शुक्रवार, २९ जुलै, २०१६

सुविचार

                             सुविचार 
शिक्षणाच्या जोडीला हवेत संस्कार ,व्यापाराच्या जोडीला व्यवहार ,
कमवत्या कर्तुत्वाला काटकसरीच्या संसाराचा भक्कम आधार ,
सुखाच्या शेल्याला दुःखाची थोडी टोचणारी भरजरी किनार ,
जागतिकीकरणाची नौका ,माणुसकीच्या सागरातूनच तरणार ,
यशामधे थोडा नशिबाचा वाटा अन प्रयत्न मात्र लागतात अपार ,
कोणताही व्यवहार असावा स्वच्छ आणि आरपार ,देव तारतो त्याला कोण मारू शकणार ?
संकटाना समजावे संधी ,संधीचे करावे सोने ,बावन्नकशी चमकदार . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा