शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

।।नैवेद्याचे ताट ।।

डावी कडे लिंबू ,चटणी ,कोशिंबिर ,अन पापड भज्यांची तळणी,
मीठ त्यात वाढायचे नसते,कारण बरे असते खाणे थोडे अळणी,
उजवीकडे भाजी - आमटी -सार कढी,उसळी सारखी तोंडीलावणी,
मधल्या भागी पोटभरीला भात -पोळी ,आहाराची समतोल अन सुंदर मांडणी,
आंबट -खारट -तिखट -तुरट कडूलाही मानुन गोड ,सजतो पदार्थ घालुन फोडणी,
ताटाबाहेर डाविकडे पाण्याचे पात्र,अन्न पचाया हवी हवा अन पाण्याची जोड,
उजवीकडे ताटाबाहेर ,पक्वान्नाची वाटी ,शेवट असावा नेहमी गोड,
हरिचा ध्यास ,उदबत्तीचा वास ,पाट -रांगोळी,वातावरणही तोडिसतोड,
मुखशुद्धीचा विडा सांगतो,चार तास तरी मना आता खाण्याचा तू मोह सोड . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा