शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

शब्दांची जादू

          शब्दांची जादू 
काही शब्द उलट -सुलट लिहिले वाचले तर कधी पोषक होतात तर कधी घातक ,
फक्त -वजा चिन्हाचाच केला विचार तर सगळेच भासे नकारात्मक ,
उभा -आडवा केला विचार तर +अधिक पदरी पडे सकारात्मक ,
वन -वास सर्वांनाच वाटे अप्रिय ,
नव -नव्याची आस जिवासी वाटे प्रिय ,
मन काबूत नसेल तर सैरा वैरा पळे ,
नम -वता आले तर योगेश्वर कळे ,
कुकर्मांची परिणिती असणारच नरक ,
सत्कर्म कर न -कर न सतत बिंबवून आचरणात पडतो चांगला फरक ,
अंतिम सत्य असे मरा ,असुदे योनी कोटी चौऱ्यांऐंशी ,
त्यातील राम ,कळला ज्याला ,त्याचाच होई वाल्मिकी ऋषी ,
प्रवाहा बरोबर वाहत जाते ती धारा ,
विरुद्ध वाहून उगमा कडे जाते ती कृष्ण बावरी राधा -मीरा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा