आयुष्य जगणे
जन्म -मरणाला जोडणाऱ्या साखळी चे नाव आयुष्य ,
पूर्वजन्म -पुनर्जन्म यावर मोठ्या -मोठ्यांनी केले भाष्य ,
दिसत नाही ,आठवत नाही ते का वाटू नये असत्य ,
जगणे करावे सार्थक हेच खरे सत्य ,
मिळालेले जीवन काही काढतात ,तर जगतात काहीजण ,
कोणी सदा दुर्मुखलेले ,दिशाहीन भटकतात रानोवन ,
तर कोणी करतात रानाचेही नंदनवन ,
माणूस एकटा येतो ,एकटाची जातो हे जरी खरे ,
सुख -दुःखात आले कुणी धावून तर वाटतेच ना बरे ,
काहींना वाटते पैसा हवा बास्स ,नसूदे कुणाची साथ ,
पण नाळ कापायला अन उचलायला ,लागतातच माणसाचे हात .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा