मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

अर्घ्य

    अर्घ्य 
अनेक घटना घडत असतात ,आपोआप जगात ,
बघ्या पलीकडे आपली ,काहीच भूमिका नसते त्यात ,
थोड्यातरी चांगल्या घटना ,घडवायचा प्रयत्न असावा आयुष्यात ,
शेवटी वाटता कामा नये ,काय केले !गेली उभी हयात ,
अर्घ्यम्हणजे पाणी ओंजळीत घेऊन ,सोडायचे असते पुन्हा नदीच्याच पाण्यात ,
मातृ -पितृ -समाजाचे ऋण फेडायचे असते ,फाटे पर्यंत साठवू नये आपल्याच खिशात ,
जमा -खर्चाची नोंद वरचा ठेवीतच असतो ,आपल्या वही -पुस्तकात ....... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा