यांनी सजली मंडळी,
आनंद समई आशिष घेण्या जातो देवाच्या देवळी,
नतमस्तक होऊ देवाजिच्या पाऊली.