शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

शतकपूर्ती एकच्या नोटेची

                 शतकपूर्ती एकच्या नोटेची 
२०१७च्या नोव्हेंबर तीस ला ,एक रूपयाच्या नोटेने ओलांडली वयाची शंभरी ,
त्याच्या लहानपणी ,दूध -किराणा -भाजी ,असे खर्च भागवी 'तो 'दरमहाचे कितीतरी ,
चाऊ -म्याऊ -खाऊ देई ,सिनेमा -जत्रा -मौज -मज्जा ,लाड पुरवी उदार अंतरी ,
असो राखी -बीज ,वाढदिवस ,मुंज ,लग्न ,सण -समारंभ ,तोरा मिरवी एक नंबरी ,
दोन अधेल्या ,चार पावल्या ,सोळा आणे ,शंभर पैसे, नावे सुंदर सगळी अर्थभरी ,
कमवायलाही तितुकेच कष्ट ,मूर्ति लहान कीर्ति महान ,कहाणी त्याची सफळ संपूर्ण साठाउत्तरी . 

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

'एक 'नंबर आठवणी

                  'एक 'नंबर आठवणी 
   शंभर पैसे किंमत असलेल्या एक रुपयाने शंभरी गाठली ,तरी त्याला आजही मानाचे स्थान आहे . १९६०च्या आसपासचा काळ ,आम्ही राजस्थान /मध्यप्रदेश च्या सीमारेषे वरील भवानीमंडी -भैसोदामंडी या जुळ्या खेड्यात रहात होतो . 
      घरून मिळालेल्या एक रुपयात ,गावच्या मेळ्यामध्ये आम्ही मैत्रिणींनी मिळून खूप मज्जा केलेली आहे . बोरे ,ओले शिंगाडे ,लिमलेट आणि एक्सट्रास्ट्रॉंग च्या गोळ्या दहा -दहा पैश्यात मिळत ,तसेच जत्रा म्हंटलेकी रहाटपाळणा ,चक्र यात बसणे ,मौत का कुआ नामक भारी प्रकार बघणे ,आनंदप्रद असे . पैसे उरले तर बांगड्या ,रिबन घेतली जाई . 
            मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडे आणि आमचे मित्र -मैत्रिणी स्वखुशीने शेंगा सोलायचे काम करीत असू . वडिलांचा शेती -बागायतीचा व्यवसाय असल्याने ,त्यांना शेंगांच्या पेरणी साठी बियाणे म्हणून हाती सोललेले दाणे लागत . वडील आम्हाला एक किलो दाणे सोलले की दहा पैसे मोबदला देत ,शिवाय दाणे खायला बंधन नव्हते . दोन -तीन दिवसात एक रुपया जमत असे प्रत्येका कडे  . त्यातून बर्फाचा रंगी -बेरंगी -गोड गोळा ,कुल्फी ,गाभुळलेली चिंच इ . विकत घेऊन खात असू . चाळीस पैश्याचे मागचे तिकीट काढून एखादा सामाजिक /धार्मिक सिनेमा बघण्याची चैन पण त्यात भागत असे . सर्वांचे उरलेले पैसे एकत्र करून एखाद रुपयाची छोटी गोष्टीची पुस्तके विकत आणून रोटेशन मधे पुस्तके वाचण्याचा आनंद ही काही औरच होता . 
                    आसावरी जोशी ,कर्वेनगर पुणे ४११०५२
                    मोबाईल नंबर -९६८९३९०८०२

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली .

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली . 

   दत्तजयंती च्या निमित्ताने एक जुनी आठवण ताजी झाली . साधारण नऊ -दहा वर्षा पूर्वीचा प्रसंग आहे ,मी आमच्या शेजारच्या देवगांवकर कुटुंबियांसोबत गुजरात -सौराष्ट्र च्या ट्रिपला गेले होते . आम्ही आठ लोक होतो . अहमदाबाद ,डाकोर ,द्वारका ,सोमनाथ ,राजकोट ,पोरबंदर ,जूनागढ गिरनार अश्या बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो . गिरनारला "श्री गुरुदत्त शिखर "चढायचे असेल तर दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात . गुरुदेवदत्त आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने एक दिवस आम्ही गिरनार दर्शना साठी राखून ठेवला होता . रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करून सकाळी लवकर गिरनार वर जायचे ठरले . काही लोक डोलीने गेले ,एकांनी हॉटेलवर थांबणे पसंत केले . आम्ही तीन लोकांनी पायऱ्या चढून जायचे ठरवले . काहीना काही कारणाने आम्हाला चढणे सुरु करायला थोडा उशीरच झाला . सकाळी दहा च्या आसपास आम्ही चढायला सुरुवात केली . चालणाऱ्यांची आणि डोली वाल्यांची बऱ्यापैकी वर्दळ होती . शिखरावर जाताना वाटेत अनेक देवळांचे दर्शन घेत गेलो . उदा . जैन मंदिर ,अंबामाता ,मच्छिन्द्रनाथ ,गोरखनाथ इत्यादी . सर्वोच्च शिखरावर "श्री गुरु दत्तात्रेयांचे "जागृत देवस्थान आहे . शिखरावर दत्ताचा पादुका आणि मूर्तीची मनोभावे पूजा केली शांतपणे दर्शन घेतले . दहा हजार पायऱ्या चढून गेल्याचा थकवा जणु पळून गेला . जागृत देवस्थान म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला . परतीचा प्रवास सुरु करणार तर समजले कि थोडेसे उतरून पुन्हा थोडे चढले की तेथे अखंड धुनी आणि प्रसादाचे जेवण मिळते . धुनीचे दर्शन आणि प्रसादा शिवाय परतणे मनाला पटले नाही . आम्ही तेथेही गेलो . मन तृप्त झाले . आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली

उतरणाऱ्या लोकांची वर्दळ हळू हळू कमी व्हायला लागली होती . डोलीवाले सरावा मुळे भराभर उतरत होते . आम्हीपण उतरताना जलद गतीने उतरत होतो . पण पाय थकले होते आणि उतारावर तोल सांभाळणे अवघड जात होते . अश्या वेळेस काठीचा चांगला उपयोग झाला . तरी जाताना लागला त्यापेक्षा निम्म्या वेळेत नऊ हजाराच्या वर पायऱ्या उतरून आलो होतो . दिवस लहान असल्याने लवकर अंधार झाला . पायऱ्या दिसेनाश्या झाल्या . आजूबाजूच्या झाडातून सरसर आवाज ऐकू येऊ लागले . पायऱ्यांचे दगड गुळगुळीत झालेले ,पायताणे पण झिजलेली ,दोन-तीन वेळा पडता पडता राहिलो . आमची गती खूपच मंदावली होती . आम्ही ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ वयोगटातील होतो . मनात एक अनामिक भिती होती . आमच्या तिघांशिवाय आता कोणीच यात्रेकरू दिसत नव्हते . प्रवासाच्या तयारीत घेतलेली बॅटरी हॉटेल वर राहिली होती . सहकाऱ्यांना फोन करावा तर फोनला रेंज मिळत नव्हती . तेवढ्यात महाविद्यालयीन मुला -मुलींचा एक ग्रुप आम्हाला वर चढताना दिसला . काय करावे कळेना ,या मुलांकडे मदत मागावी का ?ते मदत करतील का ?अश्या अनेक शंका मनात आल्या ,पण दुसरा    काहीच पर्याय नसल्याने त्यांना भैया म्हणून हाकमारले आणि आमची अडचण त्यांना सांगितली . ते म्हणाले आम्ही खाली हॉटेलमध्ये  उतरलोय ,जेवायला थोडा वेळ होता म्हणून विचार केला थोडे  फिरून यावे कारण सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत . आम्ही त्यांना विनंती केली कि पायथ्या पर्यंत उतरायला आमच्या सोबत येता का ?ती मुले क्षणाचाही वेळ न लावता लगेच तयार झाली . जणू त्या साठीच ते सगळे तिकडे आले होते . एकेकाने आमच्या पैकी प्रत्येकाचा हात धरला बाकीच्यांनी सेलफोन ची बॅटरी सुरु केली आणि म्हणाले ,आम्ही तुम्हाला तुमच्या हॉटेल पर्यंत सोडल्या शिवाय जाणार नाही . बोलता बोलता पायथा केव्हा आला ते कळलेच नाही . आमचा ग्रुप आमची वाट पहात पायथ्याशी थांबला होता . 
        गिरनार च्या शिखरावर पाषाणात दत्ताचे दर्शन झाले आणि पायथ्याशी आल्यावर त्या तरुण मुला -मुलींच्या रूपानेच जणू देव भेटल्याची प्रचिती आली .

Asawari Joshi
1 Chintamani, Karvenagar, Pune 411052
Cellphone: 9689390802

Sent from my iPad

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

साठी -एक महत्वाचा टप्पा

                            साठी -एक महत्वाचा टप्पा 
काय कमवले ,काय गमवले ,काय राहिले !चा टप्पा असतो 'साठी ',
नैसर्गिक विस्मरणाला नको देऊ या नांव -"साठी बुद्धी नाठी "
चूक -भूल देऊ -घेऊ ,नाजुक नाती जपण्या साठी ,
विस्मरणाचा घेऊ लाभ ,मागू क्षमा -करु क्षमा ,अलगद उकलू गुंतागुंती ,
उगवती अन मावळती मधले क्षण हे जीवन ,साक्षीला असते ,माता आणिक माती ,
एक हात देऊया पुढील पिढीच्या हाती ,अन दुसरा मागील पिढीच्या हाती ,
चढ असो वा असो उतार ,देते आधार निस्वार्थी काठी ,
देऊ आनंद ,घेऊ आनंद ,आनंदाची चावी जपून ठेवूया आप कनवठी ,
उरले -सुरले गुंतवू परमार्थी ,संचित वाढे परलोका साठी ,
छिद्र -पोकळी विसरुनि सारे ,सूर मुक्तीचा ,वेणुस गवसे ,श्रीहरीच्या अधरी -ओठी . 

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

आजोळ -------भाग ३

         आजोळ -------भाग ३
        अजून एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ,ती म्हणजे मामा मंडळी कडून आईला भाऊबीज म्हणून' ,स्त्री मासिक आणि केसरी वर्तमानपत्राची वार्षिक वर्गणी प्रेमाची भेट असायची . त्यामुळे दूरवर अमराठी प्रांतात राहून सुद्धा ,आमची मातृभाषा मराठीशी ,नाळ जुळून राहिली . 
          त्याच प्रमाणे  एक विस्मयकारक गोष्ट म्हणजे ,आजही माझ्या सुंदर स्वप्नात ,जेंव्हा एखादे घर येते ,तेंव्हा त्याचे चित्र आजोळच्या घराशी मिळते जुळते असते . याची उकल अशी असू शकेल कि हे माझे जन्मस्थान आहे आणि त्याच बरोबर येथे मी क्वालिटी टाईम स्पेंड केला आहे . 
             असे म्हणतात ,आज बदलापुर खूप बदलले आहे ,पण देवधर वाडीतील भावंडे ,त्याच बरोबर त्यांचे बेटर हाफ ,आणि पुढील जनरेशन ,यांचा आधार पूर्वी सारखाच आश्वासक आहे . 
         अजोळीच्या वटवृक्षाचा अनेक शाखा ,उपशाखा ,पारंब्या ,उपपारंब्या युक्त पसारा आहे . उंची आणि विस्तारा बरोबर पाळेमूळे ही खोलवर रुजल्याने ,याच्या सावलीत मने खरोखरच विसावतात . 
                    आसावरी जोशी /शकू 

सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

आजोळच्या ----भाग २

        आजोळच्या ----भाग २
बदलापुरला सर्व बहिणी आणि भाचरं जमली की श्रीधर मामा ,विसु मामा ,मन्या मामा यांना काय करू अन काय नाही असे व्हायचे . लाडा सोबत गप्पा -गोष्टी ,थट्टा मस्करीही असायची . शकुंतला मामी ,वसुधा मामी अन माधवी मामी ,हसतमुखाने एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक कश्या करत याचे आश्चर्यच वाटते आता . तीन ही माम्या' सुग्रण ',म्हणजे रोज रोज केळ्याची 'शिक्रण 'वाल्या नाहीत हं !!त्यांच्या प्रत्येक पदार्थाला तृप्ती देणारी चव असायची . प्रेम आणि आपुलकी या सामुग्रीचा सढळ हाताने वापर करीत ,म्हणून असेल कदाचित . 
                      आंबा ,जांभुळ ,तुती यांचा फलाहार ,माम्यांनी लोणच्या साठी चिरलेल्या कैरीच्या मीठ -हळद -तिखट लावून ठेवलेल्या फोडी ,अचानक कमी झालेल्या असायच्या . 
     तळघरात आंब्यांची लावलेली अढी ,तयार झाली की नाही ती सारखी चेक करणे ,कारण प्रत्येकाला रोज एक आक्खा आंबा खायला मिळत असे . शिवाय अधून -मधून जेवणात अंबरस असायचाच . कागदाच्या चौकोनावर मिळालेल्या फोडणी च्या भाकरीची चव ही आंब्याच्या तोडीसतोड . 
        बाकी खेळ म्हणाल तर डबा ऐसपैस ,पत्यातील नाटेठोंम ,ज्याचे खरे नाव उशीरा उमगले ,झब्बू बदामसात ,जांभळे गोळा करुन आणणे ,अंगणातील मोरी चा तरण तलाव बनवणे इ . नाना आणि मामा लोकांची हौस आणि कष्ट या मुळे बहरलेल्या ,परसबागे मुळे ,आम्हाला ,अनेक प्रकारची फुलझाडे आणि फळझाडे पाहायला मिळाली . पांढरी मिरची ,अक्कलकाढा ,लाजाळु ,याचेतर अप्रूपच वाटे . 
           रोज संध्याकाळी सर्व मुलांनी झोपाळ्यावर बसून' शुभं करोती ' म्हणणे ,कधीतरी गुलाबाची बाग ,नदी ,मारुति मंदिर येथे फिरायला जाणे व्हायचे .आम्ही मावस ,आत्ते ,मामे भावंडे असायचोच ,त्यात भर म्हणून  वाड्यातील भाडेकरू कुटुंबीयांची मुले ही  असायची . 

आजोळ च्या आठवणींची चित्रफीत -part-1

      आजोळ च्या आठवणींची चित्रफीत 
आमचे नाना (चिं . पु . देवधर )आणि माई यांना अर्पण ----
नाना -माईच्या अष्टपैलू संसाराला फुलवण्या साठी जणू देवाने त्यांना पाच कन्यारत्न आणि तीन पुत्ररत्नांची देणगी दिली असावी . माझी आई जिला आम्ही मुले मामी म्हणायचो तिला नाना -माई कधी गोदू म्हणत तर कधी आक्का म्हणत . या  लेकीची पाठवणी थोडी लांब झाली होती . राजस्थान -मध्यप्रदेश च्या हद्दीवर स्थित भैंसोदामंडीहून बदलापुरला पोहोचायला जवळ -जवळ चोवीस तास लागत . हल्ली अमेरिकेला जायलाही एवढा वेळ लागत नाही ती गोष्ट वेगळी . आई जमेल तेव्हा आम्हा भावंडांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत बदलापूरला यायची . कधी इकडची मंडळी आमच्या घरी येत असत . वडिलांना शेतीचा व्यवसाय आणि संयुक्त कुटुम्ब असल्याने ,फार दिवस घर सोडून बाहेर पडता येत नसे . ते आले तरी त्यांना थोडेच दिवस राहायला जमत असे . 
             मग आमच्या गावाहून मामाच्या गावाला येता जाताना ,पहिला हक्काचा ब्रेक मुम्बईला -अर्थातच ताई मावशी /लीला मावशी कडे . या ब्रेक मधे मुंबई दर्शन ,चौपाटी एखादा मराठी सिनेमा /कार्यक्रम ठरलेला . मग मुंबईला एक तरी मामा आम्हाला घ्यायला यायचा . बदलापुरला माहेरवाष्णी जमायला सुरुवात झालेली असायची . आणि घर माणसांनी फुलुनजायचे .उषा मावशी तर मला मावशी पेक्षा बहीण किंवा मैत्रिणी प्रमाणे जवळची वाटायची . माझ्या लग्ना नंतर ,पुण्यात 
गेल्यावर इंदूमावशी चे घर म्हणजे ,पुण्यातील माझे जिव्हाळ्याचे माहेर घर . मावश्यांप्रमाणे सर्व काका लोकांनी पण आमच्यावर खूप माया केली .

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

बुआ -बाबा / साधु संत

                            बुआ -बाबा / साधु संत 
काही अनुचित बातम्या अन घटनांनी ढवळून निघतो समाज ,
खरे कोण ?खोटे कोण ? आयाराम -गयाराम समजणे अवघड झाले आहे आज ,
मानवाच्या हळव्या भावनांना वटवून स्वतःच घालायचा बाबाजीचा ताज ,
चमत्कार ,चार चांगल्या गोष्टी अन भाषा -वेशभूषेचा चढवून साज ,
दाबून टाकायचा ,दुर्बल ,पीडितांच्या न्यायासाठी झगडणारा आवाज ,
चांगल्या सोबत काही वाइटांचेही असते अस्तित्व ,इतिहास सांगत आलाय पूर्वापार ,
सगळी आढीच नासवतात ,नासके आंबे दोन -चार ,
पण डोळसपणे आपल्यालाच करायला हवा ,चांगल्याचा विचार ,
श्रद्धा असावी ,नको अंधश्रद्धा ,ओळखायला शिकूया कोण चोर ,कोण सावकार ,
मलमाशी सुगंधी फुले सोडून ,सदा बसे ,दुर्गंधयुक्त मलावर ,
तर मधमाशी फीर -फीर फिरुन बसे फक्त सुगंधी फुलांवर ,
आपल्या देशाला ,संकट समयी बळ देणारी ,साधु -संतांची परंपरा लाभली आहे थोर ,
साधु -संत -सदगुरूंच्या -मदतीने ,विजय मिळवूया ,दुष्ट प्रवृत्ती अन विकारांवर . 


सगुण सखी -कविता लेखन

                    सगुण सखी -कविता लेखन 
तू वेडी आहेस का शहाणी !
तू राजा आहेस का राणी !
तू निराकार का साकार ,तू सगुण का निर्गुणी !
तू अनमोल रत्न का काचेचा मणी !
तू तो का ती !विरोधाभासी प्रश्नांची उत्तरे सांगेल का कुणी !
तू गद्य की पद्य ,कसे सांगेल लेखणी !
मला वाटते गद्याची असते रोकठोक वाणी ,
पद्य म्हणजे रंगवून सांगितलेली सुंदर कहाणी ,
ज्याच्या अंतरी भाव जसे ,तशी उलगडे कविता ,कुणासाठी हासू तर कुणासाठी आसवाचे पाणी ,
कवितेत अभिव्यक्ती सोबत ,रसग्रहणाची लवचिकता ,जणू सुकुमारीची आनंदाने झुलणारी वेणी ,
थोडी देवाची देणगी ,थोड्या संवेदना ,थोडी जाण ,कविता म्हणजे पवित्र संगम त्रिवेणी ,
माहित नाही ,तिने केंव्हा ,कशी घातली मोहिनी !
ती तर माझी सखी -जिवाभावाची ,सूज्ञ ,सुंदर ,निर्गुणी असुनही गुणी . 

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

अन्न -वस्त्र -निवारा

             अन्न -वस्त्र -निवारा 
अन्न -वस्त्र -निवारा म्हणजे ,जगण्यासाठीच्या गरजा आवश्यक ,
अंग झाकायला वस्त्र ,निरोगी जीवन जगायला हवे अन्न पोषक ,
ऊन -वारा पाऊस या पासुन वाचविण्यास  ,एका शांत सुरक्षित घरट्याची अपेक्षा माफक ,
काळ बदलत गेला ,अनेक शब्दांची परिभाषाच जणू बदलत गेली ,
कम्फर्ट कडून लग्झरी कडे नेसेसिटी ची वाटचाल झाली ,
पूर्वी जेवणासाठी ताजे ,सात्विक अन्न शिजायचे ,घरात बनेल ते सर्वांनी खायचे ,
अधून -मधून सणासुदीला ,प्रत्येकाच्या आवडीचा मान राखायचे ,
गॅस ,फ्रीज ,मिक्सर ,कुकर ,मायक्रोवेव्ह अन लक्ष्मीबाईंच्या येण्याने पदार्थांची रेलचेल झाली ,
चटपटीत चण्यांची कमतरता नाही पण दातांची ताकतच कवळीबाईनें हिरावून घेतली ,
कपड्यांचे म्हणाल तर ,एक अंगावर ,एक दांडीवर ,एखाद्या ठेवणीतल्या घडीचा आनंद असे अजोड ,
आता भाराभर भारी वस्त्रालंकारांनी ,आत्म्याला टाकलेय झाकून ,बाह्य प्रदर्शनाची जुंपली चढाओढ ,
पूर्वी खोल्यांपेक्षा माणसे जास्त ,एका घरात आनंदाने रहात असत मस्त ,
आता माणसे कमी तर ,टीव्ही ,फोन ,फर्निचरने ने युक्त खोल्याच जास्त ,
सगळे कसे सुसज्ज असून ही ,भासे कसे ,निर्जिव आणि सुस्त सुस्त ,
अती समृद्धी च्या चक्रात अडकून, साधनच साध्य बनू लागलय ,नकळत ,
चक्र उलट फिरावावेसे वाटते ,कळतयं पण नाही ना वळत ,
जिने केलिये जरुरी है ,रोटी -कपडा और मकान ,
सुख ,शांति ,समृद्धी के संग ,बनी रहे ,सहज स्वस्थ सुंदर मुस्कान ,
आओ हम बनायें रोटीको जीवन ,कपडे को लज्जा का आवरण महान ,
और मकान को पवित्र पूजाघर ,ना की लेन -देन की एक दुकान . 

शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

साक्षरता दिन (८सप्टेंबर )

                         साक्षरता  दिन (८सप्टेंबर  )
साक्षरतेची नको नुसती टक्केवारी ,नकोत नुसते परिक्षार्थी ,
वाचाल -लिहाल तरच वाचाल ,बनून रहा सदा शिकणारा विद्यार्थी ,
मुलगा -मुलगी ,आबाल -वृद्ध ,सर्वांनी असावे ज्ञानार्थी ,
ज्ञानार्जना साठी बनू स्वार्थी ,ज्ञानदानात परमार्थी ,
माहितीचे नसावे नुसते संकलन ,ज्ञान असावे सदुपयोगी अन   व्यवहारार्थी ,
साक्षर म्हणजे सुसंस्कृत जवाबदार माणुस ,हक्का सोबत कर्तव्याची जाण हवी ,
अंधारा कडून प्रकाशा कडे ,अज्ञाना कडून ज्ञाना कडे जाणारी, वाट शोधू सदा नवी ,
शून्यालाही येते किंमत ,त्याच्या पुढे एक होऊन उभे राहण्याची ,ताकत आणि जिद्द हवी . 

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

मेघ कुंभ

                   मेघ  कुंभ 
काळे -करडे ,लाल -केशरी ,पांढुरके मेघ कलश भरूनि ओसंडती अंबरी ,
जणू धरणी वरती ,सडा शिंपडी ,न्हाऊन नटलेली नाजुक नारी ,
जल -मृत्तिकेच्या महामिलनाने ,सुरभित ,रंगित झाली धरणी सारी ,
हरित छटांच्या ,मऊ पोतावर ,वेलबुट्टीची सुंदर विणकारी ,
मधूनच चमके ,सोनेरी किरणांची भरजरी किनारी ,
मिलन मंडपाची कमान सजविण्या ,इंद्रधनूची लगबग न्यारी ,
दिन -रजनी ,सागर -सरिता ,धरणी -आकाश ,आदि -इति चे मिलन तर ,शिव -शक्तीची रूपे सारी ,
निसर्ग सोहळा पाहुनि ,हर्षित झाले ,पंचतत्वातील अणू -रेणू ,जल -थल -नभचर ,सकल नर -नारी .

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

होरी

                     होरी 
होरी आई जी ,देखो होरी आई ..... 
गिले -सुखे रंगो की होनेदो  दिलसे दिल की जमाई ,
साल और महिनोंकी ,करनी होगी खुशी -खुशी बिदाई ,
इसी बिदाई से जनमेगी ,नये साल की नई बधाई ,
प्रीत की एक अनोखी रीत ,फागुन ने सिखलाई ,
गोरी रंग गई श्याम रंग में ,अखियोंको दुजा रंग ना दे ,कोई दिखाई !!
राधा कहे -तेरा तुझको अर्पण ,अपनालो  हरदम के लिये  मेरे श्याम कन्हाई !!

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

सदगुणांची उंची

                      सदगुणांची उंची 
सौंदर्य -संपत्तीचा करू नये कधी गर्व ,
काही काळा नंतर नाश पावणार असते हे सर्व ,
विद्याविभूषित ,उच्चपदस्थ ,सद्गुणी असणे चांगलेच असते ,
पण निरपेक्ष मदत गरजुंना अन माणुसकी ,गुणांची उंची वाढवत असते ,
कधीच करू नये कुणाच्याही व्यंगावर विनोद ,
मात्र इतरांच्या गुणांचे करावे कौतुक ,वाढवावी त्यांची उमेद ,
शेवटी पंचतत्वातच विलीन व्हायचे आहे ,प्रत्येक 'माणसाला',
ब्रँड ,फॅशन ,खिसा ,किमतीचे लेबल काहीच नसते 'कफनाला '. 

रविवार, २३ जुलै, २०१७

परसबाग -एक जिवलग मैत्रीण

                            परसबाग -एक जिवलग मैत्रीण 
या वर्षा ऋतुतील अनोख्या ब्रह्मकमळाचा पंचम फुलोरा ,
सोबतीला तगर -कण्हेर ,अनंत -गुलाब अन सुवासिक मोगरा ,
रंगी -बेरंगी सदाफुली ,सदा परसबागेत मिरवी तोरा ,
गुणगुणायला भाग पाडी ,जाई -जुई ,सायली -अबोलीचा पाठीवर लोळणारा गजरा ,
पवित्र सुवासिक दवणा -मरवा -तुळशी ची पाने आणि मंजिऱ्या ,
आले ,पुदिना ,गवती चहा ,कढीपत्त्याचा स्वाद अन गुणधर्म न्यारा -न्यारा ,
गणेशाला प्रिय एकेरी, दुहेरी ,मुकी ,लाल चुटुक जास्वन्द अन दुर्वा एकविस /अकरा ,
विडा ,सुपारी ,नारळ मानाने मिरवी ,पूजा असो वा दिवाळी -दसरा ,
सणा -वारी रंगी बेरंगी ,सुंदर ,सुवासिक फुले ,फळे ,पत्री मुळे देवळाचे रुप येती घरा घरा ,
कधी प्रासंगिक ,मौसमी सजीव अलंकारांनी सजती वसुंधरा ,
तर कधी सार्थ दीर्घायु घेऊन  ,बीज अंकुरती धरणीच्या उदरा ,
थकलेल्या तना -मनाला ,परसबाग जिवलग मैत्रिणी सम ,कायमच देत असते आसरा ,
बागेतील फेरफटका शिकवी ,निसर्गा सम परमार्थ शिकविणारा ,मोठा गुरु नसे दुसरा .

गुरुवार, ६ जुलै, २०१७

. प्रार्थना

                  .          प्रार्थना 
तूच जन्मदाता पिता ,तूच पालन-पोषण करणारी माय -माऊली ,
भाऊ -बहीण तूच ,तूचि 'मितवा 'वाळवंटातील सावली ,
तूच सर्वस्व -शक्ती -संपत्ती -सरस्वती ,
तव गुणगानाची आमची कुवत ती किती !!
सांभाळुन घे ,सदा दे आम्हांसी सन्मती !!
तव चरणी मस्तक टेकुनि ,हीच करते विनती !!

बुधवार, ५ जुलै, २०१७

रिश्ता

            रिश्ता 
दो दिलोंकी मिटाने केलिये दूरियां ,
चुम्बक सा काम करती हैं ,एक दूजे की खूबीयां ,
कुछ रिश्ते ऐसे बनते हैं कि ,देखते रह जाती है सारी दुनिया ,
सुनेने में अजीब पर सच है ,'स्पेस 'देने से 'सेफ 'रहती हैं नजदिकीयां ,
अगर निभाना है तो जिंदगी में कम करनी होंगी मनमानीयां ,
और भी अच्छा है ,यदि खूबियों के साथ मंजूर कर ली जाय ,माफ़िक खामियां ,
चमक -धमक ना भी हो ,चहकती -महकती जिंदा होनी चाहिये वादियां ,
खुशियां पाना और देना दोनो होती हैं ,समझदार पक्की सहेलियां ,
रिश्ता वही जो यादों  को ,सहेज सके कई सदियां ,यादोंको .... 

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

शमा -परवाना

                    शमा -परवाना 
परवाना मरकर भी अमर हुआ ,जिसके प्यार में ,उसका नाम था शमा ,
जमाना देखता रह गया ये नजारा ,ये दहला देने वाला समा ,
वरना हम क्या चीज थे ?लोग बुलाते थे हमें आशिक -ए -निकम्मा ,
आखरी दमतक प्यार को पाने की कोशिश करना ,ऐसा जिद्दी हमारा मिजाज ,
इसीलिये इकतर्फा इशक की मिसाल हैं आज ,
परवाने प्यार में मर मिटने वालोंके बन गये सरताज ,
मुशायरों में चारचाँद लगाता इनका शायराना अंदाज ,
बीच में टोंकते हुए -शमाने कहा -मुझे भी आपसे कुछ कहना है खास ,
मेरे अंदर भी दिल धडकता है ,और बंद है उसमें ,प्यारका एहसास ,
पर मेरे प्यार से ज्यादा ,मुझे फिक्र है लोंगोकी ,जो मुझसे लगाये बैठे हैं आस ,
दुनियाके गमोंका अंधेरा दूर करने के वास्ते ,मुझे मरना गंवारा नही ,उन्हे करके हताश ,
तेल की आखरी बूंद तक ,हरदम चलती रहनी चाहिये मेरी साँस ,
किसीके खातिर मरने से भी मुश्किल है ,किसीके लिये जीना ,बगैर हुए उदास ,
कोई समझ पाता ,इस दर्द के एहसास को काश !!!!!!!!!!!

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

ग्रंथ महात्म्य


                 ग्रंथ  महात्म्य 
रामायण -महाभारत गीतेचे तत्त्वज्ञान ,
गाथा -दासबोध -ज्ञानेश्वरी सम ग्रंथांचे ज्ञान ,
असो बायबल असो कुराण ,वेद -उपनिषद ,अठरा पुराण ,
जगण्याची कला शिकवणारे ,समस्त प्राचीन -नवीन लेखन आहे मानवासी एक वरदान ,
साहित्य ,संस्कृति ,इतिहास ,कला अन विज्ञान ,
असो विभिन्न विषय ,भिन्न भाषा ,ज्ञानार्जन देई सदा आनंद -समाधान ,
असे म्हणतात ज्ञान -संपदा वाटून वाढते ,विद्यादान उत्तम दान ,
स्वार्थ -परमार्थ दोन्ही साधता आले तर त्याहून असे काय महान !!!

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

जय श्रीराम -रामनवमी

रामजन्माचा शुभदिनी अक्षरमालेतील एक पुष्प श्रीराम चरणी अर्पण करते . 
           जय श्रीराम -रामनवमी 
त्रिभुवनतारक ,तू सुखकारक ,रघुपती राघव ,राजाराम -सीतामाई ,
राजीव लोचन ,श्यामसुंदर ,चैत्र शुद्ध नवमीला धन्य जाहले तात दशरथ -कौसल्या आई ,
आला अयोध्येत आनंदाचा पूर ,असे झाले किती किती करावी उतराई !!!
जनक नंदिनी -भूमिकन्या -सीतापती रामचन्द्र ,एकपत्नी व्रताचा आदर्श देई ,
मर्यादा पुरुषोत्तम राम -जानकीच्या स्मरणाने जन्मोजन्मीचे पातक जाई ,
सिया -रामाने किती सोसले !ते ही आनंदाने ,धर्म -रक्षण करण्या पाई ,
असशी रामदास हनुमानाच्या रोमा रोमात ,चराचराच्या ठाई ठाई ,
चमत्कार तव गुणगानाचा ,वाल्याकोळी चा ही वाल्मिकी ऋषी होई ,
तुलसी -गदिमा कृत तव चरित्र ,कलियुगात ही नैतिकतेचा पाठ देई ,
श्रद्धा -भक्ती जेथे जेथे ,तुझे तेथे दर्शन होई ,
परम भक्ताच्या आर्त हाकेला ,क्षणार्धात तो धावून येई ,
भजो नित मनसे ,राम -राम -सीतामाई ,राम -राम -सीतामाई .

बुधवार, २९ मार्च, २०१७

दर्द

             दर्द 
दर्द की बाढ कभी ,अखियों के बांध तोडकर है बहती ,
दिलकी पीडा कभी ,मुंह के द्वार से है आग उगलती ,
कभी गुस्सा बनकर ,म्यानसे तलवार है निकलती ,
दर्द को ना मिले  रास्ता ,तो मुश्किल हो जाता है जीना ,
दूसरोंसे छुपाना हो ,किसीको ना बताना हो ,तो सीखना पडता है ,दर्द पीना ,
ए दिल !अपने दर्द को ना ही मजाक बनने देना ,और ना ही गैर जीम्मेदारी का बहाना ,
किसीके दर्द की दवा बन सको ,कागज पर चितार सको ,बिखरे शब्दोको गितोंमें ,सुरो में पिरो सको तो क्या कहना !!
दिल में बंद दर्द की पसंदीदा जगह करो तबदिली ,कुछ सीखो ,कुछ सिखाओ ,रोते हुए को हंसाना . 

स्वयंपाक -शिक्षण -निरीक्षण -परिक्षण

              स्वयंपाक -शिक्षण -निरीक्षण -परिक्षण 
खाणाऱ्याने खाऊन करावे परिक्षण ,प्रोत्साहना साठी ,करणाऱ्याला द्यावी दाद ,
साखरेत घोळवून करावी एखादी सूचना ,सतत नसावी फिर्याद ,
आरोग्यदायी कडू कारले पण कौशल्य वापरून ,बनवता येते छान ,
चाखून ,वाचून ,विचारुन ,तज्ञांचे बघून मिळवता येते ज्ञान ,
शिक्षण परिक्षणा सोबत निरीक्षणाला असते फार महत्व ,चौफेर असावे ध्यान ,
एकदा आजीबाईंनी विचारले !देवातील घंटा फ्रीज मध्ये का ठेवली !हे कोणते नवे विज्ञान ?
म्हणे -सबकुछ मिलानेके बाद एक 'घंटा 'फ्रिज में राखिये ,असे वाचले होते ,म्हणजे पदार्थ होतो छान ,
गमतीचा भाग सोडूया ,पण इच्छा आणि आवड असली तर स्वयंपाका साठी काढता येते सवड ,
कृतीच्या ज्ञाना बरोबर महत्वाची असते साहित्याची निवड ,
एकदा का तरबेज झालात तर ,थोड्या वेगळ्या उपलब्ध साहित्यातून पदार्थ बनू शकतो फक्कड ,
घरच्या जेवणाला तोडच नसते ,पौष्टिक -चविष्ट आणि खर्च ही येई माफक ,
प्रेम -आपुलकिची केली सजावट ,तर अन्न बनते पूर्णब्रह्म -रोचक -पाचक . 

सोमवार, २७ मार्च, २०१७

गुढीपाडवा


                    गुढीपाडवा 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ,आज नव -वर्षाचे झाले आगमन ,
स्वागताला उभी ,थोडी नमलेली  गुढी, पात्र -वस्त्र  ,रंग -सुगंध ,कडू -गोडाचे सुंदर मिश्रण ,
तसेच नानाविध गोष्टींचे मिश्रण असते आपले जीवन ,
आंबा -कडुलिंबाची  हिरवी फुललेली डहाळी सांगे ,सुख म्हणजे समृद्धी अन स्वास्थ्याचे अजोड मिलन ,
शुभ्र गोड गाठी बनती ,साखरेचे कण -कण विरघळून तापवून ,
नात्यातील अखंड गोडवा टिकवण्या साठी ,छोटीशी गाठ घ्यावी लागते खपवून ,
तोरणातील विविध रंग शिकविती ,आयुष्यातील प्रत्येक प्रवेश बहरु द्यावा त्या त्या रंगात रंगून ,
ठिपके जोडून काढलेली रेखीव रांगोळी सांगती  ,समाजाने  प्रगत व्हावे ,एकमेकासी धरुन ,
आपणासी सुख -समृद्धी -स्वास्थ्य -समाधान घेऊन येऊ दे ,नव -वर्षातील प्रतिदिन . 
                                                                 आसावरी जोशी 








Sent from my iPad

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

चाळीसावा वाढदिवस

                    चाळीसावा  वाढदिवस 
....... आम्हां सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा ,आज तुझा वाढदिवस चाळीसावा ,
पहाटे उठल्यावर मुलांचा ... हसरा चेहरा  तुला सदा दिसावा ,
जोडीदाराचा प्रेमळ सहवास शतकपूर्ती पर्यंत लाभावा ,
जन्मदात्यांना तुझा सदैव स्वाभिमानच वाटावा ,
चाळीशीच्या चष्म्यातून ,सकारात्मक बहुआयामी दृष्टिकोन तू जपावा ,
यश -कीर्ती -संपत्तीचा लौकिक -अलौकिक खजिना ,सत्कार्यासाठी खर्चुन वाढवावा ,
मैलाच्या दगडाने भूत -भविष्य सांधून ,जीवन प्रवास सुकर -सफल व्हावा ,
गुरुजनांच्या आशिर्वादाचा हात सदा तव मस्तकी असावा ,
एकच प्रार्थना सुखी -समाधानी चिरायुष्या साठी ,देव सदा तुझ्या पाठीशी असावा .

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

Nivedan valentine

.    अक्षरमालेतील प्रेमपुष्पातील रंगछटा -व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रिय व्यक्ती बद्दल प्रेम दर्शविण्याचे निमित्तमात्र . या दिवशी कोणी कोणाबद्दल प्रेम दर्शवायचे हा वादाचा विषय असला तरी ,'प्रिय 'म्हंटले की त्यात प्रेम हा स्थायी भाव असायलाच हवा . खरेतर प्रेम दर्शविण्यासाठी ठराविक वेळ किंवा दिवसाची गरज नसावी . प्रेमात १-सतो २-रजो ३-तमो असे तीन रंगात्मक गुण असतात . प्रेम अनकंडिशनल असले तर ते सात्विक आणि अलौकिक स्थानावर जाऊन पोहोचते . सर्वसामान्यपणे ते खालील प्रमाणे व्यक्त होताना दिसते -----

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

***अटी लागू

           ***अटी लागू 
हल्ली माणसे आपली दुःखे शेअर करीत नाहीत ,आणि मदत मागत नाहीत ,अशी असते तक्रार ,
एक कारण -पैसा झाला मुबलक ,तो फेकला की दिमतीला माणसे मिळतात हजार ,
मग मदतीची भीक घेऊ कशाला ?कशाला हवेत कुणाचे उपकार ?
पण मग पाषाणातील झरे अन बाटली बंद पाणी यात फरक काय तो उरणार ?
दुसरी बाजू मदत करणाऱ्यांची ,त्याचाही दुष्काळ भासू लागलाय फार ,
अनकंडिशनल लव्ह ,हेल्प ,जाऊन बसलय ,कुठे तरी तडीपार !!!
कुणी नावासाठी तर कुणी कर वाचवण्या साठी ,कर -सेवा करणार ,
कुणी *अटी लागू असे दिसणार नाही इतक्या बारिक अक्षरात लिहून ,साध्या -भोळ्यांना लुटणार ,
बेमालूम पणे ,आवळा देऊन कोहळा उकळणाऱ्यांचाही असतो एक प्रकार ,
कमी उरलेत ,दुसऱ्यांच्या अडचणीत ,धावून जाणारे दयाळू -दानशूर -उदार ,
तरी शेवटी जग चालले आहे ,चांगल्यांच्याच बळावर ,मग ते असोत दोन -चार ,
गोड लागले म्हणून मुळापासून खाल्ले तर ,पुन्हा ऊस कसा उगवणार ?
दान देताना एका हाताचे ,दुसऱ्या हाताला कळु नये ,हा केवढा मोठा विचार !
मदत मागावी गरजे पेक्षा कमी ,मदत करावी क्षमते पेक्षा जास्त ,असे असावेत  सुंदर संस्कार !!!

प्रदर्शन दुःखाचे

                       प्रदर्शन दुःखाचे 
कमी -जास्त प्रमाणात दुःख प्रत्येकाच्याच वाटेला येत असते ,
म्हणून तर सुखी माणसाचा सदरा शोधणे अत्यन्त अवघड असते ,
दुःखाने कुणी जोरात रडते ,कुणी बैचेन दिसते ,तर कुणी निमूट पणे सहन करते ,
जोरात रडून इतरांचे लक्ष वेधून घेणारे काही असतात ,
काहींना प्रदर्शन आवडत नाही ,ते मनातल्या मनात मुसमुसतात ,
काही 'लांडगा आलारे आला 'गोष्टी सारखे उगाचच ओरडतात ,
दुसऱ्याला फसवण्याच्या छंदात ,शेवटी स्वतःच फसतात ,
असत्य असते अल्पायुष्यी ,सत्याचा प्रवास लांब -अवघड ,पण तरणारे शेवटी तेच असतात ,
दुःख वाटले तर कमी होते ,सुख वाटले तर वाढते ,असे लोक म्हणतात ,
पण -काहींना इतरांशी काही देणे -घेणे नसते तर काही इतरांच्या दुःखातच सुखावतात ,
थोडेच का असेनात दुसऱ्याच्या सुखाने सुखावतात अन दुःखात धावून येतात ,तेच खरे आपले असतात .

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

. कवन -अमूर्ताचे मूर्ताशी मिलन

.                     कवन -अमूर्ताचे मूर्ताशी मिलन 
जीवन पथावर चालताना दोन्ही अनुभवले ,वनवास आणि नंदनवन ,
उन्हाचा चटका अन चंद्रिका यामधील जागाही जगले  आशेने ,हे बावरे मन ,
गेले ते विसर ,येणारे लाभतील कितीसर !वेड्या मना तू जग रे आजचा क्षण अन क्षण ,
व्यवहाराच्या ओझ्याखाली बिचकल्या भावना ,हे कविते !वाटले नव्हते ,मन प्रसवेल घेऊन तुझे तन ,
वाटले ,जगणे शिकविणारी मांडणी मृत नसावी ,त्याला असावे रूप -रंग -नाव -चलन -वलन ,
भावनांना चढविली शब्दांची वस्त्रे ,थोडे यमकादी अलंकार ,शिकविले थोडे यम -नियम पालन ,
श्रीगणेशा करण्या मागे नक्कीच होता ,अत्रि -अनुसयेचा त्रिमुखी नंदन ,
हे कवना !सर्व रसास्वादात लाभली तुझी साथ ,ऋतु कोणता का असो बहरत गेले उपवन ,
आता तर इतुकी जडली तुझी सवय ,की तुजविण उदास भासे जीवन ,
स्वान्तसुखाय असेल तव जन्माचे कारण ,पण एखादी कळी खुलवता अली तर माझ्या सवे तू ही होशील धन्य ,
कधी मूक ,कधी शब्द ,कधी स्वर स्वरूपात दिलीस साथ ,मज जगण्याचे तू ही एक प्रयोजन ........ तू ही ... 

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

मकरसंक्रांती

                      मकरसंक्रांती 
चिमुकल्या तिळावर गोड पाक चढविला ,
स्निग्धता अन गोडी एवढी की ,काटाही भाव खाऊन गेला ,
स्नेह -सुगंध -गोडवा ,पसरविण्याची अंगी असे कला ,
काटेरी गुलाब असो वा हलवा ,बरेच काही शिकवून जाई ,माणसाला ,
तीळ -गूळ घेऊन ,संक्रांतीचा सण आज आला ,
खूप -खूप शुभेच्छा ,माझ्याकडून आपल्याला . 
                                    आसावरी जोशी .

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

सुख -शास्त्र

          सुख -शास्त्र 
जीवन जगताना मानसशास्त्र -तत्वज्ञान -आध्यात्म अश्या अनेक शास्त्रांचे ज्ञान आपल्याला मिळते ,
बरेच वेळा ते कळत असते ,पण सहज कुठे वळते   ......... !!!!!
पाण्याच्या अर्ध्या ग्लासा कडे बघुन ,कोणी म्हणते अरेरे अर्धे पाणी सरले !
तर कुणी म्हणेल चिंता नसावी ,अजून अर्धे पाणी आहे उरले ,
पन्नाशी नंतर पूर्वार्धाचा डोंगर सर केल्याचा मानावा आनंद स्वाभिमानाने ,
शिखरावरून उत्तरार्धाच्या उतरणीची चिंता करत बसु नये माणसाने ,
सकारात्मकतेचा सूर्य भेदू शकतो ,नाकारात्मकतेचा भीषण अंधार ,
एक दार बंद झाले तर ,उघडलेले असते संधीचे दुसरे दार ,
यश मिळाले तर कष्ट -बुद्धी -सुसंधीचा करायचा घोष ,
अपयश पदरी पडले तर नशीब अन देवाला का बरे द्यायचा दोष ?
जीवन -शास्त्राच्या वहीतील पहिले पान म्हणजे जन्म आणि शेवटले मृत्यु ,हे असते नक्की ,
मधली पाने कमी -जास्त असू शकतात ,त्यांची संख्या माणसाला माहीत नसते पक्की ,
प्रत्येकाने असते ठरवायचे ,गणित कसे सोडवायचे !करून भागाकार -गुणाकार -बेरीज की वजाबाकी ?
पूर्वजन्म -पुनर्जन्म हेतर एक गुंतागुंतीचे कोडे    ......... !!!!!!
कोटि -कोटि जीवात ,आपल्याला लाभला मनुष्य -जन्म ,हेही नसे थोडे . 

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

. पिंड

.                            पिंड 
बरेच वेळा व्यक्ती -विकासात बुद्धयांक वाढीसाठी केला जातो प्रयत्न प्रचंड ,
योग्य भावनाविष्कारांना हि हवे तेवढेच महत्व ,नसावा न्यून किंवा अहंगंड ,
अनुवंश -देवाची देणगी ,योग्य आहार -संस्कार पोषण या सर्वांनी बनत असतो एक पिंड ,
एखाद्या गहन प्रश्नाला सामोरे जाताना ,कोणी वाकतो तर कोणी शरण जातो ,राहून एकदम थंड ,
कोणी म्हणतो मोडेन पण वाकणार नाही ,अन अन्याया विरुद्ध पुकारतो बंड ,
काही नैसर्गिक प्रवृत्ती नष्ट करता आल्या नाहीत तरी त्यावर मात करून त्यावर ठेवावा पाबंद ,
'जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या ' किमान एवढा तरी असावा मान -दंड ,
इतरांना सुखी करण्यासाठी निरिच्छपणे काही करता आलेतर ,समजावे आपण जगलो उदंड .

. कल्पवृक्ष


.                          कल्पवृक्ष 
परसातील पडलेला नारळ आबांनी सोलायला घेतला ,
दूरदेशाहून आलेल्या नातवंडांना मोठा प्रश्न पडला ,
आबा आबा !नारळ वरून आहे कडक ,पण आतून पाणीदार कोवळा ,
नारळ पील करायला आबा तुम्हाला खूपच कष्ट अन वेळ लागला ,
आबा म्हणाले मुलांनो !नारळाचे मन तरल -स्नेहल -धवल कमालीचे ,
म्हणून देवाने त्याला जपायला ,कडक कवच दिले करवंटीचे ,
वरून तंतुमय ,टिकाऊ ,उबदार पांघरुण ,जणू जाळीदार शाल ,
आई तुम्हाला थंडीपासून जपायला ,घालते कसा कपड्यांवरुन कोट ,हिरवा -चॉकलेटी -लाल ,
डोक्यावर जटा -शेंडी ,तीन डोळे असलेले शंकरा सारखे भाल ,
झाड कसे उंच -सडसडीत -एव्हरग्रीन ,कायम फळणारे -डुलणारे आनंद पसरवी भोवताल ,
बागेला सोबत करी सदा ,मग वसंत असो वा रखरखीत ग्रीष्मकाल ,
शुभकार्यात -देवपुजेत ,पाच फळांमधे एकतरी नारळ लागतोच किमान ,
आज्जी बनवते लाडू -वडी -मोदक ,चटणी आणि कित्तीतरी पौष्टिक पदार्थ छान ,
समुद्राचे खारे पाणी घेऊन ,बदल्यात गोड पाणी देण्याची ,याला किमया लाभली महान ,
नारळाचे झाड असो वा फळ प्रत्येक भाग उपयोगाचा ,म्हणून मिळाला त्याला कल्पवृक्षाचा मान .