कधि विरह ,कधि अभाव तर कधि असमाधानी वृत्तिने जीव होतो बेजार ,
विरह म्हणजे दुःख ,दुःख म्हणजे काळोखा अंधार ,
कधि दृश्य ,कधि अदृश्य गोठलेली आसवे गार ,
कधि अखंड वाहणारी काजळाची धार ,
तर कधि बोचून -बोचून बोथट होते काळजाची धार ,
दुःख म्हणजे वस्त्राची टोचणारी ,भरजरी किनार ,
तलम-रेशमी पोत ,जरतारी मुळेच तर उठून दिसणार ,
आधी सुख उपभोगले म्हणून दुःख कळले ,लपंडाव खेळणारे तेतर जोडीदार,
कधि एक तर कधि दुसरा राज्य घेणार ,तरच खरा खेळ रंगणार ,तरच ------
विरह म्हणजे दुःख ,दुःख म्हणजे काळोखा अंधार ,
कधि दृश्य ,कधि अदृश्य गोठलेली आसवे गार ,
कधि अखंड वाहणारी काजळाची धार ,
तर कधि बोचून -बोचून बोथट होते काळजाची धार ,
दुःख म्हणजे वस्त्राची टोचणारी ,भरजरी किनार ,
तलम-रेशमी पोत ,जरतारी मुळेच तर उठून दिसणार ,
आधी सुख उपभोगले म्हणून दुःख कळले ,लपंडाव खेळणारे तेतर जोडीदार,
कधि एक तर कधि दुसरा राज्य घेणार ,तरच खरा खेळ रंगणार ,तरच ------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा