बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

बुआ -बाबा / साधु संत

                            बुआ -बाबा / साधु संत 
काही अनुचित बातम्या अन घटनांनी ढवळून निघतो समाज ,
खरे कोण ?खोटे कोण ? आयाराम -गयाराम समजणे अवघड झाले आहे आज ,
मानवाच्या हळव्या भावनांना वटवून स्वतःच घालायचा बाबाजीचा ताज ,
चमत्कार ,चार चांगल्या गोष्टी अन भाषा -वेशभूषेचा चढवून साज ,
दाबून टाकायचा ,दुर्बल ,पीडितांच्या न्यायासाठी झगडणारा आवाज ,
चांगल्या सोबत काही वाइटांचेही असते अस्तित्व ,इतिहास सांगत आलाय पूर्वापार ,
सगळी आढीच नासवतात ,नासके आंबे दोन -चार ,
पण डोळसपणे आपल्यालाच करायला हवा ,चांगल्याचा विचार ,
श्रद्धा असावी ,नको अंधश्रद्धा ,ओळखायला शिकूया कोण चोर ,कोण सावकार ,
मलमाशी सुगंधी फुले सोडून ,सदा बसे ,दुर्गंधयुक्त मलावर ,
तर मधमाशी फीर -फीर फिरुन बसे फक्त सुगंधी फुलांवर ,
आपल्या देशाला ,संकट समयी बळ देणारी ,साधु -संतांची परंपरा लाभली आहे थोर ,
साधु -संत -सदगुरूंच्या -मदतीने ,विजय मिळवूया ,दुष्ट प्रवृत्ती अन विकारांवर . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा