भवसागर
कुणाला आवडेल का दुःखाला मिठी मारणे !
भावतेच ना आरपार पोहत जाणे ,
गोते खाण्यापेक्षा बरे एखाद्या आधाराने थांबणे ,
डुबताना काडीचाही आधार भक्कम वृक्षासम वाटणे !
संधी मिळताच अनिवार्य पुन्हा हात -पाय मारणे ,
भाग्यात लागते आधार अन संधी लाभणे ,
पुढे आपल्याच हातात असते संधीचे सोने करणे ,
शेवटी आनंद टिकवायचा असेल तर उत्तम असते प्राप्त परिस्तिथी स्वीकारणे ,
यालाच म्हणतात भवसागर तरून जाणे ...... .... ....
पुढची अवघड पाहिरी म्हणजे जिवा -शिवा ची गळाभेट होणे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा