बुधवार, ४ जानेवारी, २०१७

. पिंड

.                            पिंड 
बरेच वेळा व्यक्ती -विकासात बुद्धयांक वाढीसाठी केला जातो प्रयत्न प्रचंड ,
योग्य भावनाविष्कारांना हि हवे तेवढेच महत्व ,नसावा न्यून किंवा अहंगंड ,
अनुवंश -देवाची देणगी ,योग्य आहार -संस्कार पोषण या सर्वांनी बनत असतो एक पिंड ,
एखाद्या गहन प्रश्नाला सामोरे जाताना ,कोणी वाकतो तर कोणी शरण जातो ,राहून एकदम थंड ,
कोणी म्हणतो मोडेन पण वाकणार नाही ,अन अन्याया विरुद्ध पुकारतो बंड ,
काही नैसर्गिक प्रवृत्ती नष्ट करता आल्या नाहीत तरी त्यावर मात करून त्यावर ठेवावा पाबंद ,
'जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या ' किमान एवढा तरी असावा मान -दंड ,
इतरांना सुखी करण्यासाठी निरिच्छपणे काही करता आलेतर ,समजावे आपण जगलो उदंड .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा