शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

अति तेथे माती

                           अति तेथे माती 
पालकांना विभक्त ,व्यस्त जीवनात हल्ली मुलांना अमूल्य वेळ देता येत नाही फार ,
खर्चिक लाड ,हो ला हो करणे ,अहं गोंजारणे ,मग त्यांना पचवता येतनाही नकार ,
दुधारी समृद्धी आणि स्वातंत्र्या बरोबर वाढले मानसिक अन सोबत करणारे शरीराचे आजार ,
आता काळ -वेळ -पैसा ओतून ,करावे लागते परीक्षण आणि उपचार ,
उपचार म्हणायचे पण तो तर असतो रोग दाबून टाकायचा प्रकार ,
शरीर तपासणे सोपे पण मन तपासणे खूपच अवघड ,मग सगळेच होतात बेजार ,
व्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणी कोणाच्या अध्याय -मध्यात कसे बरे पडणार ?
मग एकमेकांच्या अडचणी तरी कश्या बरे समजणार ?
पूर्वी स्वातंत्र्य होते कमी ,म्हणून घरचे -बाहेरचे सल्ले मिळत हजार ,
ना खर्च ,ना साईडइफेक्ट ,कळतच नसे काउंसिलिंग केंव्हा पडले पार ,
श्रद्धा ,भक्ती ,विश्वास देऊन जातो केवढा मोठा आधार !!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा