गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

बाल सुलभ प्रश्न

           बाल सुलभ प्रश्न 
परदेश म्हंटले की व्हिसा संपायच्या आत परतीचा प्रवास ,हे ओघानेच आले ,
आज्जी येणार म्हंटल्यावर नातवंडांचे तासा तासाचे काउन्ट डाउन सुरु झाले ,
व्हिसा संपला ,कळलेच नाही गोतावळ्यात हसत -खेळत सहा महिने कसे गेले ,
निघायची वेळ आली ,नातवंडे हिरमुसली ,आजी -आबांचे डोळे पाणावले ,
नात म्हणाली एक दिवस उशीरा आली असतीस तर ,आजच्या दिवस नसते का राहता आले ?
बालसुलभ प्रश्नाचे आज्जीला काहीच उत्तर नाही सापडले ,नातीने आजीला निरुत्तरच केले . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा