शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

ऋतु



               ऋतु 
उन्हाळ्याच्या तापाने धरतीच्या डोळ्यांच्या चिरा भकास दिसू लागल्या किती ,
ढगांना वाटू लागली काळजी ,पावसाचा करुनि शिडकाव ,शीतल सुगंधित केली माती ,
जिकडे तिकडे हिरवे गार ,काळ्या -हिरव्या रंगाची किती मनमोहक सुसंगती ,
कष्टाचे झाले चीज तर ,शेतकऱ्याला अजून कष्ट करायची मिळते स्फूर्ती ,
आपल्या सारख्या देशाची भिस्तच मुळी चांगल्या हवामाना वरती ,
बळीराजाच्या कृपेने खरीप -रब्बी सर्वच पिकांना जीवदान मिळती ,
उन्हाळा -पावसाळा हिवाळा ,भिन्न स्वभावी ऋतु ,पण साऱ्यांना पोषक त्यांची दोस्ती ,
निसर्ग असो वा माणुस हातात हात घालून चालण्यात असते आगळी -वेगळी मस्ती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा