मंगळवार, २६ जुलै, २०१६

जी g जी


                              जी g जी 
मी मागे म्हंटले तसे पूर्वी दोन्ही हाताने लिहिणारे एकमेव होते गांधीजी ,
आता टेक्सटिंग च्या जमान्यात अनेक झाले गांधीजी ३g ४g जी जी जी ,
वायफाय ३g ४जी सगळे सांभाळू लागले ,नेट साहेबांची मरजी ,
सर्वांशी सहज संपर्कात राहणे झाले सोपे ,हातर टेक्नॉलॉजी चा वरदानच आहेजी ,
तरुणांचा लागतो पहिला नंबर ,पण मागे नाहीत बालक अन आबा -आजी ,
उपजलीकी काही मिनिटात हाती लागते ,काना -कोपऱ्यातली बातमी ताजी ताजी ,
एकमेकांच्या टच मधे राहणे ,झालेय किती ईझी ?
नाण्याला असतात दोन बाजू ,एक चांगली तर वाईट असु शकते दुजी ,
पोस्ट करणाऱ्यांमध्ये नकळत होते स्पर्धा ,लाईक आणि कमेंट मधे कोण मारताय बाजी ,
ऍडिक्शन तर वाईटच ,सारखी साईट पहिली जाते ,नसेना का मनाची मर्जी ,
मनासारखी मिळाली नाही दाद ,तर घेरते डिप्रेशन अन नाराजी ,
ह्या जी जी मधे वेळ अन पैसा खर्ची पडलेला चालतो ,पण महाग होऊन चालत नाही किराणा अन भाजी ,
वर्चुअल नाही ऍक्चुअल मदतीचे हात हवे असतात ,वाहताना आयुष्याची ओझी ,
मनावर ताबा आणि काही पथ्य पाळून ,आपणच घ्यायला हवी आपली काळजी ,
साधन साध्यावर होऊ नये हावी ,हीच प्रार्थना मनापासून माझी . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा