. कवन -अमूर्ताचे मूर्ताशी मिलन
जीवन पथावर चालताना दोन्ही अनुभवले ,वनवास आणि नंदनवन ,
उन्हाचा चटका अन चंद्रिका यामधील जागाही जगले आशेने ,हे बावरे मन ,
गेले ते विसर ,येणारे लाभतील कितीसर !वेड्या मना तू जग रे आजचा क्षण अन क्षण ,
व्यवहाराच्या ओझ्याखाली बिचकल्या भावना ,हे कविते !वाटले नव्हते ,मन प्रसवेल घेऊन तुझे तन ,
वाटले ,जगणे शिकविणारी मांडणी मृत नसावी ,त्याला असावे रूप -रंग -नाव -चलन -वलन ,
भावनांना चढविली शब्दांची वस्त्रे ,थोडे यमकादी अलंकार ,शिकविले थोडे यम -नियम पालन ,
श्रीगणेशा करण्या मागे नक्कीच होता ,अत्रि -अनुसयेचा त्रिमुखी नंदन ,
हे कवना !सर्व रसास्वादात लाभली तुझी साथ ,ऋतु कोणता का असो बहरत गेले उपवन ,
आता तर इतुकी जडली तुझी सवय ,की तुजविण उदास भासे जीवन ,
स्वान्तसुखाय असेल तव जन्माचे कारण ,पण एखादी कळी खुलवता अली तर माझ्या सवे तू ही होशील धन्य ,
कधी मूक ,कधी शब्द ,कधी स्वर स्वरूपात दिलीस साथ ,मज जगण्याचे तू ही एक प्रयोजन ........ तू ही ...
बुधवार, २५ जानेवारी, २०१७
शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७
मकरसंक्रांती
मकरसंक्रांती
चिमुकल्या तिळावर गोड पाक चढविला ,
स्निग्धता अन गोडी एवढी की ,काटाही भाव खाऊन गेला ,
स्नेह -सुगंध -गोडवा ,पसरविण्याची अंगी असे कला ,
काटेरी गुलाब असो वा हलवा ,बरेच काही शिकवून जाई ,माणसाला ,
तीळ -गूळ घेऊन ,संक्रांतीचा सण आज आला ,
खूप -खूप शुभेच्छा ,माझ्याकडून आपल्याला .
आसावरी जोशी .
चिमुकल्या तिळावर गोड पाक चढविला ,
स्निग्धता अन गोडी एवढी की ,काटाही भाव खाऊन गेला ,
स्नेह -सुगंध -गोडवा ,पसरविण्याची अंगी असे कला ,
काटेरी गुलाब असो वा हलवा ,बरेच काही शिकवून जाई ,माणसाला ,
तीळ -गूळ घेऊन ,संक्रांतीचा सण आज आला ,
खूप -खूप शुभेच्छा ,माझ्याकडून आपल्याला .
आसावरी जोशी .
बुधवार, ११ जानेवारी, २०१७
सुख -शास्त्र
सुख -शास्त्र
जीवन जगताना मानसशास्त्र -तत्वज्ञान -आध्यात्म अश्या अनेक शास्त्रांचे ज्ञान आपल्याला मिळते ,
बरेच वेळा ते कळत असते ,पण सहज कुठे वळते ......... !!!!!
पाण्याच्या अर्ध्या ग्लासा कडे बघुन ,कोणी म्हणते अरेरे अर्धे पाणी सरले !
तर कुणी म्हणेल चिंता नसावी ,अजून अर्धे पाणी आहे उरले ,
पन्नाशी नंतर पूर्वार्धाचा डोंगर सर केल्याचा मानावा आनंद स्वाभिमानाने ,
शिखरावरून उत्तरार्धाच्या उतरणीची चिंता करत बसु नये माणसाने ,
सकारात्मकतेचा सूर्य भेदू शकतो ,नाकारात्मकतेचा भीषण अंधार ,
एक दार बंद झाले तर ,उघडलेले असते संधीचे दुसरे दार ,
यश मिळाले तर कष्ट -बुद्धी -सुसंधीचा करायचा घोष ,
अपयश पदरी पडले तर नशीब अन देवाला का बरे द्यायचा दोष ?
जीवन -शास्त्राच्या वहीतील पहिले पान म्हणजे जन्म आणि शेवटले मृत्यु ,हे असते नक्की ,
मधली पाने कमी -जास्त असू शकतात ,त्यांची संख्या माणसाला माहीत नसते पक्की ,
प्रत्येकाने असते ठरवायचे ,गणित कसे सोडवायचे !करून भागाकार -गुणाकार -बेरीज की वजाबाकी ?
पूर्वजन्म -पुनर्जन्म हेतर एक गुंतागुंतीचे कोडे ......... !!!!!!
कोटि -कोटि जीवात ,आपल्याला लाभला मनुष्य -जन्म ,हेही नसे थोडे .
जीवन जगताना मानसशास्त्र -तत्वज्ञान -आध्यात्म अश्या अनेक शास्त्रांचे ज्ञान आपल्याला मिळते ,
बरेच वेळा ते कळत असते ,पण सहज कुठे वळते ......... !!!!!
पाण्याच्या अर्ध्या ग्लासा कडे बघुन ,कोणी म्हणते अरेरे अर्धे पाणी सरले !
तर कुणी म्हणेल चिंता नसावी ,अजून अर्धे पाणी आहे उरले ,
पन्नाशी नंतर पूर्वार्धाचा डोंगर सर केल्याचा मानावा आनंद स्वाभिमानाने ,
शिखरावरून उत्तरार्धाच्या उतरणीची चिंता करत बसु नये माणसाने ,
सकारात्मकतेचा सूर्य भेदू शकतो ,नाकारात्मकतेचा भीषण अंधार ,
एक दार बंद झाले तर ,उघडलेले असते संधीचे दुसरे दार ,
यश मिळाले तर कष्ट -बुद्धी -सुसंधीचा करायचा घोष ,
अपयश पदरी पडले तर नशीब अन देवाला का बरे द्यायचा दोष ?
जीवन -शास्त्राच्या वहीतील पहिले पान म्हणजे जन्म आणि शेवटले मृत्यु ,हे असते नक्की ,
मधली पाने कमी -जास्त असू शकतात ,त्यांची संख्या माणसाला माहीत नसते पक्की ,
प्रत्येकाने असते ठरवायचे ,गणित कसे सोडवायचे !करून भागाकार -गुणाकार -बेरीज की वजाबाकी ?
पूर्वजन्म -पुनर्जन्म हेतर एक गुंतागुंतीचे कोडे ......... !!!!!!
कोटि -कोटि जीवात ,आपल्याला लाभला मनुष्य -जन्म ,हेही नसे थोडे .
बुधवार, ४ जानेवारी, २०१७
. पिंड
. पिंड
बरेच वेळा व्यक्ती -विकासात बुद्धयांक वाढीसाठी केला जातो प्रयत्न प्रचंड ,
योग्य भावनाविष्कारांना हि हवे तेवढेच महत्व ,नसावा न्यून किंवा अहंगंड ,
अनुवंश -देवाची देणगी ,योग्य आहार -संस्कार पोषण या सर्वांनी बनत असतो एक पिंड ,
एखाद्या गहन प्रश्नाला सामोरे जाताना ,कोणी वाकतो तर कोणी शरण जातो ,राहून एकदम थंड ,
कोणी म्हणतो मोडेन पण वाकणार नाही ,अन अन्याया विरुद्ध पुकारतो बंड ,
काही नैसर्गिक प्रवृत्ती नष्ट करता आल्या नाहीत तरी त्यावर मात करून त्यावर ठेवावा पाबंद ,
'जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या ' किमान एवढा तरी असावा मान -दंड ,
इतरांना सुखी करण्यासाठी निरिच्छपणे काही करता आलेतर ,समजावे आपण जगलो उदंड .
बरेच वेळा व्यक्ती -विकासात बुद्धयांक वाढीसाठी केला जातो प्रयत्न प्रचंड ,
योग्य भावनाविष्कारांना हि हवे तेवढेच महत्व ,नसावा न्यून किंवा अहंगंड ,
अनुवंश -देवाची देणगी ,योग्य आहार -संस्कार पोषण या सर्वांनी बनत असतो एक पिंड ,
एखाद्या गहन प्रश्नाला सामोरे जाताना ,कोणी वाकतो तर कोणी शरण जातो ,राहून एकदम थंड ,
कोणी म्हणतो मोडेन पण वाकणार नाही ,अन अन्याया विरुद्ध पुकारतो बंड ,
काही नैसर्गिक प्रवृत्ती नष्ट करता आल्या नाहीत तरी त्यावर मात करून त्यावर ठेवावा पाबंद ,
'जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या ' किमान एवढा तरी असावा मान -दंड ,
इतरांना सुखी करण्यासाठी निरिच्छपणे काही करता आलेतर ,समजावे आपण जगलो उदंड .
. कल्पवृक्ष
. कल्पवृक्ष
परसातील पडलेला नारळ आबांनी सोलायला घेतला ,
दूरदेशाहून आलेल्या नातवंडांना मोठा प्रश्न पडला ,
आबा आबा !नारळ वरून आहे कडक ,पण आतून पाणीदार कोवळा ,
नारळ पील करायला आबा तुम्हाला खूपच कष्ट अन वेळ लागला ,
आबा म्हणाले मुलांनो !नारळाचे मन तरल -स्नेहल -धवल कमालीचे ,
म्हणून देवाने त्याला जपायला ,कडक कवच दिले करवंटीचे ,
वरून तंतुमय ,टिकाऊ ,उबदार पांघरुण ,जणू जाळीदार शाल ,
आई तुम्हाला थंडीपासून जपायला ,घालते कसा कपड्यांवरुन कोट ,हिरवा -चॉकलेटी -लाल ,
डोक्यावर जटा -शेंडी ,तीन डोळे असलेले शंकरा सारखे भाल ,
झाड कसे उंच -सडसडीत -एव्हरग्रीन ,कायम फळणारे -डुलणारे आनंद पसरवी भोवताल ,
बागेला सोबत करी सदा ,मग वसंत असो वा रखरखीत ग्रीष्मकाल ,
शुभकार्यात -देवपुजेत ,पाच फळांमधे एकतरी नारळ लागतोच किमान ,
आज्जी बनवते लाडू -वडी -मोदक ,चटणी आणि कित्तीतरी पौष्टिक पदार्थ छान ,
समुद्राचे खारे पाणी घेऊन ,बदल्यात गोड पाणी देण्याची ,याला किमया लाभली महान ,
नारळाचे झाड असो वा फळ प्रत्येक भाग उपयोगाचा ,म्हणून मिळाला त्याला कल्पवृक्षाचा मान .
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)