अंबा आणि लिंबोणी
लावून कडुलिंबाचे झाड ,लिंबोणीचं येणार ,
बाठीतील अंकुरच वाढून ,आम्रवृक्ष फळणार ,
कडुलिंबाचे झाडही उपयोगीच असणार ,
पण अंबा तो अंबाच ,पिवळ्या लिंबोणीला अंब्याचा स्वाद का असणार ,
लिंबोणी छोट्या अंब्या सम दिसली ,म्हणून का मुंगी फसणार ?
माती -मशागत -माळी एकच पण ,पेराल तेच उगवणार ,
बीजापासून फळ अन फळापोटी त्याचेच बीज असणार ,
एकदा का समजला कर्माचा सिद्धांत ,तर कुकर्म करायला माणूस सहज नाही धजणार .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा