।।बोलक्या म्हणी ।।
बोलाची कढी अन बोलाचाच भात ,गाव जेवण घातले तरि हात होत नाही ओला ,
स्वतः बद्दल अति बडबड ,समजावे है दाल में कुछ काला ,
जगाची रीतच आहे ,आनेवालेका बोलबाला ,जानेवालेका मुंह काला ,
जग इकडचे तिकडे झाले तरि ,काही असतात हरफन मौला .
।। सुविचार ।।
शिक्षणाच्या जोडीला संस्कार ,व्यापाराच्या जोडीला व्यवहार ,
व्यवहार असावा स्वच्छ -आरपार ,देव तारी त्याला कोण मारू शकणार?
कमवण्याला काटकसरीचा आधार ,धर्माला तारतो मानवतावादी अवतार ,
सुखाचा शेला दुःखाच्या किनारी शिवाय कसा उठून दिसणार ?
यशामध्ये थोडे नशीब अन प्रयत्न मात्र करावे लागतात अपार ,
संकटाला समजावे संधी ,संधीचे करावे सोने बावन्नकशी चमकदार .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा