सदगुणांची उंची
सौंदर्य -संपत्तीचा करू नये कधी गर्व ,
काही काळा नंतर नाश पावणार असते हे सर्व ,
विद्याविभूषित ,उच्चपदस्थ ,सद्गुणी असणे चांगलेच असते ,
पण निरपेक्ष मदत गरजुंना अन माणुसकी ,गुणांची उंची वाढवत असते ,
कधीच करू नये कुणाच्याही व्यंगावर विनोद ,
मात्र इतरांच्या गुणांचे करावे कौतुक ,वाढवावी त्यांची उमेद ,
शेवटी पंचतत्वातच विलीन व्हायचे आहे ,प्रत्येक 'माणसाला',
ब्रँड ,फॅशन ,खिसा ,किमतीचे लेबल काहीच नसते 'कफनाला '.