तुकाराम
देहू गावासी केले पावनतीर्थ ,रचुनि अभंग गाथा ,
माणुस मराठी भक्ती भावे टेकवितो तव चरणी माथा ,
प्रवृत्ती -निवृत्तीतील भेद सांगे ,करुनि सोपी भाषा ,
उंचींवरी तू नेऊनि ठेविले ,जय जय महाराष्ट्र देशा ,
तुकोबा बैसूनि विमानी ,गेले वैकुंठी सदेह ,
नशिबी नव्हते अर्धांगिनीच्याही ,करीत बसली संदेह ,
एकलाची येतो ,एकलाची जातो सोबत असते कर्मांची साथ ,
नरदेह लाभे पुण्याईने ,विठुमय होऊनि सत्कर्माने जन्म -मृत्यूवर करावी मात .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा