सोमवार, २५ जुलै, २०१६
. मला वाटते
. मला वाटते
मागितल्या शिवाय सल्ला देऊ नये ,बोलावल्या शिवाय जाऊ नये ,
भूक नसताना खाऊ नये ,झोप आल्या शिवाय झोपू नये ,
कुपात्रास देऊ नये दान ,वेळ आल्या शिवाय त्यागू नये प्राण ,
शत्रूला कधी कमी लेखु नये ,लाचारीने कधी जगायला लागू नये ,
चोरी कधी करू नये ,कमावण्यासाठी कोणतेही कष्ट कमी लेखू नये ,
अंदाज घेतल्या शिवाय पाण्यात कधी उतरू नये ,
मुलांवर अनाथआश्रमाची अन माता -पित्यांवर वृद्धाश्रमाची वेळ येऊ देऊ नये
प्रेमात कुणाला फसवू नये ,वात्सल्यात परतीची अपेक्षा ठेवू नये ,
अडचणीत सापडलेल्याची अजून अडवणूक करू नये ,घेतलेले उपकार कधी विसरू नये .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा