बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

. अश्विनी पौर्णिमा

.              अश्विनी पौर्णिमा --आपल्याकडे पहिल्या अपत्याला यादिवशी औक्षण करून भेटवस्तू द्यायची पद्धत आहे . त्यादिवशीच्या मुलांच्या मनातील टिपलेल्या काही गमतीशीर भावना . 
म्हणेमोठ्यांची अवस्था असते दीनवाणी , 
मोठे आहात ना ?हेकरा तेकरू नका ,ऐकावी लागतात बोलणी ,
छोट्यांची घ्यायची जवाबदारी ,बोलायची कायम गोडवाणी ,
छोट्यांचे दुःख ----
कपडे ,खेळ ,पुस्तके वापरावी लागतात ,जुनी -पुराणी ,
काय बघा ऐट ,फक्त मोठ्यांनाच मिळते ,अश्विनीची ओवाळणी ,
मधले म्हणतात --आमची हालत तर अगदिच केविलवाणी ,
सोयिस्करपणे कधी मोठे ,तर कधी गणलेजातो लहान ,ना घाटाचे ना घरचे पाणी ,
पालकांना सगळी मुले सारखीच ,नसे भेद ,लाडकी -दोडकी ,उणी -दुणी ,
हाताची ताकत पाच ही बोटे ,पण पाचही बोटे सारखी पहिली आहेत का कोणी ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा