गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

Mahanaivedya che tat

निवेदन -देवापुढील  ठेवलेले महानैवेद्याचे ताट म्हणजे संपूर्ण -संतुलित आहाराचा एक उत्तम नमुनाच जणू . स्वयंपाक म्हणजे शास्त्र आणि कलेचे मिश्रण . त्यात षटरस प्रमाणबध्द असावे लागतात . पौष्टीकते बरोबर पदार्थाचा स्वाद -रंगरूप -मांडणी यामुळे उदराग्नी प्रज्वलित होण्यास मदत होते . पदार्थ बघूनच तोंडाला पाणी सुटलेतर तो पचायला मदतच होते . अर्थात खाण्याचे योग्य प्रमाण प्रत्येक खाणाऱ्याने अपापलेच ठरवायचे असते . भोजन ही फक्त पोट भरण्या साठीची क्रिया नसून एक यज्ञ -कर्मच आहे हे जाणले म्हणजे झाले . खाद्य -संस्कृतीतील षटरसाबरोबर ,साहित्यातील रस -राजाचा स्थायीभाव 'प्रेम 'पदार्थात मिसळता आलातर खाणाऱ्याला आत्मानंद मिळणारच आणि त्यामुळे पाककर्त्यालाही .
                मी साधारण दर शनिवारी ,माझ्या कुंपण नसलेल्या कवनोद्यानातील (मुक्तछंद )काही फुले माझ्या अक्षरमालेत गुंफण्याचा प्रयत्न करते . यामहिन्यात प्रस्तुत करीत आहे १-नैवेद्याचे ताट २-पाकक्रिया ३-हातालाच चव ४-सुगरण आणि काही -----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा