वयाचे टप्पे -तरुणपण
वयाचे टप्पे -तरुणपण
स्वमग्नतेतून बाहेर येऊन ,माणूस होतो एक नागरिक जवाबदार ,
गद्धे -पंचविशीचा काळ म्हणून ,थोडा लागतो मोठ्यांचा आधार ,
शिक्षण -अर्थार्जन विवाहास उपयोगी ,थोड्या भावना थोडा व्यवहार ,
वाटे ऐकावे जनाचे करावे मनाचे ,राहावे आकर्षक अन रुबाबदार ,
सुंदर स्वप्ने प्रत्यक्षात पाहताना ,नसे आनंदाला पारावार ,
आयुष्यातील सुवर्णकाळ होईल सुगंधित ,जर जोडीला असतील सारासार विचार ,
जोडीदाराची लाभली उत्तम साथ ,तर बनतो एक आदर्श परिवार .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा