।। विवाह एक व्रत ।।
आपल्या संस्कृतीत विवाह नसतो एक करार ,
तीतर एक शपथ ,व्रत पूर्णत्वाला न्यायचा महान विचार ,
करारात दुसऱ्याचे उणेच जणू ,आपला विजय अन अधिकार ,
इथे बेरीज -गुणाकारा बरोबर सोडवायचे असतात वजाबाकी -भागाकार ,
वजाबाकीत दुण्याने द्यावा ,उण्याने घ्यावा लागतो हातचा उधार ,
आयुष्याचे गणित सोडवण्याची कलाच ,असते सहजीवनाचा आधार .
नसावेत सतत आपसात वाद -विवाद -फिर्याद ,एकमेकांच्या गुणांना द्यावी दाद ,
पडताना मिळावा प्रेमळ आधाराचा भक्कम हात ,आपसात असावा सुसंवाद ,
आयुष्यात मिळावी शेवट पर्यंत साथ ,अजून काय हवे असते नागमोडी सह -प्रवासात ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा