शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

||लग्न -विधी||

साखरपुडा म्हणजे रुपया -नारळ ,खण -कापड -अंगठी देऊन ,तोंड गोड करून ,लग्न जमलेहो सांगण्याचा शिष्टाचार ,
लग्नाच्या आधी अक्षत देवदेवक केळवण अश्या अनेक विधींचे सोपस्कार ,
कार्य व्यवस्थित पार पडावे यासाठी ,देवांचे आशिर्वाद अन सर्वांच्या सहकार्याची  असते गरज फार ,
वाग्निश्चय ,सीमांतपूजन ,वरमाला ,कन्यादान ,लाजाहोम ,सप्तपदी म्हणजे खरा लग्नाचा बार ,
कानपिळी म्हणजे बहिणीच्या सुखासाठी ,भावाला मेहुण्याचा कान पिळण्याचा अधिकार ,
गृह प्रवेश ,लक्ष्मि पूजन ,झाल म्हणजे ,या घरात नववधू च्या सुखासाठी आम्ही सासरचे राहू जवाबदार ,
लग्न -विधी ने देव ब्राह्मण आप्तांच्या साक्षीने वधू -वर होतात जन्मोजन्मीचे जोडीदार . 


लग्नविधी -थोडी गम्मत
सासूने मांडीवर बसवून आरश्यातून ,सून -मुलाला बघायचे म्हणजे सुनमुख ,
अंतर ठेवून जवळिक ठेवण्यात ,आहे खरे सुख ,
मुलगा दुरावला ,याचे करत बसायचे नसते दुःख ,
गुरुजीपण मजेशीर ,म्हणाले थोडक्यात आहे गोडी ,
मांडीवर घेतले तर बसायचे प्रेमाने ,त्याची करायची नाही शिडी .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा