शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

स्वराज्या कडून सुराज्या कडे

           स्वराज्या कडून सुराज्या कडे 
जेंव्हा  ढासळतात नैतिक मूल्ये ,वाढू लागतात समाजातील शल्ये ,
लहानपणा पासूनच माणुस घडवणाऱ्या मूल्यांचा मनावर व्हावा संस्कार ,
हाच निरोगी समाजाचा भक्कम पाया अन आधार ,
समाज विघातकाना व्हावी शिक्षा कठोर ,
गौरव -सन्मानाने विभूषित व्हावेत ,चारित्र्य सम्पन्न ,समाज सुधारक थोर ,
अनुसरण हा नैसर्गिक नियम ,त्यावर चालेल नवी पिढी ,
व्यक्ती ते समष्टी समाज प्रगतीची उत्तम शिडी ,
स्वराज्याचे होवो सुराज्य -रामराज्य ,प्रजा लाभो साजेशी ध्येय वेडी .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा