रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

महानाट्य

                      महानाट्य 
                 महानाट्याचा एक अध्याय संपला ,
एक चक्री वादळ आले ,घोंगावले निघून गेले लोपले ,
वादळाच्या पूर्व सूचना ना समजल्या ,का ना उमगल्या तुझिया मना ,
आले काय ,गेले काय !!खोलवर ठेवून गेले कित्ती तरी खुणा ,
होऊनि उध्वस्त ही उठावेच लागते पुन्हा ,जीवनासी देण्या गती ,
तुम्ही नसता एकटे ,जोडलेले जीव अससी ,कित्येक तुमच्या सोबती ,
पळून जाणे पर्याय नसतो ,खरी परीक्षा पळवून लावण्यात भिती ,
जीवनाला अर्थ हवा तर ,लढल्याविना लाभेल का रे जिवा तुला सदगती ,
पूर्व अन पुनर्जन्म असती गहन प्रश्न चिन्हे ,सुखांत मात्र स्वतः च्याच हाती ,
प्रसंगानुरूप मधील पाने आपापलीच लागतात भरावी ,आवडो वा ना आवडो किती !!
तो ठरवितो प्रत्येक पुस्तकाची पृष्ठ संख्या ,आदि आणखिन इति ,
उत्पत्ती -स्थिती-लयासी समता भावाने जाणे सामोरे ,म्हणजेच असावी दिगंबर त्रिमूर्ती ची प्रचिती ,
सगुणातील निर्गुणाची अन निर्गुणातील सगुणाची परमानंदी अनुभूती . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा