प्राणायाम -श्वसनावर नियंत्रण
शरीर निरोगी ठेवायचे असेल तर ,मनावर नसावा अति ताण ,
शारीरिक ताण दिसून येतो ,पण मोजायचे कसे मनाचे उधाण ,
मनःशांतीच्या शोधात भटकून ,जीव होतो हैराण ,
ताण वाढला की गती वाढते श्वासाची ,हेतर जाणतोच सुजाण ,
मानसिक ताणाने कमी होतो शरीरातील त्राण ,
श्वास आहे तर जीवन आहे ,शरीर जीवंत असल्याचे एक परिमाण ,
प्राणायामाने श्वासावर ठेवू नियंत्रण ,निरोगी जीवनाचा एक उपाय रामबाण .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा