शनिवार, २ जुलै, २०१६

पालखी

                                       पालखी      
ज्ञानबा   तुकारामाच्या गजरात ,पालख्या विसावल्या ,पावन झाली पुण्यनगरी ,
नर -नारी ,गरीब -श्रीमंत ,सर्व भेद विसरुनी ,अद्वैत झाला वारकरी ,
भाबड्या भक्तासाठी झाला सगुण ',तो ' असुनि निर्गुण निराकारी ,
विठु -माऊलीच्या ओढीने ,जनसागर निघाला पंढरपुरी ,
'तो 'ही भक्तीचा भुकेला ,वाट पाहत उभा ठेवूनि हात कटीवरी . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा