चूक -सवय -व्यसन
माणुस म्हंटले की चुकायचाच ही उक्ती सर्वांना माहित असते ,
एखाददा केली तर चूक म्हणून कधी तरी माफी मिळू शकते ,
माफी मिळाली म्हणून पुन्हा पुन्हा केली तर ती वाईट सवय जडते ,
समजून उमजून केल्या चुका ,तर त्याला व्यसन म्हणावे लागते ,
आपल्या बरोबर इतरांनाही व्यसनात ओढणे ,व्यसनाची परिसीमा असते ,
एकच प्याला करत मनाला फसवायचे ,दुसऱ्यालाही दरीत ओढायचे ,मग बाहेर पडणे अवघड असते ,
म्हणून वाईटाचा वाटेला न जाण्यातच खरे शहाणपण असते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा