गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

बालसंगोपन

      बालसंगोपन 
प्रत्येक मूल अन भोवतालची परिस्थिती वेगळी असते ,नको सारखी आपसात तुलना ,
अति संरक्षण अन अति स्वातंत्र्य दोन्हीही वाईटच ,मुलांना वाढवत असताना ,
मुलांचे उठ -सूट कौतुक किंवा अती धाक ,दोन्हीही घातकच ,माहीत असावे पालकांना ,
शिक्षण -संस्कार ,आहार -स्वास्थ्य सगळ्याची घ्यावी काळजी ,एक उत्तम नागरिक घडवताना ,
पैश्यांच्या जागी पैसा अन वेळेच्या जागी वेळच द्यावा लागतो ,बालसंगोपन करताना ,
स्पर्धेच्या जगात होकारा बरोबर ,नकार ही पचवता आला पाहिजे बालगोपालांना ,
घरात असला सुसंवाद ,तर मने वाचणे सोपे जाते ,दोन्हीही पक्षांना ,
एकदा का मुले मोठी झाली की मागितल्या शिवाय सल्ला देऊ नये त्यांना ,
मुलांना ही नसावा संकोच ,कोणत्याही वयात मोठ्यांचा सल्ला घेताना ,
शेवटी काय मुले सुखी -समाधानी -समृद्ध अन चांगला माणूस असावीत ,यातच आनंद असतो आई -वडिलांना .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा