अक्षरमालेतील एक रेशमी धागा --रक्षाबंधन -नारळी पौर्णिमा
आपले सगळे सण येतात सुंदर अर्थ घेऊन ,
नाजुक रेशमी धागा सुध्दा ठेवू शकतो नाती घट्ट बांधून ,
भाऊ -बहीण प्रतीकात्मक असतात ,नात्यातील पावित्र्य देतात दाखवून ,
यथाशक्ती एकमेकांचे करावे रक्षण ,असा भाव असावा मनातून ,
कुणाला कुणाची गरज केंव्हा भासते ,सांगावे लागत नाही शब्दातून ,
सागर किनारी वाढून सुद्धा ,निघे गोड पाणी नारळातून ,
आजच्या दिवशी श्रीफळ अर्पून ,विनंती असते सुरक्षित प्रवास व्हावा सागरातून ,
दरवर्षी उजाळा देण्यासाठी संस्कारांना ,सण -वार येत असतात धावून .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा