मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

देऊळ

                             देऊळ 
देव असतो सगळी कडे ,जळी -स्थळी -आकाशी -काष्ठी अन पाषाणी ,
भक्तांच्या आर्त हाकेला ,धावून येतो कोणताही रूपात ,कोणत्याही ठिकाणी ,
तरी नवीन वर्ष ,सणवार किंवा एखाद्या विशेष दिनी ,
आपण जातोच ना देवळात ,टेकायला मस्तक परमेश्वर चरणी . 
कारण देवळातील -----------


शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

मी मराठी -मध्यम वर्गीय

              मी मराठी -मध्यम वर्गीय 
(२६-२-२०१२ - जागतिक मराठी भाषादिना निमित्त )
असावे एखादे घर ,शाळा -मार्केट पासून जवळ टुमदार -सुबक ,
अधून -मधून नाटक -सिनेमा ,सहल घडावी अष्टविनायक ,
गरजे पुरती असावी आवक ,अडीअडचणीला थोडीशी शिल्लक ,
कधीतरी ठीक आहे हॉटेलिंग ,वडापाव पिज्जा -बर्गर ,
बरे वाटते घरचे ,वरणभात ,भाजी पोळी पोटभर ,
कोका पेक्षा कोकम चालतं ,हार्डड्रिंक सगळं मनातील बोलतं ,
सणासुदीला एखादा दागिना ,झब्बा -साडी ,
गरजे साठी स्कुटर सायकल ,स्टेटस साठी एखादी गाडी ,
कामाची जागा हवी घरा जवळ , परगावची सोसत नाही फार धावपळ ,
दुकान उघडायचे टाईम टू टाईम ,लोकेशन हवे एकदम प्राईम ,
आमची कोठेही शाखा नसते ,जातनाही आम्ही आडवळणी रस्ते ,
धंद्यात नको रिस्क हाय ,पांघरूण पाहुन पसरायचे पाय ,
क्वचितच दिसतो मोठा मराठी देणगीदार ,कर्जही नको पैश्याचे चार ,
हळूहळू कळू लागलय पैश्याचे महत्व ,पण सोडणार नाही आपली तत्व ,
चौकोनी कुटुंबात सुखानी रहावे ,उतारवयात मुलांनी विचारावे ,
भाषा -संस्कृती जपायचे ओझे यांच्यावर सोपवून निश्चितं व्हावे ,
मातृभाषा बोलणे म्हणे डाऊन मार्केट ,असे ऐकू येते काई बाई ,
पण आई ती आईच ,तिची सर देवालाही आली नाही ....... 

गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

धुराडे

                   धुराडे 
व्यसनी -अपराधी स्वतःला कधीच देत नसतो दोष ,
पळवाट काढून दुसऱ्यांवर काढत राहायचा रोष ,
स्मोकर म्हणतो ,तुम्ही करता ते पवित्र होम -हवन ,
आमच्या धुराला मात्र म्हणायचे पोल्यूशन ,
तुम्ही बुरसट ,काय कळणार तुम्हाला फॅशन !
आम्ही प्रॅक्टिकल ,तुम्हीच जपा फालतू इमोशन ,
व्यसनी माणसांनो लक्षात ठेवा ,बरे नव्हे कोणतेच ऍडिक्शन ,
कोणतेही व्यसन असूच शकत नाही एखाद्या समस्येचे सोल्युशन . 

ब्रह्मांड

                     ब्रह्मांड 
ब्रह्मांडी ते पिंडी ,पिंडी ते ब्रह्मांडी ,
धूलीकण -ओलावा -प्रकाश वायु संगे आकाशी अवतरले इंद्रधनुष्य ,
भूमातेच्या कुशीतून रंगछटांचा आनंद घेई ,पंचतत्वांचा कुंभ मनुष्य ,
निसर्गाच्या कुंचल्यातून चितारलेल्या रंगानांही लाभला मातीचा सुगंध ,
अगन -गगन -पवन -जीवन -धरण सर्वांचे मिश्रण म्हणजे निखळ आनंद ,निखळ आनंद . 

प्रश्न

                         प्रश्न 
सर्वांना दूरदेशी पाठवताना मन का जड होत नाही ?
त्यांच्याच सुखात आपले सुख ,म्हणून सोडायचे काही ,
पिल्लांचे पंख बळकट व्हावे म्हणून आधी झटायचे ,
उंच भरारी मारायला लागली की आपणच का पंख छाटायचे ?

प्रार्थना

                      प्रार्थना 
भूतकाळ उगाळायचा असेलच छंद ,
तर त्याचा असावा ,चंदनासम शीतल सुगंध ,
आला दिवस आनंदात जावो ही प्रार्थना असावी ,
भविष्याचे नियोजन असावे पण चिंता नसावी .

गणित एक अवघड विषय

                    गणित एक अवघड विषय 
घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच व्हावे 
उजव्या हाताने देताना ,डाव्याला माहित नसावे ,
दोन्ही हाताने घेताना व्याजाचे गणित पक्के असावे ,
दातृत्वाच्या कडीने वाढत -वाढत साखळी व्हावे ,
समाजात देणारे जास्त ,घेणारे नाममात्र उरावे .

इच्छा

                          इच्छा
आपलीच भाकरी भाजणे हातर स्वार्थ ,
कुटुंबाच्या भाकरी भाजण्याला आहे अर्थ ,
लष्कराच्या ..... भाजणे म्हणजे परमार्थ ,
इच्छा मागणे एकच -सार्थ जीवन न जावो व्यर्थ .

घडलं -बिघडलं

                      घडलं -बिघडलं 
आयुष्यात घडायचे ते घडतच असते ,
चांगले घडले म्हणून उतू नये ,
वाईट घडले म्हणून खचू नये ,
आपण चांगल्या साठी निमित्त झालोतर 'लकी '
मात्र कुणाच्या वाईटाला कारण होऊ नये नक्की ,

चाहुल

                  चाहुल 
दुधापेक्षा साय गोड असते ,
मुद्दलीला व्याजाची जोड हवीहवीशी असते ,
मुलांपेक्षा नातवंडांची ओढ असते ,
आई च्या भूमिकेत कडक -शिस्तप्रिय असते ,
आज्जी झाली की कधीतरी चुकीचीही कड घेत असते ,
कळते पण वळत नाही  कारण ती भूमिका जगत असते ,
दुधापेक्षा साय पचायला जरा जडच असते . 

माणुसकी

             माणुसकी 
दुसऱ्याच्या दुःखात होणे दुःखी ,
सुखात होणे सुखी ,
हीचतर खरी माणुसकी ,
सोपी आहे डेफिनेशन ,
किती अवघड ऍप्लिकेशन ,
बरेच असतात आपल्या दुःखात सुखावणारे ,
आणि दुसऱ्याचा सुखात हळहळणारे ,
तिसरा प्रकार "घातकरी "
'मुंह में राम बगल में छुरी '

भवसागर

                   भवसागर 
कुणाला आवडेल का दुःखाला मिठी मारणे !
भावतेच ना आरपार पोहत जाणे ,
गोते खाण्यापेक्षा बरे एखाद्या आधाराने थांबणे ,
डुबताना काडीचाही आधार भक्कम वृक्षासम वाटणे !
संधी मिळताच अनिवार्य पुन्हा हात -पाय मारणे ,
भाग्यात लागते आधार अन संधी लाभणे ,
पुढे आपल्याच हातात असते संधीचे सोने करणे ,
शेवटी आनंद टिकवायचा असेल तर उत्तम  असते प्राप्त परिस्तिथी स्वीकारणे ,
यालाच म्हणतात भवसागर तरून जाणे  ...... .... .... 
पुढची अवघड पाहिरी म्हणजे जिवा -शिवा ची गळाभेट होणे . 

सूर्य

               सूर्य 
छोटू -छोटू सूर्याने लावला गॉगल बघ ,दाटुन आले काळे ढग ,
मित्राच्या कपाळावर घामाच्या धारा ,वाहू लागला वादळ वारा ,
रवीने घेतला हातात ब्रश ,नभी चितारला इंद्रधनुष ,
भानुने बदलली अलगद कूस ,पडायला लागला उघडा पाऊस ,
खग बसला ढगा मागे जाऊन ,पाऊस आला धरणीवर धावून ,
भास्कर बुआंनी चढविला सोनेरी वर्ख ,तुम्हीतर राव ग्रह -ताऱ्यांचे अर्क ,
सोन्याच्या गोळ्याला नावे अनेक ,हिरण्यगर्भ -मरीच -आदित्य -सवित्र आणि पूषण ,
सकल सृष्टीचे सौंदर्य वाढविणारे तुम्हीचतर सुवर्ण आभूषण . 
सूर्याला वंदन करावे सदा ,म्हणजे लाभेल आरोग्य -संपदा

गुण -दोष

                 गुण -दोष 
नकळत केलेली वाईट कृती चूक असू शकते ,
पण समजून उमजून केलेली वाईट गोष्ट कट कारस्थान असते ,
पहिल्या चुकीला माफी असू शकते ,
पण कट म्हणजे गुन्हा ,आणि त्याला शिक्षा व्हावीच लागते ,
तसे सर्वगुणसम्पन्न कोणीच नसते ,
पण एखाद्यावर प्रेम करताना वाटते ,
गुणांचे पारडे जड असावे ,
दुर्गुण दुर्लक्ष करण्याजोगे असावेत

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

. जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

.      जगी  सर्व सुखी असा कोण आहे ?
मग दुःखाचा कशाला करून घ्यायचा त्रास ,
चिखलातच कमल पुष्पांचा निवास ,
दगड मातीतच नवरत्नांची आस ,
काट्यातच गुलाबांचा' सु 'वास ,
आपणच ठरवायचे रिता का भरलेला अर्धा ग्लास ,
ना जनाची ना मनाची लाज ,म्हणे निर्लज्जम सदा सुखी ,
लोक स्तुती करतात तोंडदेखी ,पण त्याची किंमत नसते कुणाच्या लेखी ,
वागताना आपल्या जागी दुसऱ्याला ठेवून बघावे ,
अन साऱ्यांनी सुख -सागरात न्हाऊन निघावे . 

जमा -खर्च सत्य -असत्य

             जमा -खर्च सत्य -असत्य 
जमा खर्चाच्या वहीत ,हिशोब तसा चोख नसतो ,
ज्याच्या -त्याच्या सोई प्रमाणे ,नफा किंवा तोटा असतो ,
सत्याला लागते पुराव्याची गरज ,
खोट्यावर विश्वास ठेवला जातो सहज ,
पण सत्याचाच विजय होतो शेवटी ,
असत्याची वाट एकाकी एकटी .

फोटो

            फोटो 
जुने झाले फोटो श्वेत -धवल ,
रोल धुणे ,निगेटिव्ह जपणे आणि साठवणे फोटो फिजिकल ,
नव्याने आले फोटो डिजिटल ,काढा ,साठवा ,लगेचच पाठवू शकता ग्लोबल ,
रंगीत -सुंदर खऱ्या खोट्याची होत नाही पटकन उकल ,
टिपता येते देवादिक -आप्त -मित्र अन निसर्गाची हलचल ,
जुने ते सोने ,काहीवेळेला सौंदर्य वाढवतात ,फोटो श्वेत -धवल 
कष्ट वाचवणारी फोटोकॉपी म्हणजे सेकंदात हुबेहूब केलेली नक्कल ,
एक्सरे ,सोनोग्राफी तर वैद्यकशास्त्रातील जादू मॅजिकल ,
जीवदान देण्यास करतात मदत ,फोटो क्लीनीकल .

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

आयुष्य जगणे

             आयुष्य जगणे 
जन्म -मरणाला जोडणाऱ्या साखळी चे नाव आयुष्य ,
पूर्वजन्म -पुनर्जन्म यावर मोठ्या -मोठ्यांनी केले भाष्य ,
दिसत नाही ,आठवत नाही ते का वाटू नये असत्य ,
जगणे करावे सार्थक हेच खरे सत्य ,
मिळालेले जीवन काही काढतात ,तर जगतात काहीजण ,
कोणी सदा दुर्मुखलेले ,दिशाहीन भटकतात रानोवन ,
तर कोणी करतात रानाचेही नंदनवन ,
माणूस एकटा येतो ,एकटाची जातो हे जरी खरे ,
सुख -दुःखात आले कुणी धावून तर वाटतेच ना बरे ,
काहींना वाटते पैसा हवा बास्स ,नसूदे कुणाची साथ ,
पण नाळ कापायला अन उचलायला ,लागतातच माणसाचे हात . 

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

पुण्यातील रिक्षा

          पुण्यातील रिक्षा 
पुण्यातील रिक्षा ,म्हणे प्रवाश्यांना शिक्षा ,
येणार नाही जवळ ,जाणार नाही लांब ,
घाई च्या वेळेत पेट्रोल घ्यायला थांब ,
लो टर्नओव्हर हाय मार्जिनवर हवा असतो धंदा ,
ओला ,उबर ,शेअर रिक्षाला विरोध ,कारण स्पर्धा आली की होतो वांधा ,
मीटर असून पैसे मागणार जे येईल मनाला ,
कधीच सुटे पैसे नसतात गिऱ्हाइकाला परत द्यायला ,
हे जणू पुरेसे नाही प्रवाश्याला वैतागायला ,
ट्रॅफिक ,स्पीड ब्रेकर पोल्युशन ने लागते डचमळायला ,
एकदाचे हश्श होते ,सुखरूप पोहोचल्यावर मुक्कामाला ,
एखादा देव माणूस भेटतो ,मग वाईट होते विसरायला 

नार सुगरण

               नार सुगरण 
सुगरण नार ओळखा कोण ,जिला येते शिवण टिपण ,
बनवता येते सुग्रास जेवण ,
स्वभावातच काटकसर ,सेवाभाव ,प्रेम अन आपलेपण ,
बदलत गेली परिस्थिती ,परिभाषा अन वातावरण ,
महिलादिन झाला एक महत्वाचा सण ,
नाजुक नार झाली दे दणादण ,
कंट्रोल केले सेलफोन ,स्कुटर ,अवकाश यान ,कॉम्प्युटर चे बटन ,
तीही सुगरण ,ही पण सुगरण ,
परिस्थिती प्रमाणे बदलण्यातच असते खरे शहाणपण .

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा

सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा 
उगवला दिन सोनियाचा ,नसे आनंदासी पारावार ,
फुलले आनंदाने श्री मोरेश्वर गोसावींचे कुटुम्ब -आप्त -मित्र परिवार ,
सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्या निमित्त देऊ सदिच्छा ,आपणास लाभो सुख -शांती -आयु -आरोग्याचे ऐश्वर्य अपार ,
शैक्षणिक ,सामाजिक ,धार्मिक सर्वच चांगल्या कामात ,आपला असतो हातभार ,
सूर्याचे तेज ,चंद्राची शीतलता ,लक्ष्मी -सरस्वती आनंदाने एकत्र नांदे ,असा हा आदर्श परिवार ,
मुले -सुना ,कन्या -जामात ,नातवंडे ,सहचारिणी चा लाभला भक्कम आधार ,
एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळू नये ,असे उच्च आपले विचार ,
नशिबाने नाशिक नगरी कर्मभूमि लाभली ,करणारी भक्तांचा उद्धार ,
कर्तुत्वाला दातृत्वाची जोड ,जणू सुगंधित आभूषण घडविणारा सुवर्णकार ,
एकच प्रार्थना ,होवो शताब्दीकडे वाटचाल ,करुनि ईश्वर चरणी नमस्कार .

मार्केट

मार्केट 
डिमांड पेक्षा सप्लाय जास्त झाला तर किंमत घसरते ,
पुरवठा कमी अन मागणी जास्त झाली तर मार्केट वर जाते ,
खऱ्या प्रेमाच्या गणितात मात्र उलट परिस्थिती असते ,
जेवढे जास्त द्याल ,तेवढे जास्त परत मिळते ,
बाजार मांडला तर मार्जिनल यूटिलिटी ला मोल ठरते ,
सफल प्रेमात टू वे ट्रॅफिक लागते ,सुवर्ण मध्य ठरवून भेटता येते ,
मार्केट असो वा कोणतीही वाट ,नेहमी गती एकसारखी नसते ,
स्पीड ब्रेकर ,चढ -उतार ,वळणे आली की गती मंदावणे सहाजिक असते ,
शेवटी हॅप्पी आणि सेफ जर्नी डेस्टिनेशन चा आनंद द्विगुणित करते .

रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

. कांदा कहाणी

.            कांदा कहाणी 
ऐंशीने झाले कांदे ,खायचे झाले वांधे ,
राजकारणी एकमेकास निंदे ,त्यात ही उलट -सुलट धंदे ,
पूर्वी कांदा -भाकर समजले जाई गरीबांचे खाणे ,
आता म्हणे पार्टी श्रीमंत आहे ,पार्टीत कांदाभजी खाऊन तृप्त झाले पाहुणे ,
आधी कांदा चिरताना डोळ्यात यायचे पाणी ,
आता येते पाणी, ऐकून कांद्याच्या किंमतीची कहाणी .

लव्ह &वॉर

                लव्ह &वॉर  
आझादीकी आगसे टूट सकती है ,गुलामीकी जंजीर ,
दूध में उबल उबल करही ,चावल की बनती है खीर ,
आमने -सामने लडनेवाले को कहा जाता है वीर ,
व्यक्ती हो या देश ,प्रेममें लड मरने वालेको सताती नहीं कोई फिकिर ,
लव्ह और वॉर में हुए छल को लोग कहते हैं तकदीर ,
जीतने के लिये अच्छे अच्छे को पीछेसे भोंकना पडता है खंजीर ,
बाणोसे तीखा होता है ,कलम से निकला शब्दोंका तीर ,
साम -दाम -दंड -भेद कई हतखंडे अपनाके करना पडता है ,दूध का दूध नीर का नीर . 

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

कालचक्र

      कालचक्र 
वर उन्ह ,खाली खडक ,छाटणे कापणे सोसत झाडाने जगायचे असते ,
बहरलेल्या वृक्षा खाली अनेकांना विसावायचे भाग्य लाभते ,
कुणीच पानझडीने वैतागून जायचे नसते ,
पिकले पान पडायचेच ,मगच नव्या पालवीला डुलायला मिळते ,
ऋतु असो वा जीवन ,चक्रा संगे गतीशील राहायचे असते .

अंधाराकडून प्रकाशाकडे

                    अंधाराकडून प्रकाशाकडे 
सुंदर स्वप्न जन्माला आले ,
मध्यरात्री लागली होती झोप गाढ ,
वादळ -विजा ,आवाज आला कडाड कडाड ,
अचानक उन्मळून पडले एक झाड ,
गांगरले ,बावरले जाग येऊन स्वप्न होते असे कळले ,
काहीच कळेना ,स्वप्नाने इतके का पछाडले ,
उजाडल्याने डोळे उघडले ,अन सावरुन पुनः कामाला लागले . 

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

सॉरी थँक्यू

        सॉरी थँक्यू 
चुकतो म्हणूनच आपण माणूस असतो ,
नाहीतर देवच झालो नसतो !!
सॉरी म्हणून बिनधास्त चुका करण्याची नसावी तयारी ,
कळत -नकळत घडलेल्या चुकांसाठी म्हणायचे असते सॉरी . 
जगताना सर्वांनाच एकमेकांची गरज भासते ,
थँक्यू म्हणणे कृतज्ञता दर्शविण्याचे नुसते एक साधन असते ,
सॉरी -थँक्यू भावना दर्शविण्या साठी इंग्रजीने दिलेली शब्दांची एक देणगी ,त्याचा जाणावा मर्म ,
कृतज्ञता कृतीतून दाखवायची ,ही आपली संस्कृती अन धर्म ,
लक्षात असावे ,नेहमी सोबत असते आपल्या सोबत आपले कर्म .

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

बो .ब . -डोन्ट शाय

             बो .ब . -डोन्ट शाय 
डोन्ट शाय ,डोन्ट शाय ,यू आर अ बोल्ड बॉय ,
डोन्ट क्राय ,डोन्ट क्राय ,यू आर अ ब्रेव्ह बॉय ,
बी हॅपी ,डोन्ट बी सॅड ,यू आर अ गुड बॉय ,
एन्जॉय अँड गिव मी हाय फाय ..... बाय बाय ,
नाऊ यू आर मॉम अँड डॅडीज बॉय ,एन्जॉय -एन्जॉय . 

जो जो रे जो जो (पारंपरिक )

            जो जो रे जो जो (पारंपरिक )
जोजो रे जोजो तान्हुल्या बाळा ,तुझी आई गेली शिंपी आळीला 
शिंपी हो दादा ,शिंपी हो ताई ,बाळाचे झबले झाले का नाही ?
आत्ता हो देतो मग हो देतो ,शिंपी दादाने उशीर केला ,
इकडे बाळाने धिंगाणा केला . 
(असे सर्व बलुतेदारांची नावे घेई पर्यंत बाळ झोपी जाते ,या गीता मध्ये सुंदर आवाज 
अन संगीत ज्ञानाची गरज नाही कारण गद्यात्मक पद्य आहे .)
सुतार दादा -पाळणा झाला कि नाही ,
सोनार दादा -साखळी झाली कि नाही ,
शाळेत -दादाला आणायला ,
ऑफिस वाले दादा -आई चे ऑफिस सुटले का नाही 
अमेरिकेत -वॉलमार्ट आळीला -ग्रोसरी करायला ,
बेबीसरस -कपडे ,डायपर ,खेळणी इ . आणायला ,
इंडियन स्टोर ला -खाऊ ,डाळ ,तांदूळ आणायला असे आपण ऍड करू शकतो .

देवा दे परमोच्च प्रेम

                     परमोच्च प्रेम 
भरभरून दिलेस भौतिक सुख इहलोकी ,
थोडे मिळाले कि अधिकाची आशा न चुकी ,
तूच घातलेस जन्माला ,म्हणे कर्माची फळे भोगायला ,जी राहिली बाकी ,
निरिच्छ -निष्काम प्रेम कळते पण वळत नाही ,ते असूदे पुस्तकी ,
पवित्र असले तरी अपूर्णच असते ,प्रेम एकाकी ,
आता मिळूदे प्रतिसादी परमोच्च प्रेम परलोकी ,
खरच देते वचन ,मग मागायचे राहणार नाही काही बाकी . 

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

बाळाचे आगमन -बोबडी बडबड

        बाळाचे आगमन -बोबडी बडबड 
कधी भासे सावळा -शामल ,जणू उमलले नीलकमल ,
भासे कधी गोरे गोरे तुझे तन ,केतकीचे सुंदर बन ,
कुरळे काळे केस गुंफले ,जणू नभी ढग दाटले ,
निळे डोळे जणू सागर ,भुवया जणू कमान चढविली क्षितिजावर 
गोल गुबऱ्या गालावर ,खळी जणू चंद्र -विवर ,
इवले इवले तुझे कर ,स्पर्श होता फुटे पाझर ,
सोनियाच्या पावलांनी झाले तुझे आगमन ,
घर -दार फुलून गेले ,जणू काही नंदनवन ,
गालातील गोड हसू आणि तुझी जांभई ,
सुख आता ठेवू कुठे ,विचार करिती नंद आणि यशोदा माई .

. कहाणी सुफळ संपूर्ण

.             कहाणी सुफळ संपूर्ण 
कहाणी सुख दुःखाची ,कहाणी मैत्री शत्रुत्वाची ,
कहाणी गरिबी श्रीमंतीची ,कहाणी लाडकी दोडकीची ,
कहाणी सुष्ट दुष्टाची ,कहाणी आस्तिक नास्तिकाची ,
कहाणी जय पराजयाची ,कहाणी जीवन मरणाची ,
कहाणी सूडद्वेषाची अन प्रेमाची ,कहाणी अभाव प्रभावाची ,
जितके प्रश्न ,अपेक्षा तिततक्याच उत्तरांची ,
असावी श्रद्धा- भक्ती कामावर अन देवावर ,सोबत उभारी मनाची ,
साठा उत्तरांची होवो पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी आयुष्याची . 

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

. सिंगल पेरेंटिंग

.           सिंगल पेरेंटिंग 
शादीका लड्डू एखाद्याला पचतो ,एखाद्याला बाधतो ,पण भिस्त असावी साकारात्मकतेवर ,
एका चाकावर गाडी चालवण्याची वेळ आली तरी ,प्रयत्नांती भेटतोच परमेश्वर ,
स्वयंपाक पाणी आले गेले ,मुले वाढवणे ,एकल्याने सांभाळायचे घर ,
पैसे काही झाडाला लागत नाहीत ,त्यासाठी जावे लागतेच कामावर ,
कसरत असते तारे वरची ,ताण असतो तनामनावर ,
मुखवटे चढवून जगावे लागते ,दानव आहेतच जगभर ,
कुणीतरी मिसमॅच भेटले तरी ,शेवटी जग चालते आहे विश्वासावर -
माणसा -माणसाच्या चांगुलपणावर . 

. नको अतिरेक

.             नको अतिरेक 
ओला असो वा कोरडा ,दुष्काळ म्हणजे पाण्यासाठी वणवण फिरणे ,
नसे चांगला भावनांचा महापूर ,वा डोळ्यांचे पाणी आटणे ,
कधी पोटाची खळगी भरायला ,नसतात मूठभर फुटाणे ,
अति साठवे पर्यंत दातच नसतात खायला चणे ,
उत्तम असते चांगल्या साठी प्रयत्न करणे अन असेल त्यात समाधान मानणे . 

पणजी म्हणाली

                   पणजी म्हणाली 
आधुनिक युगात मुलांऐवजी आला लॅपटॉप मांडीवर ,
अंगाई गीते वाजू लागली ,कॅसेट अन सिडी वर ,
आईचे दूध अन मऊ भाताची जागा घेऊ लागले बेबीफूड चे डबे सुंदर ,
बाबांनी इम्पोर्टेड खेळणी आणली खोलीभर ,
उबेसाठी ,बाळाजवळ झोपती सॉफ्ट टॉय कुशीवर ,
ज्येष्ठांच्या अनुभवापेक्षा ,भर आला पुस्तकी ज्ञानावर ,
रहाणीमान उंचावले तरी शरीर अन मन प्रतिकार करीत नाही रोगांवर ,
श्रीमंत देशात होऊ घातली संशोधने ,वाढले काळजीचे वातावरण ,
एक खेडूत पणजी म्हणाली ,बाळाला वाढवायला हवे घराला घरपण ,
घरपण असेल तर जोमाने वाढेल बालपण ,असेनात चढ -उतार -वळण . 

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

तुच्छ -उच्च

          तुच्छ -उच्च 
आपले रिती -रिवाज प्रत्येक जिवाला मानाने वागवायची शिकवण देती 
लहान -महान असे कपाळावर लिहून का कुणी जन्मती ?
गणिका मिळवी मान असण्याचा अखंड सौभाग्यवती ,
तृतीय पंथी नवजाताचे स्वागत करण्याचा मान मिळवती ,
स्त्री -पुरुष वा असो कोणताही वर्ण ,प्रत्येकाला मान असती ,
दुर्वा फुले तुळशी सोबत ,दलदलीतील कमळ ,विषारी रुई ही देवासी प्रिय भासती ,
सुपारी -आवळा -अंबा -कवठ -नारळ पूजे मध्ये मान मिरविती ,
गाय बैल नाग कासव भारद्वाज चराचरांना नमन करती ,
कर्कश्श काळा कावळा ,पिंड शिवोनि जिवा -शिवाची भेट घडवती ,
नको भेद भाव ,ज्याला त्याला देऊ त्याचा मान ,हेच आपला धर्म शिकविती . 


सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

देवा दे दान

            देवा दे दान  
देवा दे दान विवेक बुद्धीचे ,
सहनशक्तीचे ,भूत दयेचे, 
माणुसकीचे ,ममतेचे ,प्रेमाचे 
क्रियाशीलतेचे ,नवनिर्मितीचे ,
दान शूरतेचे ,ईश्वर भक्तीचे ,
देवा दे दान मुक्तीचे ,परमशांतीचे . 

. पळवाट

.             पळवाट 
फुलांच्या पायघड्या असतात स्वप्नांसाठी सुंदर ,
प्रत्यक्षात चढ -उतार ,वळणे  ,सिग्नल अन स्पीडब्रेकर ,
वाट सरत नाही ,आपण चालत नाही जोवर ,
पळवाटेने कसे पोहोचता येईल योग्य मुक्कामावर .

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

लँड लाईन फोन

            लँड लाईन फोन 
नव वर्षाच्या शुभेच्छा देण्या साठी उघडली फोन नंबर ची डायरी ,
पहिला फोन आईला लावला ,क्रॉस कनेक्शन मुळे भलतेच संवाद ऐकून संकोच वाटला अंतरी ,
समजले -सिंहगढावर जाणाऱ्या प्रेमी -युगलांचा मीटिंग पॉईंट ठरला होता धायरी ,
कालच फोनवर भेटलेल्या मैत्रिणीला फोन फिरवला जोशात ,
ऐकावे लागले आपण फिरवलेला नंबर नाही अस्तित्वात ,
अश्या वेळी रिडायल केले की म्हणे नंबर लगेच लागतात ,
तेवढ्यात आला बहिणीचा फोन ,म्हणाली वैतागून ,
अगं केंव्हाचा करतीये फोन ,सारखे म्हणतात नंबर पहा तपासून ,
मार्केटिंग वाल्यांचा मात्र येतो ,ना काळ ना वेळ ,छळतात नुसते फोन वरुन ,
या फोन पाई ,दूध जाते उतू ,पोळीचा होतो पापड ,भाजी जाते जळून ,
वाटते घरांची वाढली अंतरे ,निदान मनांची अंतरे तरी कमी ठेवावीत फोनवर बोलून .

. चिंतामणी भीशी (१९९०-२००७) निरोप

.                     चिंतामणी भीशी (१९९०-२००७) निरोप 
भीशी अठरा वर्षाची झाली ,वयात आल्याची चाहुल लागली ,
नाईलाजाने निरोप देताना ,समस्त सखींची मने ओलावली ,
खारी -मारी ,कॉफी पीत भरपूर गप्पा अन कौशल्यांची देवाण -घेवाण अशी नियमावली ठरली ,
हळू हळू एक गोड ,एक तिखट पदार्थ करण्याची नकळत रीत पडली ,
नाटक -सिनेमा ,गप्पा -गोष्टी ,खाणे -पिणे ,काढल्या अनेक सहली ,
ना कधी हेवे दावे ,रुसवे -फुगवे ,दर महा दुसऱ्या बुधवारची डोळे लाऊन वाट पाहिली ,
सुख दुःखात साथ दिली ,देत राहू ,खासियत म्हणजे कधीच वादळे नाही घोंघावली . 

सासुरा ची वाट

            सासुरा ची वाट 
ती शिकली सवरली ,पायावर उभी राहिली ,मोठी झाल्याची जाणीव झाली ,
नवे घर ,नवी माणसे ,माहेर सोडून सासरी पाठवायची वेळ जवळ आली ,
नच माहेरासी जड ,परी लवचिक त्या वंशवेलीस लाभला फुला -फळांसोबत उंची गाठण्याचा मंत्र ,
माहेराची मिळाली सावली ,आता ती माहेर बनून अनेकांना देईल आश्वासक शीतल छत्र ,
हल्ली तोही जातो प्रकाशवाटे वरुन विद्येच्या घरी अन कराया व्यवसाय -नोकरी ,
मैलांचे अंतर कापणे सोपे जाते जर प्रेम अन आपुलकी असेल कुटुंबाच्या अंतरी .

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

व्रत -वैकल्य -साधना

            व्रत -वैकल्य -साधना 
सणावारी नको नुसत्या झेंडूच्या माळा अन आपट्याची पाने ,
करूया प्रार्थना ,सूर्याने शिंपडावे भरभरून लखलखते सोने ,
नको नुसते सडा -रांगोळी ,दिवे आरत्या तोरणं ,
शुद्ध पाण्याने काठोकाठ भरावीत ,नदी -नाले -धरणं ,
पुरेसे नाही सवाष्ण -ब्राह्मण ,पक्वान्न -पुरण ,
गुरांनां लाभो मोकळ्या आकाशा खालील हिरवेगार कुरण ,
पाणी -टंचाई ,तपमान वाढ ,प्रदूषण ,अत्याचार ,भ्रष्टाचार रुपी असुरांचा होवो संहार ,
एकाचा श्वास तो दुसऱ्याचा उश्वास ,एकमेकांच्या जगण्याचा आधार ,
निसर्गाच्या सुंदर संतुलनासाठी मानावेत किती आभार !!!
जठराग्नी च्या होमकुंडात असावी समाधानाची आहुती,
सात्विक ओंब्या -लोम्ब्या -शेंगा ,फळा -फुलांनी राहो धरणी अंकुरती ,
खरी पूजा म्हणजे सर्वांनी जपावे पंचतत्वांचे शुद्ध स्वरुप ,
त्यांच्याच ठाई असे कोटि -कोटि देवतांचे सगुण रुप ,
प्रत्येक सण -उत्सव म्हणजे खेळीमेळीने एकत्र येऊन केलेली परमेश्वराची आराधना ,
निसर्गाला सोबत घेऊनच पुरी होऊ शकते ,मानवाची ही साधना .

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

अमूल्य अवयव

         अमूल्य अवयव 
देहाला लाभली अमूल्य अवयवांची देणगी ,त्यांची किंमत काढणे एक अविचार ,
म्हणे एक रुपयाला अश्रु चार ,मग डोळ्यांच्या किंमतीचा काय पारावार ,
जयपुर लेग ला लागतात किती तरी हजार ,
गुढग्याची वाटी बदलणे लाखांचा व्यववहार ,
किडनी रिप्लेसला डोनर हवा तयार ,मग पैसे जुळवायचा विचार ,
एक -एक अवयवाचा केला विचार तर देवाचे आपल्यावर केवढे उपकार !!
क्षण भंगुर आयुष्यात अवयवांची घ्यावी काळजी ,ठेवूनि सदाचार ,
जीवन उपभोगल्या नंतर तरी अवयव दाना साठी मनाला करूया तैयार .

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

संस्कारांचे महत्व

        संस्कारांचे महत्व 
दगड आणि मूर्ती ,देह आणि माणुस यात काय फरक ?
देवत्व आणि मनुष्यत्व आणण्या साठी संस्कार लागतात सरस ,
घडण्यासाठी अन घडवण्यासाठी ,दुतर्फी करावी लागते आराधना ,
घाव घालणे ,मुलामा देणे ,प्राण ओतणे एकीकडे ,दुसरीकडे बदल स्वीकारण्याची साधना .

चूक -सवय -व्यसन

                   चूक -सवय -व्यसन 
माणुस म्हंटले की चुकायचाच ही उक्ती सर्वांना माहित असते ,
एखाददा केली तर चूक म्हणून कधी तरी माफी मिळू शकते ,
माफी मिळाली म्हणून पुन्हा पुन्हा केली तर ती वाईट सवय जडते ,
समजून उमजून केल्या चुका ,तर त्याला व्यसन म्हणावे लागते ,
आपल्या बरोबर इतरांनाही व्यसनात ओढणे ,व्यसनाची परिसीमा असते ,
एकच प्याला करत मनाला फसवायचे ,दुसऱ्यालाही दरीत ओढायचे ,मग बाहेर पडणे अवघड असते ,
म्हणून वाईटाचा वाटेला न जाण्यातच खरे शहाणपण असते . 

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

शब्दांची जादू

          शब्दांची जादू 
काही शब्द उलट -सुलट लिहिले वाचले तर कधी पोषक होतात तर कधी घातक ,
फक्त -वजा चिन्हाचाच केला विचार तर सगळेच भासे नकारात्मक ,
उभा -आडवा केला विचार तर +अधिक पदरी पडे सकारात्मक ,
वन -वास सर्वांनाच वाटे अप्रिय ,
नव -नव्याची आस जिवासी वाटे प्रिय ,
मन काबूत नसेल तर सैरा वैरा पळे ,
नम -वता आले तर योगेश्वर कळे ,
कुकर्मांची परिणिती असणारच नरक ,
सत्कर्म कर न -कर न सतत बिंबवून आचरणात पडतो चांगला फरक ,
अंतिम सत्य असे मरा ,असुदे योनी कोटी चौऱ्यांऐंशी ,
त्यातील राम ,कळला ज्याला ,त्याचाच होई वाल्मिकी ऋषी ,
प्रवाहा बरोबर वाहत जाते ती धारा ,
विरुद्ध वाहून उगमा कडे जाते ती कृष्ण बावरी राधा -मीरा .

शब्दांची मजेदार व्युत्पत्ती

           शब्दांची मजेदार व्युत्पत्ती 
मिठाची ( सॉल्ट )गरज भागवण्या साठी केलेले अर्थार्जन म्हणजे salary ,
सूर्या सारखी गोल गरम जीवदान देणारी अन भूक भागविणारी भास्करी ,
चांदवी म्हणजे शेवटी केलेली मुलांना आवडणारी छोटीशी भाकरी ,
प्रातः समयी झोपून रहावे अशी वाटणारी झोप गोड साखरी ,
सुलभते साठी झाले अपभ्रंश अन बदल ,पण समृद्धच  झाली , भाव जपूनि अंतरी ,
स्थल -काल -परिस्थितीनुरूप बदल स्वीकारण्याची लवचिकता शिकविते भाषासुंदरी .

डाकिया (पोस्टमन )

            डाकिया (पोस्टमन )
डाकिया डाक लाया ,डाकिया डाक लाया ,
मामा का मनीऑर्डर आया ,अम्माने राखी का तोहफा पाया ,
दूर गांव से काका का अंतर्देशीय आया ,दादी को कितनी बार पढ सुनाया ,
तार देख टेन्शन आया ,पर जिजी -जीजू के आनेका संदेसा था पाया ,
लिफाफा देख भैय्या दौडा आया ,उसमें भाभीका दिल था समाया ,
रजिस्टर लेने बाबा को बुलाया ,हेड ऑफिस से प्रमोशन का संदेश था आया ,
पोस्टकार्ड साथी सुख -दुःख का ,ना कुछ अंदर ,ना कुछ बाहर ,कितना खुला दिल पाया !!
देखते ही देखते पोस्टमन की जगह ई -डाकियेका राज आया ,सुविधा की वजह से इसेभी अपनाया ,
बढते रहने का नाम जिंदगी है ,पर दिल अब भी घर आनेवाले डाकियेको ना भूल पाया .

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

बॉलीवूड

               बॉलीवूड 
सात्विक सुंदर मीना ,शर्मिला ,नूतन ,किती मोहक मधुबालाचे हसणे ,
वैजयंती ,हेमा श्री -प्रदा ,मीनाक्षी माधुरी चे थुई थुई थिरकणे ,
पूर्व -पश्चिम -उत्तर -दक्षिण अनेक तारा -तारकांचे चित्रपट नभी चमचमणे ,
खन्ना ,खान ,कपूर ,कुमारांवर तरुण -तरुणींचे फिदा होणे ,
देवाने दिला चिरतरुण आनंद ,देहबोली संजीव -जया सम ,शक्य नाही काही जोड्या विसरणे ,
भल्या भल्याना वाट दाखवी बच्चनजींचे तारांगणात सूर्य बनून उगवणे ,
लता -गीता -आशा ,रफी -मुकेश क्या कहने किशोर !समृद्ध झाले बहुरंगी शब्द -ताल-सुराने जीवनगाणे ,
बॉलीवूड ने देश -परदेशात राष्ट्रभाषेची गोडी लाविली ,भारत देशा सोपे झाले महा सत्तेचे स्वप्न पहाणे ,
दादा साहेब फाळकेंच्या रोपट्याचा वटवृक्ष जाहला ,जगताला दिले आशय -विषय -मनरंजन जडित सुंदर लेणे .

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

. कासव देवळातील

.          कासव देवळातील 
तोंड म्हणे अरे राम ,हात -पाय म्हणे किती काम ,
नाक म्हणे काय हा वास ,डोळयांसी आवडे वाम वाम ,
कानाला वाटे निंदा छान ,इंद्रिय सुखाचा माणुस गुलाम ,
वाटे दुःखाचा वाटा मोठा ,सुखाचा लहान नाही मनासी समाधान ,
कासव शिकवी जो ठेवी नियंत्रण इंद्रियांवरी ,तोचि जीव महान ,
म्हणून तर देवळातील कासवाला मिळाला देवा आधी नमस्काराचा मान .

बाल सुलभ प्रश्न

           बाल सुलभ प्रश्न 
परदेश म्हंटले की व्हिसा संपायच्या आत परतीचा प्रवास ,हे ओघानेच आले ,
आज्जी येणार म्हंटल्यावर नातवंडांचे तासा तासाचे काउन्ट डाउन सुरु झाले ,
व्हिसा संपला ,कळलेच नाही गोतावळ्यात हसत -खेळत सहा महिने कसे गेले ,
निघायची वेळ आली ,नातवंडे हिरमुसली ,आजी -आबांचे डोळे पाणावले ,
नात म्हणाली एक दिवस उशीरा आली असतीस तर ,आजच्या दिवस नसते का राहता आले ?
बालसुलभ प्रश्नाचे आज्जीला काहीच उत्तर नाही सापडले ,नातीने आजीला निरुत्तरच केले . 

छोटूचा चष्मा

          छोटूचा चष्मा 
ताईला आला चष्मा नावाचा दागिना नवा ,
छोटू म्हणे मलापण नंबरचा चष्मा हवा ,
आई -बाबांनी गॉगल आणुन पुरविला हट्ट ,
खाता -पीता ,जागता -झोपता ,छोटूने धरून ठेवला घट्ट .

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

होरी

               होरी 
मनमोहन ब्रिन्दावन में राधारानी संग खेले होरी ,
गोप गोपी संग ,अनहद नाद पे झूमे सगरी नगरी ,
को मोहन को राधा ,को गोपी को गोप सुदही सारी बिसरी ,
जनसागर संग नाचे गाये नद -नाले ,कदम्ब ,कोकिल ,कजरी ,
भक्ती रंग में डूब गये ,ब्रज भूमि के सगरे नर -नारी ,
धो ना पायो लोकलाज का जल ,ताने -बाने में थी प्रेमरंग की बुनकारी .

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

सणाची खंत

                सणाची खंत 
गणपती -नवरात्र सारख्या सणात शिरला दिखाऊपणा चैन ,भक्ती -पावित्र्य उरले नगण्य ,
वाढदिवसाच्या दिवशी दिवा ओवाळण्या पेक्षा ,विझवण्यात वाटू लागले धन्य ,
नाती जपणे ,प्रेम वाढविणे यात असावा आनंद ,ते विसरुन सामाजिक प्राणी बनू लागला वन्य ,
दीपावलीतील शुभ -लाभ मधील लाभाला मिळू लागले अति महत्व ,
विसरत चाललो आपण सण वारातील ,उच्च निर्व्याज प्रेमाचे तत्व .

. मसाल्याचे पदार्थ

.           मसाल्याचे पदार्थ 
रंग रचना सुगंध -स्वादा सोबत मसाले असतात गुणकर ,जर वापर केला माफक 
मूळ स्वाद जपून भोजन बनते त्रिदोष संतुलित ,सुपाच्य ,आरोग्यदायी ,आकर्षक ,
मिसळणाचा डबा जणू प्रथमोपचार -पेटी ,वापरात असावे हिंग जवस -मोहरी -मेथी ,
वाता अतिरेका पासून बचाव अन  आरोग्य-संपदा वाढवते ,सहज मिळणारे ओमेगा थ्री ,
आले -लसूण शीत युद्धात उपयोगी ,दंतपीडा जंतु संसर्गात लवंग कढी पत्ता असे हितकर ,
धने -जिरे -काळीमिरी बडिशेप ,दालचिनी -वेलची -सुंठ ,काढा असे उत्तम सर्दी -खोकला -तापावर ,
देवघर असो वा स्वयंपाकघर मानच भारी ,रक्तशुद्ध करोनि उजळवी कांती हळद आणि केशर 
मिरची मनमोहिनी ,पाचक रोचक पित्तशामक ,आमसुलाचा विविध प्रकारे केलेला वापर ,
जठराग्नी प्रज्वलना पासून क्षुधाशांती ,मुख -शुद्धी ,उपचार अन प्रतिकार ,मसाले असे आघाडीवर . 

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

एका आवडलेल्या मुलाखतीचे सार (अमितजी )

       एका आवडलेल्या मुलाखतीचे सार (अमितजी )
दुःख का वजन किलो में होता ,लोहे जैसा अच्छा खासा ,
सुखको सोने जैसा तोला जाता ,ग्रॅम -तोला -मासा ,
ए मानव मत दे महत्व वजन को ,भारसे तू ना डरना -झुकना ,
सुख रूपी सोनेकी कीमत ,सिखलाती संकट में भी जीना ,
किसीने फरमाया है इक शेर ,जैसे गागर में सागर का समा जाना --
खूब कमाओ पैसे -हिरे -मोती .... 
याद रहे कफन में कभी ज़ेब नही होती ....

. अल्बम आयुष्याचा

.           अल्बम आयुष्याचा 
फूल ओवूनि गजरा ,एकेक फोटो लेवूनि अल्बम ,कडी जोडुनि साखळी ,
बीज रुजवितो ,रोप वाढवितो ,आतुरतेने ,फुला फळांची वाट पाहती माळी ,
एक अल्बम उषःकाल सम ,बालपणीच्या स्मृती उजाळी ,
दुसरा मध्यान्हाचा ,डोंगर -दऱ्या ,चढ -उतार असुनि निसर्गाने सुंदर फुले फुलविली ,
झऱ्यांची खळखळ ,पक्ष्यांची किलबिल ,फुलांच्या सहवासात फुलपाखरू झाली चिमुकली अळी ,
संधीकाली वाटे सुखी -समाधानी ,काल कसा सरला माझे मलाच ना कळी ,
उगवती ते मावळती ची चित्रफीत छविंचा खजिना ,प्रत्येक आठवण आगळी -वेगळी ,
ब्लॅक &व्हाईट ते कलर अल्बम ते सी. डी . जणू नवरत्नांनी भरलेली झोळी .......

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

जागतिकीकरण

           जागतिकीकरण 
जागतिकीकरणाच्या जमान्यात एखाद्या घटनेचे जगभर उमटतात पडसाद ,
निरोगी स्पर्धा जन्माला आली ,उत्तम गोष्टींना मिळू लागली दाद ,
विचार करून करावे लागते जॉब हॉपिंग ,सतत चालू असते तेजी -मंदी ,
धावत्याच्या मागे लागून  चालत नाही ,जायला नको हातची संधी ,
प्रत्येक क्षेत्रात असते शहाणपण ,परिस्थिती प्रमाणे बदलत राहण्यात ,
नुसता प्रश्न उगाळण्या पेक्षा हुशारी असते ,उत्तर शोधण्यात ,
सामाजिक -आर्थिक -राजकीय रुंदावल्या दिशा ,विश्वची माझे घर झाले ,हे ठेवूया लक्षात . 

मंगलमय निर्मिती

           मंगलमय निर्मिती 
परमेश्वराने  केली विचारपूर्वक समतोल -मंगलमय निर्मिती ,
जग -जीवन सुरळीत पुढे जाण्यासाठी पुरुष अन प्रकृती ,
पुरुषा जवळ थोडी अधिक ,शारीरिक शक्ती अन आन -बान ,
नसे मनाची शक्ती अन लवचिकता ,प्रकृती समान ,
तुलना कशाला ?ना कुणी मोठे ना कुणी लहान ,
शक्ती मिळाली करण्यासी संरक्षणाचे कार्य महान ,
प्रकृती पेलते मनोबलाने जननीचे अन प्रेमाने पालनाचे आव्हान ,
प्रत्येकाने जपावे अपापले अमूल्य असे वरदान .

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

अमूल्य काम

            अमूल्य काम 
रांधा -वाढा -उष्टेकाढा ,सर्वांचे हवे -नको बघा ,खरेतर एक मल्टीटास्किंग एंगेजमेंट ,
क्रिएटिव्हिटी ,प्रॉडक्शन ,कॉस्टकटिंग ,मार्केटिंग ,एकहाती केलेली चौफेर मॅनेजमेन्ट ,
नोकरीपेक्षा उत्तमच असते ,रिझल्ट ओरिएण्टेड सेल्फ एम्पलॉयमेन्ट ,
पार्टनरशिप असो वा प्रोप्रायटरी हवे चांगले फॅमिली अन पब्लिक रिलेशन ,
तिला ना लिव्ह -इन्सेन्टिव्ह -बोनस ना पगार ना पेन्शन ,पण मिळते फुकटचे प्रमोशन ,
तिची कामे "अमूल्य "असतात त्याचे कसेबरे करणार व्हॅल्यूएशन ,
मनाला बरेवाटते जर केलेल्या कामाचे थोडेसे मिळाले ऍप्रिसिएशन ,
ज्या घरात तिची नसते किंमत त्यांना वाटते ही तर अ -मूल्य उठाठेव ,
त्या "कर्मयोगिनी "ची कुटुंबाचे सुख हीच ,कधीही न बुडणारी अमूल्य ठेव ,
म्हणून तर तिला मानतात ,गृहलक्ष्मी -अन्नपूर्णा -देव ...... 

ताप

        ताप 
चूक झाल्यावर सुधारण्या च्या इच्छे शिवाय व्यर्थ असे पश्चाताप ,
सुनियोजित कर्तृत्वा विणा व्यर्थ असे करत बसणे पूर्वताप ,
एक जाळिती मृतास ,एक मृत्यूपूर्वीच जिवास ,चिंता चिता समान ,
निष्काम कर्मयोग तप महान ,कर्माचे फळ एक न मागताही मिळणारे दान . 

प्रेरणा स्रोत

                  प्रेरणा स्रोत 
नितळ कोमल गुलाबाला काटेरी फांद्यांचे संरक्षणच वाटते ,
लाजाळूचे रोपटे सहज स्पर्शाने मिटते ,पण मागचे विसरुन लवकर पूर्वपदावर येते ,
दलदलीत जन्मून कमलपत्र स्वच्छ असते अन पुष्प गुणांमुळे देवांना प्रिय असते ,
प्राजक्ताचे फूल इतरांच्या आनंदा साठी जन्मल्या जन्मल्या झाडाशी नाळ तोडते ,
वटवृक्षाची पारंबी वादळात ही आनंदाने झुलते ,पुन्हा मूळरूपात जाऊन झाडाचा आधार देते ,
प्रवास सफल कराया नौका लाटांचा मार अन हेलकावे सोसते ,
कुणाकडून काय शिकावे हे ज्याच्या त्याच्या हातात असते ....... 

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

वयाचा दाखला

             वयाचा दाखला 
काळ्या -कुरळ्या केसांमध्ये ,पाहुण्या केसांचा झाला प्रवेश ,
जणू काळ्या -सावळ्या ढगांमध्ये ,चंदेरी विजेची चमचमणारी रेष ,
माथ्यावर जमीन दिसू लागली ,गळून गळून झाले विरळ ,डोक्यावरील दाट केस ,
रंगवून -रंगवून आणावा लागतो ,तरुणपणाचा नाटकी आवेश ,
तरुणपणी चतुर्भुज झालो ,आता प्रौढत्वात झाले डोळे चार ,
वाचनाची आवड आहे ,सवडही आहे ,पण मोती आल्याने वाचवत नाही फार ,
पायात आपले बूटच बरे ,नको हिली चपलांचा सोपस्कार ,
बाहेर पडताना कित्तीवेळा तपासायचे !गॅस -फोन -किल्ली अन कपाटाचे दार ,
जागरण ही सोसत नाही ,गाढ झोपही लागत नाही ,कूस बदलायची वारंवार ,
उश्याखाली ,हाताशी लागते ,लवंग -वेलदोडा ,क्रीम -औषधे ,खडीसाखरेचे खडे चार ,
चालत नाही चणे -दाणे ,चकली -कडबोळी ,फोड कैरीची अन आंबट -चिंबट -गारेगार ,
असून मोत्याच्या पंगती सारखे सुंदर दात ,कसे काय कळते !तेतर आणलेत उसन -उधार ,
जमिनी वरून उठताना कळते ,गुढगे कंबर सांध्यांना ,पेलवत नाही आपलाच भार ,
वयाचा दाखला लागत नाही सोबत , ताई -काकू -आज्जी संबोधने लागू लागली क्रमवार ,
आयुष्याची वर्षे वाढविली विज्ञानाने ,प्रतवारी वाढवितो अध्यात्मिक अन पारमार्थिक संस्कार ,
पूर्व अन पुनर्जन्म कुणी पाहिला !आज मध्ये जगून करूया ,स्वतः सोबत इतरांचा ही उद्धार . 

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

. .झोपडी प्रमुख.

.        .झोपडी प्रमुख 
पहाटे उठून कामाला लागतो ,रात झाली ,आतातरी पाठ टेक जमिनीला ,
हातावरचं पोट त्याचं , म्हणे एकदातरी चार घास सुखाचे मिळुदे मला ,
संप -सुट्ट्या परवडत नाहीत ,मुलाबाळांना काय देईल खायला ,
आजार त्याला मानवत नाहित ,जंतूंना जागाच नाही त्याच्या झोपडीत रहायला ,
चोर तेथे येतच नाहीत ,परवडत नाही चोरीचा माल वाहुन न्यायला ,
झोपडी कसली !भंगार मधील फळ्या -पत्र्यांची भिंत ,छत म्हणायचे टेकू लावलेल्या ताडपत्रीला ,
तीन विटा ,चार भांडी शिजवायला ,जागा मुबलक उभे आडवे झोपायला ,रात्रभर एकमेकांच्या सोबतीला ,
शेवट मात्र श्रीमंतीत झाला ,कोरे पांघरूण पांघरायला   ,शिडी मिळे ,सोबतीला ,स्वर्गाच्या पायऱ्या चढायला ,
रामनामाच्या गजरात ,माणसे जमली गुलाल फुले उधळायला ,अंगा -खांद्यावर मिरवायला . 

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

उन्हाळी कामे

              उन्हाळी कामे 
उन्हाळा आला कि पूर्वी असे वर्षाचे वाळवण निवडणं साठवण ,
मग झाली सुरु महिन्याची निवडक यादी ,कारण वेळ अन जागेची अडचण ,
धान्याची जागा घेतली तयार पिठे -पावडरीने ,नको ठेवाया दळणाची आठवण ,
पोळ्यावाल्या ,कामवाल्यांची तंत्र सांभाळा ,त्यापेक्षा बरे रेडी टू ईट जेवण ,
काळा प्रमाणे बदलायलाच हवे पण ,ध्यानी असावे आरोग्याचे समीकरण !

कालाय तस्मै नमः

          कालाय तस्मै नमः 
आमच्या लहानपणी सणला अन सुट्टीत जमायचे मामा -मावशी ,आत्या -काकी ,
सहज होत शेयरिंग ,आत्तेभावाला मामीच्या भावाची मुलगी ,वाटत नसे परकी ,
कधी सासरचे तर कधी माहेरच्या माणसांचे होत असे घरीच गेटटुगेदर ,
आता हॉल सोडायची घाई ,म्हणून गप्पा -जेवण उरकायचे भरभर ,
नातवंडांच्या पीढीला ,कुणा काका -मावशी आहेत तर आत्या -मामा नाही याचे वाटे कोडे ,
पुढे एकेकट्या मुलांना "शेअरिंग इज अ गुड थिंग "शिकवतात हेही नसे थोडे ,
पूर्वी कागदाच्या चौकोनात मिळालेली फोडणीची पोळी अन घासभर साबुदाणा खिचडी ,
आता ए . सी . हॉटेल च्या भरलेल्या महागड्या थाळीला नाही येत त्याची गोडी . 

हुशार विद्यार्थी

                  हुशार विद्यार्थी 
देवाने प्रत्येकाला दिले कमी -जास्त बुद्धीचे भांडार ,
कष्ट ,चिकाटी ,जिद्द ,सातत्य अन सकारात्मक विचार ,
आप्तांचा पाठिंबा योग्य मार्गदर्शन ,विश्रांती ,आहार ,विहार ,
नको अंधानुकरण ,अंगीकृत गुणांचा करे विकास तोच खरा हुशार. 

. चकवा

.                चकवा 
पायाखालच्या वाटेवर का लागावा चकवा !
चालतच राहतो आपण ,जरी आला थकवा ,
दोन मनांच्या वादातून नाकळे जावे कोणत्या पंथी ,
महाभागी अर्जुनालाच लाभतो श्रीकृष्णा सम सारथी .

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

सदाफुली का एकदाफुली

         सदाफुली  का एकदाफुली 
एक्सपायरी डेट नसली तरी वस्तू चांगली का वाईट आई तुला कसे ग समजते 
काही गोष्टींचे ज्ञान -वरदान आईला तिच्या आई कडून मिळते ,
एका बीजातून दुसरे ,दुसऱ्यातून तिसरे तिसऱ्यातून चौथे जन्माला येते ,
एका जिवापासून दुसऱ्याची उत्पत्ती ,अगदी नैसर्गिक असते ,
स्वार्था साठी बीजातील ती शक्ती संपविणे ,प्रगत शास्त्राला कसेकाय जमते ,
जेनेटिकली मॉडिफाय केल्याने बीज भारी दिसते पण त्यातील स्वत्वच संपते ,
'अब पछतानेसे क्या होत है जब चिडिया चुक गई खेत 'मग अशीवेळ येते .

परमानंदी मिलन

                     परमानंदी मिलन 
शिवधनुष्य पेलेल पुरुषोत्तमच ,विश्वास होता वैदेहीला ,
अनंत आकाशाशी मीलनाची ओढ जणू धरतीला ,
शिवधनुष्याने केले क्षितिजाचे काम ,निमित्त झाले अंतरीच्या मीलनाला ,
जीवांना तोशिवणारी खळखळणारी सरिता होते शांत सामावताना सागराला ,
उभयतांच्या जगण्यासी मिळे अर्थ ,जेंव्हा भेटते प्रकृती पुरुषाला ,माया परब्रह्माला ,
सीतारामाचे सम्पूर्ण जीवन ,आदर्श पाठ जणू शिवाची ओढ असणाऱ्या प्रत्येक जिवाला .

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

वाल्याचा वाल्मिकी

   वाल्याचा वाल्मिकी 
मरा -मरा -मरा चा जप ऐकून राम झाला प्रसन्न ,
वाल्याचा वाल्मिकी होण्यास उपयोगी पडले कर्मपुण्य ,
पापाचेही तसेच असते ,नसे काही वेगळे भिन्न ,
कुकर्माचे भागीदार शेवटी होतातच ना खिन्न ,
निष्काम भावनेने करावे सत्कर्म ,तो ओळखतो सकलांचे अंतर्मन . 

भोग -उपभोग

         भोग -उपभोग 
कलियुगी समस्त सुखे भोगताना दिसतो दुर्जन ,
तुलनेने कमी सुख उपभोगतो सज्जन ,
कमी कष्टात आनंद देत असेल अनैतिक असत्यवाट ,
तेथे आनंदावर सतत असतं भिती चे सावट दाट ,
अंतिम विजय ,टिकाऊ आनंद देते सत्याची सरळ वाट ,
देवाघरी देर असेल अंधेर नाही ,नसावा दिखाऊ पोकळ थाटमाट .

झरे अस्तित्वाचे

.         झरे अस्तित्वाचे 
सूर शब्द भाव श्रवणीयता संगीतात ,
स्वाद सात्विकता प्रेम तृप्ती भोजनात ,
रूप रंग गंध बीज परोपकार फुलात ,फळात 
निष्ठा समर्पण प्रेम श्रद्धा भक्ती पूजनात ,
रेषा रंग अभिव्यक्ती निर्मिती चित्रात ,
ओहोटी भरती ,पोळे मोती ,खडक रेती अथांग सागरात ,
रेखीव सुबंध सुंदर सुबकता शिल्पात ,
कलात्मक वास्तव ,कथा अभिनय ,करमणूक ,संदेश सिनेमात ,
ऊन सावली ,चढ उतार ,रात्र दिवस असणारच दीर्घ जीवन प्रवासात . 

सहभोजन

                         सहभोजन 
धावपळीच्या आयुष्यात एका धाग्यात बांधते ,एकत्र येऊन केलेले जेवणं ,
ठरवून प्रत्येकाने आणावा एक एक पदार्थ ,नको उपकाराचं लोढणं 
सहजच बोलता बोलता होते विचारपूस अन मतांची घेवाण -देवाण ,
सुसंवाद अन नकळत समुपदेशन ,ना कुणी उणं ना कुणी दूण ,
सुग्रास जेवण अन सुटतात काही प्रश्न ,सुरेल होते जीवन गाणं . 


रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

तार -प्रकार

        तार -प्रकार 
तार म्हंटलेकी पकवान्न करणाऱ्याला आठवते साखरेच्या पाकाची तार ,
कच्चा -पक्का ,एकतारी -दोनतारी ,कडक -गोळीबंद केवढे ते पाकाचे प्रकार ,
फक्त पुस्तकातून समजत नाही ,अनुभव येई पर्यंत तार ओळखायची कसरतच फार ,
आई कडून मुली कडे ,सासू कडून सुनेकडे आलेला असतो हातर ठेवा ,
अंगठा अन तर्जनीच्या मध्ये ,घेऊन थेंब पाकाचा ,तार बघाया ,तर्जनी नाचवा ,
गोळीबंद पाकासाठी पाण्यात टाकावा पाकाचा थेंब ,तो गोळी बनून टिकायला हवा ,
गुलाबजामला लागे कच्चा पाक ,तना -मनात मुरायला गोडवा ,
लाडूसाठी एकतारी पाकात दोन -तीन तास मुरत ठेवावा खमंग भाजलेला खवा -रवा ,
गूळपापडी ,मोतीचूर ,पाकातील पुऱ्यांना दोनतारीच्या आसपास ठेवा ,
साखरआंब्याला लागे पक्का पाक ,वर्षभर टिकवून ,पाहुणचाराचा गोडवा वाढवा ,
साखरभाताला लागे गोळीबंद पाक ,केशर वेलची ,बदाम बेदाणा ,सुका मेवा ,
कडक चिक्की मध्ये गूळ -साखरेच्या पाकाला ,पाण्याचा थेंबही चालत नाही बुआ ,
वड्यांसाठी मिश्रण गोळा होईस्तोवर घोटावे ,पातेल्याची जमीन दिसे पर्यंत ,गॅस कसा बारिक हवा ,
खादाडी शिवाय आयुष्यात बरेच ठिकाणी ,तारेचा लागतो हातभार --------
चांगल्या -वाईट बातम्या देऊन काळजाचे ठोके वाढवणारी ,पोस्टाची तार ,झालीये आता हद्दपार ,
खेड्या -पाड्यात अजूनही कपडे वाळवायला ,पडदा लावायला ,अडकवायला ,उपयोगी पडते तार ,
वीज वाहून आणणारी ,पक्ष्यांना झुलवणारी तार तर असते एक दुधारी तलवार ,
अंतरीच्या लोकांना भेटवणारी ,टेलिफोनची तार तर ,एक महानच आविष्कार ,
डोंबाऱ्याच्या कुटुंबाचा तार म्हणजे ,जगण्याचा एक भक्कम आधार ,
जीवनात वागताना सर्वांनी ठेवावे 'तारतम्य ',तरच होईल जगताचा उद्धार . .... 


परदेशातून आलात का ?

        परदेशातून आलात का ?
(चांदोबा चांदोबा चालीवर -२००९स्वाईन फ्लू ची साथ आली तेंव्हा --)
परदेशातून आलात का आलात का ... 
सोबत स्वाईन फ्लूला आणलेत का .... 
विषाणूंना नसते तिकीटाची कटकट 
प्रवास केला त्यांनी विमानातून फुकट ,
प्रवासीहो तपासल्या शिवाय जाऊ नका ,
टॅमी फ्लू ची गोळी घेऊन टळेल धोका ,
सज्ज झालो चहू बाजुने लढण्यासी ,
संसर्गाच्या नव्याने आलेल्या रोगाशी ....

. दिनदर्शिकेत सण लाल झळकती

.                 दिनदर्शिकेत सण लाल झळकती 
(मंगेश पाडगावकरांची -'श्रावणात घन निळा 'च्या चालीवर आधारित )
दिनदर्शिकेत सण लाल झळकती ,आनंदाच्या बरसती धारा ,
एका मागुन एक उलटुया वर्षभराची पाने बारा ,
चैत्र ,वैशाख ,ज्येष्ठ ,आषाढ महिने येती बारी बारी ,
स्वागत करूया दिवस सुगीचे ,नववर्षाचे ,गुढी उभारून प्रवेश दारी ,
रामनवमी ,गुरुपौर्णिमा ,दिंडी संगे चालू ,पंढरीची वारी ,
श्रावण भादव अश्विन कार्तिक सणांची जणू आली भरती ,
रक्षाबंधन ,स्वातंत्र्यदिन ,कृष्णजयंती ,गौरी अन गणपती ,
नवरात्री ,दिवाळी -दसरा तेथे नसती अंधारासी थारा ,
मार्गशीर्ष ,पौष ,माघ ,फाल्गुन ,
गोड बोलुया कटुता विसरून ,
गणतंत्राला बळकट करूया ,येवो कितीही वादळ -वारा ,
सुष्ट वृत्तींना जोपासुया ,अन होळी करुनि दुष्ट वृत्तींचा करूया नाश ,
प्रेम रसाच्या रंगाने ,धुंद होऊदे धरणी -आकाश ,
सण शिकवती एकजुटीने आनंदाने कुटुम्ब -समाज -राष्ट्र उभारा . ......

चॅनल

              चॅनल 
(श्री .बा . रानडे यांच्या 'लेझीम 'या कविते वरील विडंबन )
ढीगभर टी . व्ही . चॅनल चे दिवस सुरू जाहले ,
टी आर पी अन ब्रेकिंग न्यूज च्या मागे धावले ,
ताजी बातमी आधी देण्यासी सगळे चॅनल सरसावले ,
डे &नाईट नवे काय देणार !प्रेक्षक मात्र वैतागले ,
पण चॅनल चाले जोरात !चॅनल चाले जोरात ,
रियालिटी शो च्या परीक्षकांनी आपले आपले मत दिले ,
एकसे एक स्पर्धकांनी आपल्या कलेने मंच गाजविले ,
सूत्र संचालकांनी प्रत्येक घटकाला उत्तम प्रकारे बांधुन ठेवले ,
एस एम एस ने निकाल अन स्पर्धकांचे नशीब ठरविले ,
रियालिटी शो चा व्यवसाय चाले जोरात ..... जोरात  ... 
मुलाखतीला पाहुणे बोलाविले ,वेळेचे पण भान न उरले ,
झाली का पंचाईत ,धन्यवाद म्हणून पाहुण्यानाच गप्प केले ,
हॅलो हॅलो ... प्रेक्षकांचा फोन मध्यात अन प्रयोजकांची जाहिरात तेवढ्यात ... 
लोक दिन भर काम करुनि दमले ,संध्या समयी घरी परतले ,
नाही दमती स्पोर्ट ,सिनेमा ,मालिका ,कुकिंग अन कार्टून वाले ,
प्रत्येकाचीआवड नीरनिराळी  ,रिमोट वरून भांडण चाले ,
मग एकाचे दोन टी . व्ही . झाले ,ऑन लाईन ची सोय तर खोलीत ... 
पहाट झाली घरचे लोक जागे झाले ,सगळे आपापल्या कामाला जुंपले ,
परी न थकले चॅनलवाले ,पुनः प्रक्षेपण दाखवतच राहिले ,
सतत नको इडियट बॉक्सच्या पुढ्यात ,मिळू मिसळुया लोकात .. सुसंवाद साधुया आपसात ...

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

. नळा नळा पावरे

.              नळा नळा पावरे 
(इंदिरा संत यांची नको नको रे पावसा -या कविते वरील विडंबन -सकाळ -२००९)
नको नकोरे नळराया असा येऊस अवेळी ,काळजीत असती आई -बाई ,मुली बाळी ,
पाहुणे आले गाडी भरून ,पाणी साठवाया ,मोठी भांडी आणू मी कोठून ,
नको करू लहरी पणा बाग गेली सुकुन ,डबा करू कि पाणी भरू ,बादली गेली वाहुन ,
नको दिवसा आड ,एकदातरी ये दिवसातून ,पळाले तोंडचे पाणी ,डोळे गेले ओलावून ,
वेटिंग च्या टँकर ला लवकर पाठव ना ,ओतले शिळे पाणी ,एकदाच माफ कर ना !
नदी नाले धरणे तुडुम्ब भरु दे ,दुष्काळ पळवून ,सृष्टी आनंदी  मंगलमय होऊ दे ,
वरुणराजा आम्हांसी घे सांभाळून ,पावसाचा आला कंटाळा असे उगाच येणार नाही तोंडून ,
जल जीवन हे कळले ,त्यासी जपून वापरेन ,नळातील थेंबाला तिर्थासम पुजेन .....

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

उठा उठा दादा ताई (विडंबन )

          उठा उठा दादा ताई (विडंबन )
पुणे सकाळ ने वाचकांची प्रतिभा आजमावण्या साठी एक संधी उपलब्ध करून दिली होती . एका लोकप्रिय कवीची कविता ,गीत ,गाणे देऊन त्यावर आधारित विडंबन करून सप्तरंगच्या अंका साठी लेखन मागविण्यात आले होते . त्या साठी रचलेल्या पण काही कारणास्तव छापून न आलेल्या  काही कविता . 
ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांची -उठा उठा चिऊताई -या कविते वरील विडंबन -

चला उठा दादा ताई ,पहा केवढे उजाडले ,
काय हे !तुम्ही अजून झोपाळलेले !
पेपर आला दूध आले ,तयार आहे दुधाचा कप नाश्त्याची बशी ,
टि . व्ही . पुढे जागत बसून ,पहाटे जाग येणार कश्शी !
कपडे चढवत नाश्ता करणे ,धावत पळत बस पकडणे ,
वाहने धावती जिकडे तिकडे ,कसे सुटणार वाहतुकीचे कोडे !
सुखाने झोपलेले अजून तुम्ही ,
चांगला नंबर मिळवायचा कोणी ?
डोनेशन च्या नावाने आमच्या डोळ्यात येते कि पाणी ,
बाळांनो ...... बाळांनो ..... 
नंबरचे नांव काढताच ,खाडकन उठले दादा ताई ,
तयार होताना झाली घाई ,अच्छा टाटा येतोग आई .

श्रीमंत

          श्रीमंत 
तोच खरा श्रीमंत जो उठल्यावर असे ताजा तवाना ,कारण रात्री लागे झोप शांत ,
दिवसाचा तळपता सूर्य असो वा पौर्णिमेच्या रात्रीचा शीतल निशिकांत ,
प्रत्येकाने शक्ती -भक्ती -प्रिती -नितीने गाजवावा ,एखादा तरी प्रांत ,
लाभावे निरोगी शरीर ,रोजच्या जमा -खर्चाची नसावी भ्रांत ,
पहाटे व्यायाम ,चिंतन ,मनन करण्यासाठी ,वेळ मिळावा निवांत ,
क्षमतेनुसार दिवसभर कामाची सर्वच श्रीमंतांना गरज असते नितांत ,
आप्तांचा सहवास अन सुसंवादात ताकत असे जग करण्यासी पादाक्रांत ,
फावल्यावेळी एखादा तरी जोपासावा छंद ,मन राहती सुखाय -स्वान्त ,
व्यक्ती तितुक्या प्रकृती ,पण शेवट मात्र असावा सुखांत ...... 

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

विभिन्न नाती

         विभिन्न नाती 
रक्ताची नाती जन्माने मिळतात ,पण काही जुळतात कोणतेही नाव न देता ,
प्रेमाचा ओलावा नसेल तर ,युवर्स ,अवर्स ,माईन ,पर्यांयांनी सुद्धा सुटत नाही गुंता ,
ना रक्ताचे ,ना जोडलेले पण अंतरीच्या ओढीने जुळते तेंव्हा आपण म्हणतो काहीतरी ऋणानुबंध होता ,
दया क्षमा अन निरिच्छ प्रेम करणाऱ्या धरणीला आपल्याकडे म्हणतात माता ,
भेद भाव न करता समान छत्र छाया देणारे अनंत आकाश असे जगताचा पिता ,
चंदा मामाशी नाते जोडायला पुरतो ,नेसत्या वस्त्राचा धागा नुसता ,
रक्ताची ,भक्तीची ,अंतरीच्या निरिच्छ प्रेमाची नाजुक नाती जपताना दिसते केवढी महानता .

successss

           successss 
इच्छा ,निश्चित हेतू ,ज्ञान ,कृती ,कष्ट ,जिद्दीच्या बळावर जीवन सफल होतं ,
गरजूला आधाराचा हात मिळाला तर ,कोडं लवकर सुटतं ,
आळस ,सुसंगत ,सुसंधी नाकारून ,सक्षम जीवन ही बिघडतं ,
'जो जीता वो सिकंदर 'खरे असले तरी ,success मधील u अक्षर महत्वाचं असतं .

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

सत्यम शिवम सुंदरम

        सत्यम शिवम सुंदरम 
जग कितीही पुढे गेलेतरी ,जन्म -मरण देवाच्या हाती ,
भ्रूण असो वा इतर हत्या ,माणुसकीला कलंकित करिती ,
आत्महत्या तर पळपुटेपणा ,वरदान स्वरूप जीवनाची माती ,
चतुःपुरुषार्थाने फुलवावे कुटुम्ब -समाज -संस्कृती ,
तीत रंग -सुगंधाची उधळण करत असते प्रकृती ,
काटेकोर रेषांनी आकाराला येते तीतर असते भूमिती ,
अलौकिक आनंद देते चित्रकाराची लवचिकता अन रंग -संगती ,
सोपे असते वाईट वर्तन जेंव्हा प्रबल होते अविवेकी मती ,
विवेक अन आनंदाने परिस्थितीला सामोरे जाऊन समजते ,जग सत्य शिव सुंदर किती ?

मॅनेजमेंट

              मॅनेजमेंट 
वाहत्या पाण्यात हात धूताना वापरात असतं उधाण ,
मर्यादित चा वापर करताना ठेवावे लागते थोडे भान ,
स्वभाव तोच पण परिस्थिती ची असावी सर्वांना जाण ,
पाणी -वाणी ,वेळ -पैसा ,वापरात हवी मॅनेजमेंट ,कमी होतो ताण ,
कोणत्याही गोष्टीचा योग्य जागी योग्य वापर ,करतो माणुस सुजाण . 

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

कल्पवृक्ष परसातील

        कल्पवृक्ष परसातील 
वास्तुशांतीला हौसेने परसात  लावला कल्पवृक्ष ,बाकीची झाडे आजूबाजूला ,
आळे करा ,खतपाणी घाला ,माणुस मिळवा झावळ्या कापायला ,
वाट पाहून पाहून ,दहा वर्षांने लागले नारळ ,सीमा नव्हती आनंदाला ,
काढायला सोलायला मोजायचे पैसे ,वर कष्ट करायचे फुकट वाटायला ,
कोणी म्हणते छान होता ,तर कोणी खराब निघाला हो नारळ !वरुन लागते ऐकायला ,
घरी तरी किती लागतात वापरायला !शिवाय सोलणे ,फोडणे ,खरवडने पाहिजे जमायला ,
पुन्हा माणसे पाहिजेत आनंदाने खायला ,उगाच निमित्त नको कोलेस्ट्रॉल वाढायला ,
जास्तीचे विकायचे म्हंटले तर कर्म कठिण ,विकून गाठचे पैसे लागतात घालायला ,
नगदी पीक म्हणजे काय ते कळले ,जेंव्हा काढतो विकायला ,
नारळ म्हणजे 'कल्पवृक्ष 'छान वाटते पुस्तकात वाचायला ,
हातर आपला प्रॉब्लेम ,पण कल्पवृक्षाचा प्रत्येक भाग येतो उपयोगाला ,
शेंड्या -करवंट्या झावळ्या शहाळी असतात उपयोगी ,खोबरे हवेच पदार्थाची लिज्जत वाढवायला ,
बारमाही हिरवेगार -बहरलेले ,एकतरी हवे परसाची शोभा वाढवायला ,
आपल्या परसात स्वकष्टाने रुजवायचे ,वाढवायचे ,अवर्णनीय आनंद देई मनाला ,
शुभकार्य असो वा पूजा -अर्चा ,पाच फळात वरचा मान श्रीफळाला ...... 


. कसरत नोकरदार महिलांची

.        कसरत नोकरदार महिलांची 
अबला झाली सबला नोकरी -व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात तिचे दिसू लागले प्राबल्य ,
घरात -बाहेर सांभाळावा लागतो तोल ,जर हवी असेल शांति आणि साफल्य ,
एकाचवेळी मिळवणे ,वाचविणे ,देणे आधार कुटुम्बाला ,असते एक कौशल्य ,
कामावरची घरात अन घरातील कारणे कामावर ,चालत नाहीत वरचेवर ,
पुरूषांशी  ही मैत्री ठेवावी लागते ,पण ठेवून सावध अंतर ,
मोकळ्या वागण्याचा वेगळा अर्थ काढायला ,असतातच लोक तत्पर ,
अश्यावेळी लोकांना ,देता आले पाहिजे चोख उत्तर ,
बौद्धिक -आर्थिक क्षमतेत ,ती असते त्याच्या बरोबर ,
हे सर्व करताना सावधान !उतरणीला नसावा विपरीत परिणाम प्रकृतीवर ,
धावपळीतही योग्य विश्रांती अन छंद जोपासावा ,प्रेम ही करावे स्वतःवर ,
  अष्टभुजेचा वरदहस्त लाभला तिला ,बहुआयामी जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मस्तकावर .

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

कौटुम्बिक वाद

           कौटुम्बिक वाद 
कुटुंब म्हणजे अनेक माणसे एकत्र येतात ,एखादा विचार घेऊन ग्रेट ,
प्रत्येकाला असते विचार स्वातंत्र्य ,मते असू शकतात सेपरेट ,
नाते असो रक्ताचे ,मैत्रीचे ,राष्ट्रीय ,अंतराष्ट्रीय ,पाया असतो सुसंवादी भेट ,
काही असो गल्लीतील ,वनडे किंवा टेस्ट मॅच चे क्रिकेट ,
आपसात सोडवूनसुवर्णमध्य  साधावा ,कौटुम्बिक वादाचे प्रक्षेपण नसावे थेट,
घराची मांडणी म्हणजे नसतोना ,नाटकातील तात्पुरता सेट ,
चार भांडी एकत्र आली की वाजणारच ,कसा का असो साईज ,शेप अन वेट ,
पण त्यातील पदार्थ मात्र हवेत ,उपयोगी ,टेस्टी ,हेल्दी अन परफेक्ट .

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

पंगत ते बुफे पार्टी

              पंगत ते बुफे पार्टी 
पूर्वी लग्ना -कार्यात पंगती असायच्या ,होती जेवणाची औरच मजा ,
पाट -रांगोळी -अगत्यही भारी ,पण पकवान्नाचा आग्रह वाटे सजा ,
वेळ ,जागा,मनुष्यबळ अभावी ,झाली सुरु कॉट्रॅक्ट पद्धत आणि बुफे ,
नको अन्नाची नासाडी ,लागेल तेवढेच घ्या ,उरलेच तर खातिल भिखारी -भुके ,
इथेही क्यू ची कटकट ,पदार्थांची मिसळ ,हातात ताट घेऊन जणू अन्नछत्रात उभे ,
पंगत झालीच तर ,मागे उभ्याच्या टेन्शनने जेवणारा पटकन ताक पिऊन निघे ,
दोन्ही पर्याय निष्फळ ठरले ,याला जवाबदार गेस्ट आणि होस्ट आहेत दोघे ,
जायचे नसेल तर आधी कळवावे ,अति पदार्थांचे प्रदर्शन बंद करावे ,असावी आपुलकी प्रेम सर्वांमधे . 

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

. आरोग्यम धन संपदा

.                आरोग्यम धन संपदा 
तरुणपणी आरोग्या कडे केला काणा डोळा ,
एकच हव्यास ,करावा भरपूर पैसा गोळा ,
उतारवयात एक एक करून रोगांचा झाला तयार सेतू ,
आहार -व्यायाम -विश्राम ,समाधानाचे अमृत नाही सेविले ,करताना किंतु -परंतू ,
आता कडू -विषारी औषधांना ,जालिम उपचारांना ,जुमानेनात रोग -जंतू ,
कोणीतरी बरे करारे  ,आम्ही वाट्टेल तेवढा पैसा ओतू ,पैसा ओतू . 

. पाण्याचे मन

.                पाण्याचे मन 
चंचल ,उशृंखल ,अथांग ,गंभीर ,जल तरल सामावून घेई विविध रंगी स्वप्न ,
कधी जल स्थिर -कणखर ,गोठून गार झालेले बर्फाचे मन ,
कधी हलके -काळे -अस्थिर ,आपटून ओघळती पाणेरी घन ,
उन्हाच्या चटक्यांनी पाण्याचे जाते अस्तित्वच संपून ,
उन्हाचे चटके परतवून कणखरपणे ,बर्फ परिसर टाके उजळवून ,
पर्यायच उरला नसता ,मग हळू हळू जातो रे वितळून ,
शेवटी मर्यादा असतेच ना !असो जल अथवा जीवन ...... 

भावार्थ

                             भावार्थ 
साधी ,आलंकारिक ,व्याकरण -छंदाने नटलेली ,शब्द -वाक्ये म्हणजे भाषेचे तन ,
बोलणाऱ्याला काय म्हणायचे आहे ,ते समजणे म्हणजे भाषेचे मन ,
फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणतात पण नुसत्या रूपावर नका जाऊ ,
बघून मिठाईचा रंग -रुप ,आपण एकदा खरेदी करूनही खाऊ ,
पण चवच चांगली नसली तर आपण पुन्हा कसे घेऊ ?
पाण्यात पडले की पोहता येते ,कारण प्रश्न असतो जीवनाचा ,
थोडे शिकून पडलो तर ,आनंद घेता येतो सागर पार करण्याचा ,
शब्दार्थ ,भावार्थ ,उच्चाराने उलगडलेला अर्थ समजण्यात नसावी गफलत अन घाई ,
भाषेचा हेतू असतो सांगणाऱ्याचा भावार्थ समोरच्या पर्यंत पोहोचावा सही सही .

श्रोता

           श्रोता 
मिळवलेले ज्ञान पाखडावे शहाणपणाच्या प्रसारा साठी अन भल्यासाठी ,
महान वक्त्याचे ऐकायला ,भाग्य लागते रसिक श्रोत्यांच्या गाठी ,
कधी श्रोता व्हावे लागते ,समोरच्याच्या कोंडंऱ्याच्या निचऱ्यासाठी ,
कधी एका कानाने ऐकून ,दुसऱ्या कानाने सोडून देण्या साठी ,
अवघड असते विश्वासाने सांगितलेले गुपीत पोटात दडवण्या साठी . 

गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

आलेख

         आलेख 
चढ उतारा शिवाय पूर्ण होत नाही आयुष्याचा आलेख ,
दुसऱ्याचा चढता आलेख बघून ईर्ष्या नसावी ,धडा शिकावा  एक ,
सोपे असते पुसून लहान करणे दुसऱ्यानी काढलेली रेघ ,
त्यापेक्षा टिम्बा टिम्बा ने मोठी करावी ,आपण आपली रेघ ,
पायथा आहे म्हणूनच ,शिखरावरून दृष्य दिसतात सुरेख .....

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

परमार्थी गुंतवणूक

परमार्थी गुंतवणूक 
परलोक सुधारण्यासाठी चक्रवाढीत गुंतवावा परमार्थ ,
इहलोकी जगण्यासाठी फक्त जपावा मुद्दली स्वार्थ ,
मोठ्यांचा अन स्वतःचा अनुभव ,दान -धर्म सत्कर्माचे ओळखावे सामर्थ्य ,
ओंजळीत साठवणे सामान्यांचा धर्म ,पण ओसंडून घालवू नये व्यर्थ ,
अतिरिक्त द्यावे ,जो असेल रिक्त ,अमूल्य जीवन करावे खऱ्या अर्थाने सार्थ .

मार्ग अनेक गंतव्य एक

             मार्ग अनेक गंतव्य एक 
अष्टांग योग एक परमानंदी शास्त्र ,जोडे आत्मा शरीर अन मनाला ,
विपश्यना अंतर्मुख करून मनः शांती देणारी एक स्वानुभवी कला ,
अनेक धर्म -पंथ -गुरु -संत ,परमशांती च्या शोधापाई आले जन्माला ,
सुदर्शनक्रिया ,हॅपी थॉट्स ,साई ,समर्थ मंडळे वाहुनघेति मानव जातीच्या कल्याणाला ,
ताण -तणाव ,अस्थिरता ,असुरक्षितता असुरी वृत्ती ,भेडसावत आहेत भेदून ,धर्म -राष्ट्रांच्या सीमेला ,
अनुशासनयुक्त आहार -विहार -विश्रांती अन अध्यात्माचे ज्ञान असावे जोडीला ,
मार्ग अनेक ,गंतव्य एक ,आस्थेने निवडावा ,चालायचे आहे ज्याचे त्याला ,
भक्ती -कर्म -ध्यान -ज्ञान -सन्यास योगी गीता अर्थ देते जगण्याला ......

. follow the leader

.         follow the leader 
कृती विना कल्पना ,केवळ असते स्वप्न बघणे ,
कल्पनेविना केलेली कृती ,केवळ वेळ दवडणे ,
कल्पना आणि कृतीचा संगम म्हणजे परिवर्तन घडवणे ,
नवनिर्मिती चा आनंद ,अन चार सक्षम लोकांच्या गुणांना पैलू पाडणे ,
खंबीर नेतृत्वाच्या  मागे लोकांना सोपे जाते चालणे ,
कालांतराने स्वतः साठी नाही पण मागे चालणाऱ्यांसाठी गरजेचे होते शिखरे गाठणे . 

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

साक्षरता

          साक्षरता 
साक्षरता म्हणजे काय समजून लिहिता वाचता येणे ,आत्मसाद करणे ,असावा शिकण्याचा ध्यास ,
दहावी नापास ला हल्ली गरजेचे नसते ,मेहनतीने पाहिऱ्या चढत होणे आठवी नववी पास ,
शाळा शिक्षका विना चालेल पण शाळेसाठी कॉम्प्युटर मिळवण्याचा केवढा प्रयास ,
ज्ञान म्हणजे -ब्रेड नाही म्हणून उपाशी राहू नका ,खा की केकचा गोड घास ,
हसावे का रडावे !कळत नाही पण आहे कटू सत्य ,हा तर साक्षरतेचा उपहास ,
कॉपी करणे ,पेपर फुटणे ,पुढे ढकलणे ,बळाच्या  जोरावर डिग्री घेणे ,संख्यावाढ अन गुणवत्तेचा ऱ्हास ,
मनूच्यामते इंद्रीय निग्रही माणसाला ,एक गायत्रीमंत्र ही ,उद्धारास पुरेसा ,
नुसता साक्षर पण चारित्र्यहीन ,बेजवाबदार व्यक्ती कसा चालवणार आपला आदर्श वारसा . 

मत प्रदर्शनाचे प्रकार

     मत प्रदर्शनाचे प्रकार 
नेहमी माहितीये मला ,तेच म्हणायचे होते ,हा एक मतप्रदर्शनाचा प्रकार ,
संभाषण म्हणजे ,आधी नाही नाही नाही ,म्हणून टाकायचे त्रिवार ,
गुबुगुबू नंदीबैलाला ,आधीच शिकवून केलेले असते हुशार ,
काही नाईलाजाने डोलवतात मान ,कारण असतात परिस्थितीने बेजार ,
काहींच्या शब्दकोषात हो -नाही ,दोनच शब्द ,मान डोलवूनच त्याचा उच्चार ,
बोलणे सोडाच ,मनाचा थांगपत्ता लागत नाही ,काही असतात इतके निर्विकार ,
उचलली जीभ लावली टाळ्याला ,बोलणे किती सोपे !मग कशाला एवढा विचार ,
एक घाव दोन तुकडे ,कशाला हवी बडबड बेकार ,इसपार नाहीतर ऊसपार ,
काही वक्तृत्वात हुशार ,त्यांना हवे होलाहो करणारे श्रोते दोन चार ,
तोडणे -जोडणे दोन्ही साधता येते ,म्हणूनच बोलावे सदा करोनि सारासार विचार .

अर्घ्य

    अर्घ्य 
अनेक घटना घडत असतात ,आपोआप जगात ,
बघ्या पलीकडे आपली ,काहीच भूमिका नसते त्यात ,
थोड्यातरी चांगल्या घटना ,घडवायचा प्रयत्न असावा आयुष्यात ,
शेवटी वाटता कामा नये ,काय केले !गेली उभी हयात ,
अर्घ्यम्हणजे पाणी ओंजळीत घेऊन ,सोडायचे असते पुन्हा नदीच्याच पाण्यात ,
मातृ -पितृ -समाजाचे ऋण फेडायचे असते ,फाटे पर्यंत साठवू नये आपल्याच खिशात ,
जमा -खर्चाची नोंद वरचा ठेवीतच असतो ,आपल्या वही -पुस्तकात ....... 

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

सिद्धार्थ गौतम बुद्ध -आचार्य सत्यनारायण गोयन्काजी के प्रवचनोका सार

           सिद्धार्थ गौतम बुद्ध -आचार्य सत्यनारायण गोयन्काजी के प्रवचनोका सार -विपश्यना शिबिर २५-२-२००९से ८-३-२००९ तक 
आचार्यजीके प्रवचन मानो पुराने आयनेकी धूल झटककर ,खुदको अंदर -बाहरसे देख सकना ,
नाबोलना ना हिलना डुलना ना बाहर कुछ देखना ,मनकी एकाग्रता से ,अपने अंदर झाँकना ,
नाहो भोक्ता भाव ,हर सुख -दुःख के क्षण को ,समता -साक्षी भाव से देखना ,
तृष्णा (इच्छा ) के बालक को ,वशकी लोरी से मिठी गहरी नींद सुलाना ,
विकारोके पौधो को बंद करदो सिंचना ,अनचाहा पौधा पनपेतो सीखो उखाड फेकना ,
मोलॅसिस यादि नही चाहिये ,बंद करदो चीनी का कारखाना,
मन अपने पर हावी होतो ,सीखो मन पर राज करना ,
विपश्यना का रस अमृतसा ,सबको अपना अपनाही चखना ,
"भवतु सब्ब मंगलम "-साधु ..... साधु ..... साधु ... आशिर्वचन सबको शिरोधार ,
सम्यक शील -समाधी -प्रज्ञा से ,सबके लिये खुला निर्वाण का महाद्वार ,
गौतम हुए बुद्ध ,सिद्ध +अर्थ किया तन -मन का तृष्णा रहित व्यवहार ,
शरणागति स्वीकार हो ,नवम बुद्ध अवतार  ........ 

ईश्वर -साधना

          ईश्वर -साधना 
जप -तप -साधना मधमाशीचं पोळं ,
वरवर चावऱ्या माश्या ,अंतरी मध रसाळ ,
जणू कल्पवृक्षाची फळं ,
वरवर चोथट -कडक ,अंतरी साय दुधाळ ,
सामान्यासि आकर्षिते ,विकारांचे मृगजळ ,
साधक म्हणती ,अंतरीच्या झऱ्यात वाहे अमृत निर्मळ ,
अंतरंगाला नसावी ,बाह्यरंगाची भुरळ ,
अंधकारही दिसावा कसा उजळ -उजळ ,
टिम्ब विलीन बिंबामधे ,तेजपुंजाला पाहून यावी रे भोवळ ,
ज्ञाताकडून अज्ञाता कडे नसे प्रवास सरळ ,
असत्याकडून सत्याच्या ,अन मग अंतिम सत्याच्या असावे जवळ ,
जिव -शिवाच्या भेटीला व्याकुळ व्याकुळ ........ 


अंतःचक्षु -विपश्यना

    अंतःचक्षु -विपश्यना 
मनकी आँखें खोल शरीरा ,मनकी आँखें खोल ,
सोवत -जागत देख शरीरा ,जीवन है अनमोल ,
सुख में ना जा फूल तू ,दुःख में कटू ना बोल ,
जड -चेतन सब अनित्य है ,समता से तू तौल ..... 
ताले में क्यों रखत है तू ,सत्कर्मोका मोल .... 
चाबी तेरे पास है ,खर्चा कर दिल खोल तू ,खर्चा कर दिलखोल . 

. . विपश्यना -समापना दिन अनुभव कथन

.             . विपश्यना -समापना दिन अनुभव कथन 
विपश्यना विश्वविद्यालय के कारण ,'इगतपुरी 'का बढा मानसम्मान ,
श्री गोएंका गुरुजीका सहज सुंदर प्रेरणादायी व्याख्यान ,
विद्या -वृक्ष को सिंचता ,उत्तम व्यवस्थापन ,नियमपालन ,समर्पित सेवा और दानवीरों का दान ,
प्राकृतिक -सुंदर -स्वच्छ वातावरण ,सात्विक -संतुलित -संयमित खानपान ,
अमीर -गरीब ,युवा -वृद्ध ,देसी -परदेसी ,नर -नारी आते ,बटोरनेको ज्ञान ,
मनसे अपनाना है संवेदन अनुभूति ,आना पान यानेकी श्वास -उश्वास और ध्यान ,
विपश्यना यानी स्वतः को अंतर्मुख होकर अचूक देखना ,दिखलाती मुक्ती मार्ग महान ,
शरीर -मन -वाणी के मौनको कहते हैं आर्यमौन क्या वर्णन क्या गुणगान ,
साधना का आनंद अनुठा ,सुझाव देनातो जैसे ,सूरजको दिया दिखाने समान !!!!  

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

जगताचा स्वामी

         जगताचा स्वामी 
मोहापाई नकोरे रे छिन्नी ने घाव घालू ,
त्यालाही जीव असतो ,म्हणून तर आपण त्याला पुजतो ,
हौसेपाई नकोरे शृंगाराने मढवू ,
त्यालाही जाणीव असते ,तो ऐकतो ,बोलतो ,बघतो ,
म्हणून तर आपण कर्माची फळे भोगतो ,
दरिद्री नर सोडून ,ज्याचे आहे त्यालाच भरून ताट नैवेद्य नकोरे दाखवू ,
तो प्रेम -भक्ती चा भुकेला ,तो खात नाही ,म्हणून त्याला आग्रह असतो ,
नवसपूर्ती पाई नकोरे त्याला लाच देऊ ,
तो माया चिकटवून घेत नसतो ,
म्हणूनतर तो गरीब भक्ताचाही पाईक होतो ...... 

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

ओबेसिटी

   ओबेसिटी 
सात्विक -स्वच्छ ,घरी बनवलेला ,साधा,सोपा आहार असावा ताजा ताजा ,
अनैसर्गिक रंग -रसायने -प्रिझर्वेटिव्ह ,आपल्या अन्नातून करावे वजा ,
बाहेरचे ,आईसक्रीम -केक -कोक -बर्गर -फ्राईज आणि पिझ्झा ,
सगळे कसे रेडी टू ईट ,जिभेचे चोचले पुरविताना खूपच येते मजा ,
वरचेवर असे खाऊन ,अति होते वजन वाढ ,आपणच आपल्याला देतो सजा ,
दिसते तशी ताकत नसते ,हालचाल मंदावते ,मेद वाढते ,शरीर जणू रोगाची पेटी ,
लो फॅट ,नो फॅट डाएट, स्लिमिंग मेडिसिन ,जिम ,तज्ञांचा सल्ला घेऊनही वाढत जाते ओबेसिटी ,
शेवटी आपणच ठरवावी उपायांची क्वांटिटी -क्वालिटी ,विकणारा कितीही करुदे पब्लिसिटी ,
बोल्ड चकचकित जाहिरात भावते ,दिसत नाहीत छोट्या स्टार मधे दडवलेला अटी .

महापुरुषांच्या अर्धांगिनी

          महापुरुषांच्या अर्धांगिनी 
भोवल्या वरून जाणाऱ्यांमुळे ,जगतासी दासबोधाचे समर्थ ज्ञान घडे ,
कन्यारत्न कोंदणाविना ,पडले अचानक उघडे ,
पाचा पतींची पत्नी ,अंग झाकाया वस्त्रासाठी रडे ,
अग्निदिव्य ,वनवास सोसुनी सीता सुत आश्रमात वाढे ,
पत्नी -पुत्र -वैभव सोडूनि ,सोडविले सर्वांच्या दुःखाचे कोडे ,
दूध अन अश्रुंचा ओलावा जपत ,माँ यशोधरेने भोगले राजवैभव कोरडे ,
लक्ष्मणाला आदर्श भावाचा मान मिळाला ,सर्वस्व अर्पूनि रामापुढे ,
दिसले का कुणा ,उदास उपेक्षित उर्मिलेचे ,काळजातील ओरखडे ?
अहिल्या ,तारा मंदोदरी ,कस्तुरबा कित्ती कित्ती नावे येती पुढे ,
'साकेत -यशोधरा 'रचुनि कविश्रेष्ठांनी यांचे ऋण फेडिले अल्पसे थोडे ,
जगताच्या कल्याणासाठी आनंदाने तिने सोसले केवढे ....... 
'

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

अति तेथे माती

                           अति तेथे माती 
पालकांना विभक्त ,व्यस्त जीवनात हल्ली मुलांना अमूल्य वेळ देता येत नाही फार ,
खर्चिक लाड ,हो ला हो करणे ,अहं गोंजारणे ,मग त्यांना पचवता येतनाही नकार ,
दुधारी समृद्धी आणि स्वातंत्र्या बरोबर वाढले मानसिक अन सोबत करणारे शरीराचे आजार ,
आता काळ -वेळ -पैसा ओतून ,करावे लागते परीक्षण आणि उपचार ,
उपचार म्हणायचे पण तो तर असतो रोग दाबून टाकायचा प्रकार ,
शरीर तपासणे सोपे पण मन तपासणे खूपच अवघड ,मग सगळेच होतात बेजार ,
व्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणी कोणाच्या अध्याय -मध्यात कसे बरे पडणार ?
मग एकमेकांच्या अडचणी तरी कश्या बरे समजणार ?
पूर्वी स्वातंत्र्य होते कमी ,म्हणून घरचे -बाहेरचे सल्ले मिळत हजार ,
ना खर्च ,ना साईडइफेक्ट ,कळतच नसे काउंसिलिंग केंव्हा पडले पार ,
श्रद्धा ,भक्ती ,विश्वास देऊन जातो केवढा मोठा आधार !!!!

अवयव महात्म्य

      अवयव महात्म्य 
हात पाय ,डोळे कान ,देवाने दिले दोन दोन अवयव एकाला दुसऱ्याचा आधार ,
एकाच तोंडाला कामे दोन ,तोलुन मापुन चविष्ट आहार आणि शब्दांचे उच्चार ,
जीभतर दुधारी तलवार ,गोड बोलूनि जिंके जग ,अन समोरच्याला दुखवले तर करी पलटवार ,
विचारांवर आचारांची करून मात ,माणसाला वाटे ,आपण आहोत किती हुशार ,
मती पडे तोकडी ,घडवणाऱ्याची पाहुन लीला अपरंपार ,
एखादा अवयव निकामी झाला की कळते ,तोतर होता अमूल्य फार ,
त्याचा घेऊन गैरफायदा ,अवयव विक्रीचा मांडलाय बाजार ,
आपल्याला जे शरीर फुकट मिळालेय ,ते विकायचा काय अधिकार ?
मृत्यु नंतर जगण्या साठी ,अवयव दानाचा करावा विचार !!!!!

. क्षणभंगुर

.      क्षणभंगुर  
हे जीवन क्षणभंगुर  ......... 
नाही कळती क्षण किती आपुले ,याची वाटे हुरहुर ,
काळ कुणावरी अवेळीच ,  घाले घाला क्रूर ,
आयुष्याशी कंटाळुनी एखाद्यासी वाटे ,अजून तो क्षण आहेरे किती दूर ?
माणुस गुलाम ,स्वामिनी नियती ,लहरी अन मगरूर ,
आदमी कहीं तो है ही विधी के हाथों मजबूर ,
साधुजन कह गये यहाँपर ,काल करे सो आज कर ,
आज करे सो अब ,सत्कर्म की तू गठडी बांध ,जीवन है क्षणभंगुर . 


अंबा आणि लिंबोणी

 अंबा आणि लिंबोणी 
लावून कडुलिंबाचे झाड ,लिंबोणीचं येणार ,
बाठीतील अंकुरच वाढून ,आम्रवृक्ष फळणार ,
कडुलिंबाचे झाडही उपयोगीच असणार ,
पण अंबा तो अंबाच ,पिवळ्या लिंबोणीला अंब्याचा स्वाद का असणार ,
लिंबोणी छोट्या अंब्या सम दिसली ,म्हणून का मुंगी फसणार ?
माती -मशागत -माळी एकच पण ,पेराल तेच उगवणार ,
बीजापासून फळ अन फळापोटी त्याचेच बीज असणार ,
एकदा का समजला कर्माचा सिद्धांत ,तर कुकर्म करायला माणूस सहज नाही धजणार .

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

मा . शा . आरोग्य

 मा . शा . आरोग्य 
योग्य अन प्रमाणात आहार ,व्यायाम ,विश्रांती ,
निरोगी राहायला सोबत असावी मनःशांती पुरती ,
म्हणे स्पर्धा नसेल तर प्रगतीच खुंटती ,
करून स्पर्धा स्वतःशी करता येते उन्नती ,
ईर्ष्या ,द्वेष ,जीवघेणी स्पर्धा ,बघून दुसऱ्याची प्रगती ,
मनाच्या बिंबाला ग्रहण लागती ,
मनाचे रोग हळू -हळू तनालाही ग्रासती .....

आजोबांची खंत

 आजोबांची खंत 
फिरायला जाताना अचानक पाऊस आला ,
बंद दुकानाचा आडोसा ,शोधावा लागला ,
उभ्या -उभ्या काय करणार ?
लोकांची लगबग बडबड आणि सरींचा नाच न्याहाळला ,
शेजारी आजोबा लोकांचा कट्टा होता जमला ,
राजकारण ,अर्थकारण ,समाजकारण ,आपल्यावेळेस असे नव्हते ,संवाद ऐकला ,
चार बायका जमल्याकी जेवण -खाणं ,साड्या -दागिने ,घर -दार सगळ्याचा होतो काला ,
या बाबतीत बायकांना नावे ठेवण्याचा पुरुष वर्गाने ,जणू चंगच आहे बांधला ,
गम्मत म्हणजे कट्ट्यावर ,आजोबा लोकांचा कोंडमारा ,बांध तोडून बाहेर होता पडला ,
पेन्शन आहे ,फ्लॅट आहे मुले आहेत ,खंत एकच ,जोडीदाराने लवकर संग सोडला ,
तिची किंमत ती गेल्यावर कळली ,वाटू लागलंय जणू आपला उजवा हातच मोडला

सोने /दसरा

       सोने /दसरा 
खऱ्या पिवळ्या सोन्याचे भाव आकाशाला भिडले ,
झाडे होतील भुंडी ,जर दसऱ्याला एक एक पान तोडले ,
करूया निर्मळ प्रेमाच्या सोन्यात इन्व्हेस्टमेंट ,
बुडण्याची ,चोरीची नसे भिती ,वाढतच राहतो इंटरेस्ट रेट ,
बॉण्डिंग ठेवूया नको कागदी बॉण्ड ,नको ब्रेसलेट ,
शुभेच्छा आणि आशिर्वाद सगळ्यात बेस्ट ........ 

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

चारधाम

         चारधाम 
बद्री -केदार ते रामेश्वर कन्याकुमारी ,
द्वारका सोमनाथ ते काशी जगन्नाथपुरी ,
भारतीयाला वाटे ,चारधाम यात्रा जन्माचे कृतार्थ करी ,
केल्याने देशाटन ,तीर्थाटन मिळतोच लाभ नानापरी ,
नको कर्मकांड ,अर्थ प्रदर्शन ,हवी शिस्त ,स्वच्छता संस्कृती जपण्याची उर्मी उरी ,
देव भक्ति -भावाचा भुकेला ,वसे भक्ताच्या अंतरी 

मानसिक पचनशक्ती

       मानसिक  पचनशक्ती 
वाढलेले समोर सर्वच नसते रोचक ,
जास्त प्राशनाने जड होणारच ,कितीही असो पाचक ,
सुखाच्या पुराला हवा ,विवेकाचा रोधक ,
दुःखाच्या आवेगाला ,सहनशीलतेचे रेचक ,
आनंदी -निरोगी जगायला ,समाधानाचे अन्न असे पोषक .

ओळखू येणारी माणसे


ओळखू येणारी माणसे 
तुम्ही तर मराठी माणूस दिसताय ,
वर चढणाऱ्याचा पाय व्यवस्थित ओढताय ,
तुम्ही गुजराथी माणसं दिसताय ,
ट्रिप मधे फिरायचे सोडून ,सारखे खायचे डबे उघडताय ,
तुम्ही साऊथ इंडियन दिसताय ,
स्वभाषिक भेटल्यावर ,आम्हाला एकदमच विसरलेले दिसताय ,
तुम्ही सिंधी -पंजाबी -उत्तरे कडचे दिसताय ,
जी-आप -हम असे गोड गोड बोलून ,नकळत आपला माल विकताय ,
तुम्ही तर बंगाली बाबू दिसताय ,
जलबिन मछली तसे तुम्ही मच्छी बिन तडपताय ,
तुम्ही फॉरिन रिटर्न दिसताय ,
या ,या ,यू नो ,आय नो कित्ती वेळा उच्चारताय ,
अरेच्चा तुम्हीतर माणुसकी जपणारे ,माणूसच वाटताय ,
दुसऱ्याच्या सुखात सुखी ,अन परदुःखाने किती व्यथित होताय ?
तुम्हीतर मोठ्यांना मान लहानांना संरक्षण देणारे संस्कृती रक्षक भारतीय दिसताय ,
अनेकता में एकता घेऊन ,भारतीय म्हणून जगात स्वाभिमानाने जगताय .

दीपोत्सव

             दीपोत्सव 
तेल ,मेण ,वीज ,असो कोणताही दिवा ,
सण म्हंटले की आनंद -उल्हासाचा प्रकाश हवा ,
दुष्टांचा नाश ,विजयी सुष्ट ,अलीकडे -पलीकडे एकच गोष्ट ,
राम -शाम -येशू -अल्ला वा असो गौतम ,
माणुसकी हा एकच धर्म असे सर्वात उत्तम ,
प्रेमाचे लोणी वर येते ,करुन सुविचारांचे मंथन ,
सर्वांना दीपोत्सवाचे ,खूप खूप शुभ चिंतन .......

. अश्विनी पौर्णिमा

.              अश्विनी पौर्णिमा --आपल्याकडे पहिल्या अपत्याला यादिवशी औक्षण करून भेटवस्तू द्यायची पद्धत आहे . त्यादिवशीच्या मुलांच्या मनातील टिपलेल्या काही गमतीशीर भावना . 
म्हणेमोठ्यांची अवस्था असते दीनवाणी , 
मोठे आहात ना ?हेकरा तेकरू नका ,ऐकावी लागतात बोलणी ,
छोट्यांची घ्यायची जवाबदारी ,बोलायची कायम गोडवाणी ,
छोट्यांचे दुःख ----
कपडे ,खेळ ,पुस्तके वापरावी लागतात ,जुनी -पुराणी ,
काय बघा ऐट ,फक्त मोठ्यांनाच मिळते ,अश्विनीची ओवाळणी ,
मधले म्हणतात --आमची हालत तर अगदिच केविलवाणी ,
सोयिस्करपणे कधी मोठे ,तर कधी गणलेजातो लहान ,ना घाटाचे ना घरचे पाणी ,
पालकांना सगळी मुले सारखीच ,नसे भेद ,लाडकी -दोडकी ,उणी -दुणी ,
हाताची ताकत पाच ही बोटे ,पण पाचही बोटे सारखी पहिली आहेत का कोणी ?

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

प्राणायाम

        प्राणायाम -श्वसनावर नियंत्रण 
शरीर निरोगी ठेवायचे असेल तर ,मनावर नसावा अति ताण ,
शारीरिक ताण दिसून येतो ,पण मोजायचे कसे मनाचे उधाण ,
मनःशांतीच्या शोधात भटकून ,जीव होतो हैराण ,
ताण वाढला की गती वाढते श्वासाची ,हेतर जाणतोच सुजाण ,
मानसिक ताणाने कमी होतो शरीरातील त्राण ,
श्वास आहे तर जीवन आहे ,शरीर जीवंत असल्याचे एक परिमाण ,
प्राणायामाने श्वासावर ठेवू नियंत्रण ,निरोगी जीवनाचा एक उपाय रामबाण . 

जीवन संगीत

          जीवन संगीत 
ताल -सूर अनेक ,गीत एक ज्यात संगीताची एकतानता ,
थोरांशी सूर जुळवताना हवी थोडी विनम्रता ,
लहानांच्या सुरात सूर मिळवताना ,हवी कशी परिपक्वता ,
तोल सांभाळणारा सहचर ठरतो आदर्श कुटुंबकर्ता ,
झाडा -झुडपांना सुद्धा सुमधुर संगीत समजते ,प्रेमळ स्पर्श ,हळुवार भावना भावते ,
चलन -वलन भाषा येत नसतानाही ,सृष्टीकर्त्याचे दर्शन घडते ,
वृद्ध -अपंगांचे पण झाडांसारखेच असते ,गती नसली तरी भावना तेथे जीवंत असते ,
यासर्वांना समजून घेताना ,बुद्धी पेक्षा मनाच्या ओलाव्याची गरज असते .

कविता

         कविता 
कवन असावे घेऊन वास्तवतेचे तन ,भावनेचे मन ,करि रसिकासी धुंद ,
स्वान्तसुखाय परहिताय ,गेयता विचारांची ,सोबतीला थोडा छंद ,
भाषा -व्याकरण -अलंकारांची ,पेटी नसावी टाळेबंद  ,
लिहून -वाचून -ऐकून मिळावा आनंद ,उन्हाळ्यात जणू मोगऱ्याचा सुगंध ,
ती प्रसवावीच लागते ,घेऊन येते रडत रडत हसणाऱ्या बालक जन्माचा आनंद . 

पहिले अपत्य

पहिले अपत्य -कन्यारत्न 
पहिले अपत्य परमानंदाचा क्षण ,बेटा असो वा बेटी ,
पूर्वापार चालत आली चाल ,पहिली बेटी धनकी पेटी ,
आई -बाबा पदवी असते जगती महान मोठी ,
अपत्यास ही भाग्य लागते ,जन्मावे ममतेचा पोटी ,
ईशा च्या (अनिकाच्या )रूपाने आली लक्ष्मी -दुर्गा -सरस्वती ,
रत्नावलीच्या तेजाने लखलखून गेल्या अर्चना -विनय च्या नेत्रज्योती ,
वंशवेल ही प्रतिदिन वाढो ,नमन नटवरा कोटि कोटि . 
पहिले अपत्य ---पुत्ररत्न ----
पहिले अपत्य परमानंदाचा क्षण बेटा असो वा बेटी ,
पुत्ररत्न वंशाचा दिवा ,बेटी असते दीपज्योती -आनंदाची पेटी ,
आई -बाबा पदवी असते जगती महान मोठी ,
अपत्यासही भाग्य  लागते ,जन्मावे ममतेचा पोटी ,
अर्चित च्या रूपाने आला ,पुरुषोत्तम -माधव -उमापती ,
येऊनियोग अनन्य ,घरकुल आलोकित होऊनि लखलखती ,
शुभम च्या रूपाने आला ,पुरुषोत्तम -माधव -उमापती ,
रूप शुभमचे चारूत सुंदर ,अनिरुद्धासी मोहुन घेती ,
वंशवृक्ष हा सदा  बहरत राहो ,नमन करूया गणपती . 





सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

मुक्ता -१९-१-२०१४(रविवार )

    मुक्ता -१९-१-२०१४(रविवार )
मुक्ता आली ,पुरी जाहली अनिरुद्ध -चारुता अन साऱ्यांची मनिषा ,
रत्न गवसले ,स्टॅचू ऑफ लिबर्टी च्या महान अमेरिका देशा ,
बोलणार आहे मात्र राम -कृष्ण -गार्गी -मैत्रेयी -माऊलीची भाषा ,
कन्येच्या रूपाने आली ,दुर्गा -लक्ष्मी -सरस्वती -लता अन आशा ,
शोभे शुभम च्या हाती ,जणू शिंपल्यातील पाणीदार 'मोती 'जसा ,
तव तेजाने उजळुदे ,भूतलीच्या दाही दिशा ,
वंशवेल ही निशिदिन वाढो ,हीच प्रार्थना श्रीगणेशा .

कुलदीपक -चि . अर्चित -७-१-२०१०,चि . शुभम १-४-२०१०(गुरुवार )

कुलदीपक -चि . अर्चित -७-१-२०१०,चि . शुभम १-४-२०१०(गुरुवार )
छकुल्या तू जोशी कुलदीपक ......... 
लक्ष्मी केशवा होउदे बाळासी सुखी ,आयुष्यवंत ,गुणवंत ,यशवंत ,मोहक ,
मात -तातांना (आलोक -अनन्या ,अनिरुद्ध -चारुता )सोनियाचा दिन ,परमानंदाचा द्योतक ,
अति आनंदी आजी -आबा ,मामा -मामी ,काकी -काका ,
बाळ काय म्हणेल दीदी का ताई ?विचार करिती ईशा अनिका ,
शुभम झाल्यावर --अर्चित म्हणतो मीतर दादा नमन कराया पुढ्यात वाका ,
झाली पत्नी माता ,पती पिता ,बाळ घट्ट बांधति एका -मेका ,
अर्चना आत्या नाव ठेवूनि ,बाळासी देती हळुच झोका ,
घुगऱ्या आणिक पेढा घेऊनि अतिथी जनहो ,नवजाताचे नाव ऐका ,
....... सोनुल्या ,छकुल्या तू जोशी कुल दीपक ,
देवा होउदे बाळासी सुखी ,आयुष्यवंत  .....

मंगल -प्रभात (माझे आई -बाबा )

            मंगल -प्रभात (माझे आई -बाबा )
गंगा -यमुना -सरस्वती ,कृष्णा माई ,आई गोदावरी ,
सदा प्रवाही धर्म त्यांचा ,बहुजनांसी तोषित करी ,
'प्रभाकराची 'ऊर्जा घेऊनि ,मंगलाम -सुजलाम -सुफलाम झाली भूवरी ,
वंदे मातरम ,वंदे मातरम ...... 
तव चरणी घडूदे सेवा ,या युगल करी ,युगल करी !!!

दान -स्वाभिमान


दान -स्वाभिमान 
इन्सान हैसियत से ज्यादा ,जरूरतमंद की करे मदद तो वो हुई दानत ,
लेनेवाला भी हो स्वाभिमानी ,जरुरत से ज्यादा कभीभी ना ले किसीकी मदत ,
जीना मुश्कील होगा अगर घोडा घास सेही करले दोस्ती ,
दुनियादारी में कभी तो लेनाही पडता है दुसरेका सहारा ,चाहे छोटी हो या बडी हस्ती ,
आधा निवाला किसीको देकर ,चाखि है कभी जीवन की मस्ती ?
कमसेकम दूसरोको उजाडकर ,ना बसाए कोई अपनी बस्ती .

तुकाराम

            तुकाराम 
देहू गावासी केले पावनतीर्थ ,रचुनि अभंग गाथा ,
माणुस मराठी भक्ती भावे टेकवितो तव चरणी माथा ,
प्रवृत्ती -निवृत्तीतील भेद सांगे ,करुनि सोपी भाषा ,
उंचींवरी तू नेऊनि ठेविले ,जय जय महाराष्ट्र देशा ,
तुकोबा बैसूनि विमानी ,गेले वैकुंठी सदेह ,
नशिबी नव्हते अर्धांगिनीच्याही  ,करीत बसली संदेह ,
एकलाची येतो ,एकलाची जातो सोबत असते कर्मांची साथ ,
नरदेह लाभे पुण्याईने ,विठुमय होऊनि सत्कर्माने जन्म -मृत्यूवर करावी मात .

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

कान्हा रे कान्हा

 कान्हा रे कान्हा 
यशोदेच्या ओटी ,देवकीच्या पोटी जन्मुनी ,कान्हा रे कान्हा तू कसा झालासी खोडकर ,
छेडितो गोपिकांसी ,फोडितो घागर ,चोरुनि खातोस शिंकाळ्यातील लोणी -साखर ,
सूर आळविती तक्रारीचा ,पण मानकरीत मनातुनी ,गोपी आपल्या नशिबावर ,
नंद -वसुदेवाचा पुत्र ,सुदामाचा मित्र ,पांचालीचा सखा पार्थसारथी चक्रधर ,
राधेचे अलौकिक प्रेम ,मीरेच्या मधुरा भक्तीत चिंब ,मनमोहना ,तू मुरलीधर ,तू बंसीधर ,
कृष्णा -माधवा तूच गिरीधर -नटवर नागर,कसे जगावे शिकविणारा ,कर्मयोगी योगेश्वर ,
तू युगपुरुष 'अहं ब्रह्मास्मि 'त्रिलोकवासी ,तू सकलांचा ईश्वर ,कृपा असूदे आम्हावर .....

. वर्ण -व्यवस्था


 .    वर्ण -व्यवस्था 
एका वर्गाला सोपविली समाजहितासाठी धर्म कार्य करण्याची जवाबदारी ,
तर कोणी शूर वीर देश रक्षणा साठी आनंदाने होई ,धरा -धारी ,
उदर निर्वाह अन दैनिक गरजा भागवण्या साठी कुणी व्यापारी कुणि शेतकरी ,
एक समाज वरिष्ठ सेवेत मग्न ,पोट त्याचे हातावरी ,
सर्वांच्या सोई साठी जन्माला आली वर्णव्यवस्था ,कोणाच्या पोटी जन्मावे ते नाही आपल्याकरी ,
रहावे कसे खेळीमेळीने लहान-मोठे ,राजा -रंक वा कोणत्याही वर्णातील नर -नारी ,
उच्च -नीच काही नसते ,परलोकी सगळे सारखेच असते ,सदकर्मांप्रमाणे होत असते प्रतवारी .

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

गुजरात -सौराष्ट्र दर्शन -गिरनार (गिरिनारायण )

  गुजरात -सौराष्ट्र दर्शन -गिरनार (गिरिनारायण )
कर्ता करविता परमेश्वर ,आज्ञा व्हावी लागते वरुन ,
इच्छाशक्ती लागतेच ,पण योगही यावा लागतो जुळून ,
गिरनार दर्शनाच्या वेळी विचार केला ,दहा हजार पाहिऱ्या आपण जाऊ का चढून ?
प्रोत्साहन दिले भक्तांनी ,कळलेच नाही गुरुदत्तात्रेय कडेवर कसे पोहोचलो जाऊन ?
अलौकिक त्रिमूर्ती -पादुका स्पर्शाने सकल श्रम गेले विरुन ,गुरुरूप साठवले डोळे भरुन !!!
          गुरु -महिमा 
अध्यात्माच्या मार्गावर गुरु ,गोविंदापेक्षाही महान असतात ,
काही लोक गुरुमंत्र घेतात ,पण कर्मकांडा पुढे खरी शिकवण विसरतात ,
कबीरा सारखे थोर संत ,अनुग्रह न घेतासुध्दा गुरु मार्गावर चालतात ,
गुरु करणे ,गुरु मानणे ,त्यावर आचरण करणे सर्व आत्मा -परमात्मा मिलनाची साधने असतात . 
           भारतमाता मंदिर 
नानाविध धर्म -पंथ नांदती येथे ,भारत भूमि भूतली महान ,
तेहतीस कोटी देवी -देवता ,अगणित संत सकलांना बहु मिळतो मान ,
स्वयंभू -प्रतिष्ठापित ,सुंदर कोरीव वैभवशाली ,अनेक जागृत देवस्थान ,
भू -जल -शिखर -निर्गम स्थानी ,कळसावर फडके सदा निशान ,भारतभूमि भूतली महान ..... 

कवनकर्ती ला दाद

       कवनकर्ती ला दाद 
तुझ्या पहिल्या कवनाचे करु किती कौतुक ?
बोलके झालेत तव लेखनीतील शब्द मूक ,
कलेची देणगी असतेच स्वान्त -सुखाय ,
सोन्याला सुगंध लाभो ,होऊनि बहुजन हिताय .

व्याही -विहिणी

   व्याही -विहिणी 
जोशी परांजपे बापट अन केळकर ,
हौशी प्रेमळ सुसंस्कृत अन खेळकर ,
सगे सोयरे आप्त आणि मित्र ,
शुभाशीष देण्या जमले एकत्र ,

जयश्री विद्या विनयेन शोभते ,रवि प्रकाश सम तत्वांनी अविनाशी ही सृष्टी असते ,
श्रीदत्तात्रेय कृपा असो ,मिळो सदा सन्मती ,आधी सारे वंदू रिद्धी -सिद्धी सह गणपती .

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

अनिरुद्ध -चारुता


         अनिरुद्ध -चारुता 
अनिरुद्धला मिळाली चारुताची जोड ,
जणू दुधात घातली साखर गोड ,
पुणे तेथे काय उणे ,उभयतांच्या संसारी सुख होवो दुणे ,
शिक्षण -नोकरी ते विवाह घडला अमेरिकेत प्रवास ,
उभयतांचा बहरो सर्वांगाने संसार ,हीच सर्वांची आस ,
मित्र -परिवार -पै -पाहुणे सगळ्यांचे परदेशात ही करता स्वागत सुहास ,
देव -धर्म ,सण -वार ओसंडे उल्हास ,असो कोणताही वार ,कोणताही मास