कविता
कवन असावे घेऊन वास्तवतेचे तन ,भावनेचे मन ,करि रसिकासी धुंद ,
स्वान्तसुखाय परहिताय ,गेयता विचारांची ,सोबतीला थोडा छंद ,
भाषा -व्याकरण -अलंकारांची ,पेटी नसावी टाळेबंद ,
लिहून -वाचून -ऐकून मिळावा आनंद ,उन्हाळ्यात जणू मोगऱ्याचा सुगंध ,
ती प्रसवावीच लागते ,घेऊन येते रडत रडत हसणाऱ्या बालक जन्माचा आनंद .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा