t . -१-सत्यनारायण च्या प्रसादाचा शिरा करताना रवा गुलाबीसर भाजून झाला की ,केळ्याचे तुकडे घालून पुन्हा थोडा भाजावा . रवा फुलून येतो ,केळे काळे पडत नाही ,स्वाद ही चांगला येतो .
२-नारळ घालून रव्याचे लाडू करताना ,रवा भाजत आल्यावर त्यात खोवलेला नारळ घालून पुन्हा थोडा परतावा . रवा फुलून येतो ,खवट वास येण्याची भिती नसते .
३पनीर ची भाजी करतानलादी च्या लादी शालों फ्राय करून मग तुकडे करून भाजी करावी ,खमंग लागते .
४-चकल्या करताना मदतीला कोणी नसल्यास ,कढई भरुन एकचकली करावी ,उलटायला निथळायला सोपे जाते . तुकडे करून ठेवल्यास मुलांना डब्यात द्यायला पण बरे पडते .
५-तळणी करताना ओहोटी च्या वेळेस तेल जास्त लागते ,धूर पण जास्त होतो . भरतीला तेल कमी जळते . तळणीच्या तिथीचा पाऊण भाग म्हणजे द्वादशीचा (१२)पाऊण ९होतो ,सकाळी /संध्याकाळी ८ते ९तळणी केल्यास तेल कमी लागते .
१-गूळ घालून करतो त्या पक्वान्नात,चिमुट भर हळद व मिठाची कणी घालावी . रंग आणि स्वाद चांगला येतो . उदा-खांडवी,नारळीभात .
२-साखरभाता साठी भात शिजवताना ,चिमुटभर हळद आणि मिठाची कणी घालावी .
३-गूळपोळीत बेसन घालतो ते भाजण्यासाठी तेल वापरावे ,म्हणजे गूळ मऊ रहातो आणि चांगला पसरतो .
४-बटाटेवडे /भजी करताना डाळीच्या पिठात थोडे वरण आणि अर्धा चमचा साखर घालावी ,कमी तेल पितात आणि कुरकुरीत होतात .
५-उकडीच्या मोदकाचे सारण करताना त्यात १-२चमचे तांदूळपिठी घातल्यास चांगले आळून येते .
६-तळणी करताना तेल फसफसायला लागले तर त्यात एखादे चिंचेचे बुटुक घालावे .
७-धिरडी -डोसे तव्याला चिकटत असल्यास ,त्यात थोडा रवा घालावा,उलटणे सोपे जाते .
८-डोश्याच्या पिठात अर्धा चमचा साखर ,अर्धा चमचा मेथीपूड ,चमचाभर बेसन घातल्यास डोसे जाळीदार ,सोनेरी ,कुरकुरीत होतात .
९-मिसळणाच्या डब्यात मेथीदाणा पूड ठेवावी ,आंबट -गोड -तिखट -अश्या आमटी -भाजीला चांगला स्वाद येतो अन आरोग्यास ही चांगले .
१०-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा