सोमवार, ११ जानेवारी, २०१६

।। म्हणी -सुविचार ।।

      



                       ।।बोलक्या म्हणी ।।
बोलाची कढी अन बोलाचाच भात ,गाव जेवण घातले तरि हात होत नाही ओला ,
स्वतः बद्दल अति बडबड ,समजावे है दाल में कुछ काला ,
जगाची रीतच आहे ,आनेवालेका  बोलबाला ,जानेवालेका मुंह काला ,
जग इकडचे तिकडे झाले तरि ,काही असतात हरफन मौला . 
           ।।  सुविचार ।।
शिक्षणाच्या जोडीला संस्कार ,व्यापाराच्या जोडीला व्यवहार ,
व्यवहार असावा स्वच्छ -आरपार ,देव तारी त्याला कोण मारू शकणार?
कमवण्याला काटकसरीचा आधार ,धर्माला तारतो मानवतावादी अवतार ,
सुखाचा शेला दुःखाच्या किनारी शिवाय कसा उठून दिसणार ?
यशामध्ये थोडे नशीब अन प्रयत्न मात्र करावे लागतात अपार ,
संकटाला समजावे संधी ,संधीचे करावे सोने बावन्नकशी चमकदार . 





         




















             






                        




                  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा