जीवन आणि जगणे
जन्म -मरणातील अंतर म्हणजे जीवन ,यालाच म्हणायचेका जगणे ?
भूक -भय -निद्रा -मैथुन ची गरज पशूंप्रमाणे माणसाला ही निसर्गचे देणे ,
मग पशु आणि माणुस यांच्यात फरक काय बरे असतो ,तुका म्हणे ,
मोठमोठ्या तत्वज्ञानीं चे बघुया विचार -सार ,अन बांधूया गाठी ,
जीवन जगावे लागते स्वतः साठी आणि अवलंबून असणाऱ्यांसाठी ,
प्रत्येक भूक भागवण्यासाठी भाकरी भाजण्यासारखे केलेले कर्म म्हणजे उपजीविका ,
जगण्याचा खरा हेतू तोही इतरांसाठी ,म्हणजे जीविका ,
ते सुंदर रित्या शिकवतात पंचतत्त्व अन , निसर्गातील फूल अन कालिका ,
माणसा ला पशु पासून भिन्न करणारी भावना -तर्क -विचार -बुद्धी ची देणगी स्वरूप मालिका ,
भाकरी शिळी झाली की त्यातून पसरू लागते दुर्गंधी ,
फुले शिलीच काय ,मृत झाली तरी ती देतात सुगंधी अन फक्त सुगंधी ,
योग्य वेळी सुपंथ धरूया ,माणुस बनुया ,उतरवून अहंकाराची धुंदी अहंगंडाची धुंदी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा