बुधवार, १९ एप्रिल, २०१७

ग्रंथ महात्म्य


                 ग्रंथ  महात्म्य 
रामायण -महाभारत गीतेचे तत्त्वज्ञान ,
गाथा -दासबोध -ज्ञानेश्वरी सम ग्रंथांचे ज्ञान ,
असो बायबल असो कुराण ,वेद -उपनिषद ,अठरा पुराण ,
जगण्याची कला शिकवणारे ,समस्त प्राचीन -नवीन लेखन आहे मानवासी एक वरदान ,
साहित्य ,संस्कृति ,इतिहास ,कला अन विज्ञान ,
असो विभिन्न विषय ,भिन्न भाषा ,ज्ञानार्जन देई सदा आनंद -समाधान ,
असे म्हणतात ज्ञान -संपदा वाटून वाढते ,विद्यादान उत्तम दान ,
स्वार्थ -परमार्थ दोन्ही साधता आले तर त्याहून असे काय महान !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा