गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

।। लपंडाव ।।

कधि विरह ,कधि अभाव तर कधि असमाधानी वृत्तिने जीव होतो बेजार ,
विरह म्हणजे दुःख  ,दुःख म्हणजे काळोखा अंधार ,
कधि दृश्य  ,कधि अदृश्य गोठलेली आसवे  गार ,
कधि अखंड वाहणारी काजळाची धार ,
तर कधि बोचून -बोचून बोथट होते काळजाची धार ,
दुःख म्हणजे वस्त्राची टोचणारी ,भरजरी किनार ,
तलम-रेशमी पोत ,जरतारी मुळेच तर उठून दिसणार ,
आधी सुख उपभोगले म्हणून दुःख कळले ,लपंडाव खेळणारे तेतर जोडीदार,
कधि एक तर कधि दुसरा राज्य घेणार ,तरच खरा खेळ रंगणार ,तरच ------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा