साक्षरता दिन (८सप्टेंबर )
साक्षरतेची नको नुसती टक्केवारी ,नकोत नुसते परिक्षार्थी ,
वाचाल -लिहाल तरच वाचाल ,बनून रहा सदा शिकणारा विद्यार्थी ,
मुलगा -मुलगी ,आबाल -वृद्ध ,सर्वांनी असावे ज्ञानार्थी ,
ज्ञानार्जना साठी बनू स्वार्थी ,ज्ञानदानात परमार्थी ,
माहितीचे नसावे नुसते संकलन ,ज्ञान असावे सदुपयोगी अन व्यवहारार्थी ,
साक्षर म्हणजे सुसंस्कृत जवाबदार माणुस ,हक्का सोबत कर्तव्याची जाण हवी ,
अंधारा कडून प्रकाशा कडे ,अज्ञाना कडून ज्ञाना कडे जाणारी, वाट शोधू सदा नवी ,
शून्यालाही येते किंमत ,त्याच्या पुढे एक होऊन उभे राहण्याची ,ताकत आणि जिद्द हवी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा