ज्ञानी जनांचे ऎकावे वचन एक ,
संसारी राहून पेलाव्यात ,जवाबदार या अनेक ,
जसे खमंग ,पौष्टिक रुचकर भोजन बनवी सुरेख ,
अंगी ना चिकटे काही ,काय ही निर्लेप भांड्याची मेख ,
अलिप्त असावे कुटुंबात राहून ,
आंब्याच्या बाठी सारखे कशाला घ्यावे बरबटून ,
चिक्कुत राहून बी नाही घेत काही चिकटवून ,
देऊ घेऊ आनंद वानप्रस्थात राहून .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा