मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

साक्षरता

          साक्षरता 
साक्षरता म्हणजे काय समजून लिहिता वाचता येणे ,आत्मसाद करणे ,असावा शिकण्याचा ध्यास ,
दहावी नापास ला हल्ली गरजेचे नसते ,मेहनतीने पाहिऱ्या चढत होणे आठवी नववी पास ,
शाळा शिक्षका विना चालेल पण शाळेसाठी कॉम्प्युटर मिळवण्याचा केवढा प्रयास ,
ज्ञान म्हणजे -ब्रेड नाही म्हणून उपाशी राहू नका ,खा की केकचा गोड घास ,
हसावे का रडावे !कळत नाही पण आहे कटू सत्य ,हा तर साक्षरतेचा उपहास ,
कॉपी करणे ,पेपर फुटणे ,पुढे ढकलणे ,बळाच्या  जोरावर डिग्री घेणे ,संख्यावाढ अन गुणवत्तेचा ऱ्हास ,
मनूच्यामते इंद्रीय निग्रही माणसाला ,एक गायत्रीमंत्र ही ,उद्धारास पुरेसा ,
नुसता साक्षर पण चारित्र्यहीन ,बेजवाबदार व्यक्ती कसा चालवणार आपला आदर्श वारसा . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा