काळ एक अतिथी
दारी आलेला अतिथी जाणावा देवा समान ,दारी कोण ते पाहूनच द्यायचा असतो मान-सन्मान ,चोर- भामटा -कामचुकार पारखूनच ,द्यावे सदपात्री दान ,राखावा लक्ष्मण -रेषेचा मान ,
चालावे -वागावे काळाबरोबर ,नाहीतर नाहक गमवावे लागतात प्राण ,
अनेक दुःखे विसरायला काळ हे एकच औषध अन प्रमाण ,
काल पासून घ्यावा धडा ,आज मधे जगण्या साठी ,उद्याची अती चिंता चिता समान ,
काळ एक अतिथी चार दिवस येतो -जातो ,त्याचा महिमा असे महान .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा