सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

तुकाराम

            तुकाराम 
देहू गावासी केले पावनतीर्थ ,रचुनि अभंग गाथा ,
माणुस मराठी भक्ती भावे टेकवितो तव चरणी माथा ,
प्रवृत्ती -निवृत्तीतील भेद सांगे ,करुनि सोपी भाषा ,
उंचींवरी तू नेऊनि ठेविले ,जय जय महाराष्ट्र देशा ,
तुकोबा बैसूनि विमानी ,गेले वैकुंठी सदेह ,
नशिबी नव्हते अर्धांगिनीच्याही  ,करीत बसली संदेह ,
एकलाची येतो ,एकलाची जातो सोबत असते कर्मांची साथ ,
नरदेह लाभे पुण्याईने ,विठुमय होऊनि सत्कर्माने जन्म -मृत्यूवर करावी मात .

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

कान्हा रे कान्हा

 कान्हा रे कान्हा 
यशोदेच्या ओटी ,देवकीच्या पोटी जन्मुनी ,कान्हा रे कान्हा तू कसा झालासी खोडकर ,
छेडितो गोपिकांसी ,फोडितो घागर ,चोरुनि खातोस शिंकाळ्यातील लोणी -साखर ,
सूर आळविती तक्रारीचा ,पण मानकरीत मनातुनी ,गोपी आपल्या नशिबावर ,
नंद -वसुदेवाचा पुत्र ,सुदामाचा मित्र ,पांचालीचा सखा पार्थसारथी चक्रधर ,
राधेचे अलौकिक प्रेम ,मीरेच्या मधुरा भक्तीत चिंब ,मनमोहना ,तू मुरलीधर ,तू बंसीधर ,
कृष्णा -माधवा तूच गिरीधर -नटवर नागर,कसे जगावे शिकविणारा ,कर्मयोगी योगेश्वर ,
तू युगपुरुष 'अहं ब्रह्मास्मि 'त्रिलोकवासी ,तू सकलांचा ईश्वर ,कृपा असूदे आम्हावर .....

. वर्ण -व्यवस्था


 .    वर्ण -व्यवस्था 
एका वर्गाला सोपविली समाजहितासाठी धर्म कार्य करण्याची जवाबदारी ,
तर कोणी शूर वीर देश रक्षणा साठी आनंदाने होई ,धरा -धारी ,
उदर निर्वाह अन दैनिक गरजा भागवण्या साठी कुणी व्यापारी कुणि शेतकरी ,
एक समाज वरिष्ठ सेवेत मग्न ,पोट त्याचे हातावरी ,
सर्वांच्या सोई साठी जन्माला आली वर्णव्यवस्था ,कोणाच्या पोटी जन्मावे ते नाही आपल्याकरी ,
रहावे कसे खेळीमेळीने लहान-मोठे ,राजा -रंक वा कोणत्याही वर्णातील नर -नारी ,
उच्च -नीच काही नसते ,परलोकी सगळे सारखेच असते ,सदकर्मांप्रमाणे होत असते प्रतवारी .

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

गुजरात -सौराष्ट्र दर्शन -गिरनार (गिरिनारायण )

  गुजरात -सौराष्ट्र दर्शन -गिरनार (गिरिनारायण )
कर्ता करविता परमेश्वर ,आज्ञा व्हावी लागते वरुन ,
इच्छाशक्ती लागतेच ,पण योगही यावा लागतो जुळून ,
गिरनार दर्शनाच्या वेळी विचार केला ,दहा हजार पाहिऱ्या आपण जाऊ का चढून ?
प्रोत्साहन दिले भक्तांनी ,कळलेच नाही गुरुदत्तात्रेय कडेवर कसे पोहोचलो जाऊन ?
अलौकिक त्रिमूर्ती -पादुका स्पर्शाने सकल श्रम गेले विरुन ,गुरुरूप साठवले डोळे भरुन !!!
          गुरु -महिमा 
अध्यात्माच्या मार्गावर गुरु ,गोविंदापेक्षाही महान असतात ,
काही लोक गुरुमंत्र घेतात ,पण कर्मकांडा पुढे खरी शिकवण विसरतात ,
कबीरा सारखे थोर संत ,अनुग्रह न घेतासुध्दा गुरु मार्गावर चालतात ,
गुरु करणे ,गुरु मानणे ,त्यावर आचरण करणे सर्व आत्मा -परमात्मा मिलनाची साधने असतात . 
           भारतमाता मंदिर 
नानाविध धर्म -पंथ नांदती येथे ,भारत भूमि भूतली महान ,
तेहतीस कोटी देवी -देवता ,अगणित संत सकलांना बहु मिळतो मान ,
स्वयंभू -प्रतिष्ठापित ,सुंदर कोरीव वैभवशाली ,अनेक जागृत देवस्थान ,
भू -जल -शिखर -निर्गम स्थानी ,कळसावर फडके सदा निशान ,भारतभूमि भूतली महान ..... 

कवनकर्ती ला दाद

       कवनकर्ती ला दाद 
तुझ्या पहिल्या कवनाचे करु किती कौतुक ?
बोलके झालेत तव लेखनीतील शब्द मूक ,
कलेची देणगी असतेच स्वान्त -सुखाय ,
सोन्याला सुगंध लाभो ,होऊनि बहुजन हिताय .

व्याही -विहिणी

   व्याही -विहिणी 
जोशी परांजपे बापट अन केळकर ,
हौशी प्रेमळ सुसंस्कृत अन खेळकर ,
सगे सोयरे आप्त आणि मित्र ,
शुभाशीष देण्या जमले एकत्र ,

जयश्री विद्या विनयेन शोभते ,रवि प्रकाश सम तत्वांनी अविनाशी ही सृष्टी असते ,
श्रीदत्तात्रेय कृपा असो ,मिळो सदा सन्मती ,आधी सारे वंदू रिद्धी -सिद्धी सह गणपती .

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

अनिरुद्ध -चारुता


         अनिरुद्ध -चारुता 
अनिरुद्धला मिळाली चारुताची जोड ,
जणू दुधात घातली साखर गोड ,
पुणे तेथे काय उणे ,उभयतांच्या संसारी सुख होवो दुणे ,
शिक्षण -नोकरी ते विवाह घडला अमेरिकेत प्रवास ,
उभयतांचा बहरो सर्वांगाने संसार ,हीच सर्वांची आस ,
मित्र -परिवार -पै -पाहुणे सगळ्यांचे परदेशात ही करता स्वागत सुहास ,
देव -धर्म ,सण -वार ओसंडे उल्हास ,असो कोणताही वार ,कोणताही मास