बुधवार, २५ जानेवारी, २०१७

. कवन -अमूर्ताचे मूर्ताशी मिलन

.                     कवन -अमूर्ताचे मूर्ताशी मिलन 
जीवन पथावर चालताना दोन्ही अनुभवले ,वनवास आणि नंदनवन ,
उन्हाचा चटका अन चंद्रिका यामधील जागाही जगले  आशेने ,हे बावरे मन ,
गेले ते विसर ,येणारे लाभतील कितीसर !वेड्या मना तू जग रे आजचा क्षण अन क्षण ,
व्यवहाराच्या ओझ्याखाली बिचकल्या भावना ,हे कविते !वाटले नव्हते ,मन प्रसवेल घेऊन तुझे तन ,
वाटले ,जगणे शिकविणारी मांडणी मृत नसावी ,त्याला असावे रूप -रंग -नाव -चलन -वलन ,
भावनांना चढविली शब्दांची वस्त्रे ,थोडे यमकादी अलंकार ,शिकविले थोडे यम -नियम पालन ,
श्रीगणेशा करण्या मागे नक्कीच होता ,अत्रि -अनुसयेचा त्रिमुखी नंदन ,
हे कवना !सर्व रसास्वादात लाभली तुझी साथ ,ऋतु कोणता का असो बहरत गेले उपवन ,
आता तर इतुकी जडली तुझी सवय ,की तुजविण उदास भासे जीवन ,
स्वान्तसुखाय असेल तव जन्माचे कारण ,पण एखादी कळी खुलवता अली तर माझ्या सवे तू ही होशील धन्य ,
कधी मूक ,कधी शब्द ,कधी स्वर स्वरूपात दिलीस साथ ,मज जगण्याचे तू ही एक प्रयोजन ........ तू ही ... 

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

मकरसंक्रांती

                      मकरसंक्रांती 
चिमुकल्या तिळावर गोड पाक चढविला ,
स्निग्धता अन गोडी एवढी की ,काटाही भाव खाऊन गेला ,
स्नेह -सुगंध -गोडवा ,पसरविण्याची अंगी असे कला ,
काटेरी गुलाब असो वा हलवा ,बरेच काही शिकवून जाई ,माणसाला ,
तीळ -गूळ घेऊन ,संक्रांतीचा सण आज आला ,
खूप -खूप शुभेच्छा ,माझ्याकडून आपल्याला . 
                                    आसावरी जोशी .

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

सुख -शास्त्र

          सुख -शास्त्र 
जीवन जगताना मानसशास्त्र -तत्वज्ञान -आध्यात्म अश्या अनेक शास्त्रांचे ज्ञान आपल्याला मिळते ,
बरेच वेळा ते कळत असते ,पण सहज कुठे वळते   ......... !!!!!
पाण्याच्या अर्ध्या ग्लासा कडे बघुन ,कोणी म्हणते अरेरे अर्धे पाणी सरले !
तर कुणी म्हणेल चिंता नसावी ,अजून अर्धे पाणी आहे उरले ,
पन्नाशी नंतर पूर्वार्धाचा डोंगर सर केल्याचा मानावा आनंद स्वाभिमानाने ,
शिखरावरून उत्तरार्धाच्या उतरणीची चिंता करत बसु नये माणसाने ,
सकारात्मकतेचा सूर्य भेदू शकतो ,नाकारात्मकतेचा भीषण अंधार ,
एक दार बंद झाले तर ,उघडलेले असते संधीचे दुसरे दार ,
यश मिळाले तर कष्ट -बुद्धी -सुसंधीचा करायचा घोष ,
अपयश पदरी पडले तर नशीब अन देवाला का बरे द्यायचा दोष ?
जीवन -शास्त्राच्या वहीतील पहिले पान म्हणजे जन्म आणि शेवटले मृत्यु ,हे असते नक्की ,
मधली पाने कमी -जास्त असू शकतात ,त्यांची संख्या माणसाला माहीत नसते पक्की ,
प्रत्येकाने असते ठरवायचे ,गणित कसे सोडवायचे !करून भागाकार -गुणाकार -बेरीज की वजाबाकी ?
पूर्वजन्म -पुनर्जन्म हेतर एक गुंतागुंतीचे कोडे    ......... !!!!!!
कोटि -कोटि जीवात ,आपल्याला लाभला मनुष्य -जन्म ,हेही नसे थोडे . 

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

. पिंड

.                            पिंड 
बरेच वेळा व्यक्ती -विकासात बुद्धयांक वाढीसाठी केला जातो प्रयत्न प्रचंड ,
योग्य भावनाविष्कारांना हि हवे तेवढेच महत्व ,नसावा न्यून किंवा अहंगंड ,
अनुवंश -देवाची देणगी ,योग्य आहार -संस्कार पोषण या सर्वांनी बनत असतो एक पिंड ,
एखाद्या गहन प्रश्नाला सामोरे जाताना ,कोणी वाकतो तर कोणी शरण जातो ,राहून एकदम थंड ,
कोणी म्हणतो मोडेन पण वाकणार नाही ,अन अन्याया विरुद्ध पुकारतो बंड ,
काही नैसर्गिक प्रवृत्ती नष्ट करता आल्या नाहीत तरी त्यावर मात करून त्यावर ठेवावा पाबंद ,
'जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या ' किमान एवढा तरी असावा मान -दंड ,
इतरांना सुखी करण्यासाठी निरिच्छपणे काही करता आलेतर ,समजावे आपण जगलो उदंड .

. कल्पवृक्ष


.                          कल्पवृक्ष 
परसातील पडलेला नारळ आबांनी सोलायला घेतला ,
दूरदेशाहून आलेल्या नातवंडांना मोठा प्रश्न पडला ,
आबा आबा !नारळ वरून आहे कडक ,पण आतून पाणीदार कोवळा ,
नारळ पील करायला आबा तुम्हाला खूपच कष्ट अन वेळ लागला ,
आबा म्हणाले मुलांनो !नारळाचे मन तरल -स्नेहल -धवल कमालीचे ,
म्हणून देवाने त्याला जपायला ,कडक कवच दिले करवंटीचे ,
वरून तंतुमय ,टिकाऊ ,उबदार पांघरुण ,जणू जाळीदार शाल ,
आई तुम्हाला थंडीपासून जपायला ,घालते कसा कपड्यांवरुन कोट ,हिरवा -चॉकलेटी -लाल ,
डोक्यावर जटा -शेंडी ,तीन डोळे असलेले शंकरा सारखे भाल ,
झाड कसे उंच -सडसडीत -एव्हरग्रीन ,कायम फळणारे -डुलणारे आनंद पसरवी भोवताल ,
बागेला सोबत करी सदा ,मग वसंत असो वा रखरखीत ग्रीष्मकाल ,
शुभकार्यात -देवपुजेत ,पाच फळांमधे एकतरी नारळ लागतोच किमान ,
आज्जी बनवते लाडू -वडी -मोदक ,चटणी आणि कित्तीतरी पौष्टिक पदार्थ छान ,
समुद्राचे खारे पाणी घेऊन ,बदल्यात गोड पाणी देण्याची ,याला किमया लाभली महान ,
नारळाचे झाड असो वा फळ प्रत्येक भाग उपयोगाचा ,म्हणून मिळाला त्याला कल्पवृक्षाचा मान .